Monday, February 18, 2013

जोतीराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली !!

जोतीराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली !!

शिवराज्याची पुनःस्थापना करण्यासाठी जोतीराव फुले स्वतः 1874 साली रायगडवर गेले शिवाजिराजांची समाधि तर दृष्टिआड़ गेली होती... तात्यांनी चार दिवस गडावर मुक्काम केला व झाडे झुडपे वेळी,घाणेरी यामध्ये अडकलेली राजांची समाधि व् परिसर स्वच्छ केला..फुले आणली आणि राजांच्या समाधीला ती वाहिली ही घटना रायगडवरील ग्रामजोशिस समजली तो धावत पळत आला आणि जोतीरावना व् शिवरायांना अत्यंत हिन् भाषेत बोलू लागला..शिवरायांच्या समाधीला वाहिलेली फुले ग्रामजोशिने लाथेने उधालुन लावली. 
जोतीरावना शिवरायांचा झालेला अपमान सहन झाला नाही..भट पेशव्यांनी नष्ट केलेल्या शिवरायांचा इतिहास बहुजनंना समजावा यासाठी जोतीरावयांनी शिवजयंती उत्सव सुरु केला... तात्यांनी राजांच्या जीवनावर अत्यंत अभ्यासपूर्ण असा पोवाडा लिहला... सत्यशोधक समाजामार्फत शिवाजिराजांच्या पोवाड्याचे कार्यक्रम गावोगावी होऊ लागले तात्यांनी सुरु केलेली शिवजयंती गावोगावी सुरु झाली. पेशव्यांनी केलेल्या क्रूरकटकारस्थानाचा बदला जोतीराव यांनी घेतला.. 
शिवजयंती उत्सव सुरु केला त्यामुळे पुण्यातील सनातनी भयानक चिडले पण त्यांचा नाईलाज होता कारण बहुजन समाजात जोतीराव यांच्यामुले जागृति झाली होती... त्यामुले शिवजयंती बंद पाडने सनातनी लोकांना म्हणावे तेवढे सोपे नव्हते..यासाठी पेशवेकैवारी टिळक यांनी शिवजयंती बंद पाडन्यासाठी गणपति उत्सव सुरु केला.. आणि खुप मोठ्या प्रमाणात टिळक यशस्वी ठरले कारण आपले मुर्ख लोक आजकाल शिवजयंती जेवढ्या उत्साहात साजरी करत नाहित तेवढ्या उत्साहात गणपति उत्सव साजरा करतात त्यात सहभाग नोंदाविता.. अरे आपली बुद्धि कुठे शेन खायला गेली आहे तेच कळत नाही खरे तर लाज वाटायला पाहिजे आपल्याला ज्या मानसामुळे तुम्ही आम्ही जिवंत आहोत त्याच्या जयंती बाबत एवढा निरुस्ताह म्हणजे आपण स्वार्थी झालो आहोत...एवढे मात्र निश्चित.

No comments:

Post a Comment

Translate