Sunday, December 30, 2012

समतावादी कवी : केशवसुत


 आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे कविवर्य केशवसुत -कृष्णाजी केशव दामले यांचा आज (७ ऑक्टोबर) जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या काव्यजगताचे स्मरण करून देणारा हा लेख...

प्रसारमाध्यमांतून सामाजिक प्रश्नांची अ‍ॅडव्होकसी करणा-या ‘संपर्क टीमच्या कार्यशाळेनिमित्त २००९ च्या ऑगस्ट महिन्यात गणपतीपुळ्याला गेलो होतो. तेथून जवळच असलेल्या मालगुंड येथील केशवसुत स्मारकाला भेट देण्याचा अपूर्व योग आला. शालेय जीवनात केशवसुतांच्या ‘तुतारीङ्क, ‘झपूर्झाङ्क, ‘नवा शिपाईङ्क  यांसारख्या कविता पाठ केल्या, अभ्यासल्या.  त्या कवीच्या जन्मगावी जाऊन त्यांचे स्मारक पाहण्याचा योग हा अविस्मरणीयच. कविवर्य कुसुमाग्रजांनी या स्मारकाला ‘मराठी कवितेची राजधानीङ्क संबोधून गौरव केलेला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील केशवसुत-कृष्णाजी केशव दामले यांचे हे अत्यंत देखणे स्मारक महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशा थाटात उभे आहे.  केशवसुतांचे शेणा-मातीचे राहते घर, अभ्यासाची खोली, दुर्मिळ वस्तू आजही या स्मारकात जशाच्या तशा पाहावयास मिळतात. केशवसुतांच्या काही उल्लेखनीय कविता स्मारक परिसरात मैलाचा दगड असलेल्या आकारातील फलकावर कोरण्यात आलेल्या आहेत. शिवाय या ठिकाणी सुसज्ज असे गं्रथालय आहे. १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी या स्मारकाला मूर्तरूप दिले. या स्मारकाचे उद्घाटन कविवर्य कुसुमाग्रजांच्या हस्ते १९९४ मध्ये करण्यात आले. या स्मारकाच्या एका खास दालनात केशवसुतोत्तर काळातील महत्त्वाच्या कवींच्या कवितांचा समावेश आहे. केशवसुतांनंतरच्या काळापासून १९५० पर्यंत जन्मलेल्या व ज्यांनी आधुनिक मराठी कविता समृद्ध केली अशा ६६ निवडक कवींच्या कवितांचा यात समावेश आहे. हे दालन ‘आधुनिक मराठी काव्यसंपदाङ्कदालन म्हणून ओळखले जाते. हे दालन गं्रथरूपानेही काव्यरसिकांसाठी प्रकाशित करण्यात आलेले आहे. या दालनाचे उद्घाटन कविवर्य वसंत बापट यांच्या हस्ते झाले होते.  हे स्मारक सातत्याने नव्या वाटा चोखाळणाèया नवकवींना प्रेरणादायी असून प्रवर्तन साहित्याला दिशा देणारे आहे.
  केशवसुतांच्या मरणोपरांत शंभर वर्षांनंतर मराठी कवितेत आजही केशवसुत परंपरा दिसून येते. प्रस्थापित काव्यपरंपरेला छेद देण्याचे काम आपल्या काव्यातून केलेले आहे. मानवतावाद, समता, विश्वबंधुत्व, रूढीभंजन, स्वातंत्र्यप्रेम, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार, विषमता, सामाजिक दु:ख, अन्याय, अंधश्रद्धा हे विषय त्यांच्या कवितेतून आले. केशवसुतांनी मराठी कवितेला वास्तवतेचे भान दिले. म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांच्यासारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीतङ्क नावाने त्यांनी मराठीत रूढ केला. त्यांच्या एकूण १३५ च कविता उपलब्ध आहेत. त्यांच्या कविता संख्येने कमी असल्या तरी क्रांतिकारक आणि प्रवर्तक ठरल्या आहेत. ‘तुतारीङ्क, ‘झपूर्झाङ्क, ‘नवा शिपाईङ्क,  ‘हरपले श्रेयङ्क, ‘मूर्तिभंजनङ्क, ‘आम्ही कोणङ्क,  ‘गोफणङ्क, या त्यांच्या काही उल्लेखनीय कविता. त्यातील ‘तुतारी ङ्कही कविता क्रांतिकारक ठरली.
एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन जी मी स्वप्राणाने,
भेदुनि टाकिन सगळीं गगनें
अशी तुतारी द्या मजलागुनि
 ही कविता खèया अर्थाने आधुनिक मराठी कवितेची तुतारी ठरली. या कवितेच्या नावावरून तेव्हा  तुतारी मंडळ स्थापन झाले होते. तर त्यांच्या  ‘कविता आणि कवीङ्क, या कवितून कवीच्या प्रतिभेला कोणी आदेश देऊ नये, असे खणकावून सांगितले.
अशी असावी कविता, फिरूनी
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कविला
अहांत मोठे ? पुसतों तुम्हाला
 या कवितेतून जनतेसाठी कविता असते असे म्हणण्यापेक्षा ती कवीसाठी असते, यावर केशवसुतांनी भर दिलेला दिसून येतो. कवितांतून मिळणारा आनंद हेच एकमेव कवीचे उत्तम पारितोषिक मानले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. कवीची प्रतिभा ही एक स्वतंत्र चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही कसलेही आदेश देऊ नयेत, असे त्यांनी या काव्यातून सांगितले आहे. केशवसुतांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी त्यांची कविता ‘ज्ञानप्रकाशङ्क या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्यामुळेच. मात्र केशवसुतांच्या हयातीत त्यांची आणि त्यांच्या कवितेची उपेक्षाच झाली. त्यावेळी कोणीही त्यांच्या कवितेबद्दल गौरवोद्गार काढले नाहीत. म्हणून महाराष्ट्राच्या वाचकांमध्ये गुणग्राहकता नसल्याची त्यांना खंत होती. आपली कविता कुठेच छापून येत नाही, याचे त्यांना वाईट वाटत होते. म्हणूनच त्यांनी एका कवितेत म्हटले आहे, ‘भिकार या जगी, इच्छित न मिळे काही, म्हणून तुझेपायी, भिक्षांदेहीङ्क
पण त्यांच्या मृत्युनंतर अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या कवितांना डोक्यावर घेतले. आधुनिक मराठी कवितेचा जनक म्हणून गौरव केला. केशवसुतांच्या कवितांमध्ये वास्तवाचे भान आहे. आधुनिक दृष्टी, संवेदनशीलता, नवा आशय, सामाजिकता आजच्या घडीची वाटतात. म्हणूनच केशवसुतांच्या  कवितेपासून आधुनिक मराठी कवितेचा प्रारंभ झाला असे म्हणतात. काही तथाकथित बुद्धिजीवी मंडळी काव्य वा साहित्याला पाल्हाळ म्हणून टीका करतात. साहित्यातून समाजपरिवर्तन वा क्रांती होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे. परंतु साहित्यिकच सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रोन्नतीला हातभार लावू शकतात, ही जाणीवच माणसांना कृतिशील बनवते आणि त्यातूनच क्रांती आकार घेत असते. कवीसुद्धा एक विचारवंतच असतो. केशवसुत आपल्या ‘मूर्तिभंजनङ्क कवितेतून समाजातील विकृतीवर प्रहार करतानाही मागेपुढे पाहात नाहीत.
 मूर्ति फोडा, धावा! धावा, फोडा मूर्ति!
 आंतील सम्पति फस्त करा!
 व्यर्थ पूजाद्रव्यें त्यांस वाहूनीयां,
 नाकें घासूनीयां काय लभ्य?
अध्यात्मात अडकून पडलेल्या मराठी कवितेला त्यांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसांच्या जगात आणले. आपल्या काव्यातून त्यांनी रूढी, परंपरेच्या शृंखला तोडल्या. तर  प्रेम आणि मायेचे तत्त्वज्ञानही त्यांनी फार सुंदररीतीने आपल्या कवितांमधून मांडलेले आहे. आईची आठवण काढताना ते आपल्या ‘आईकरिता शोकङ्क या कवितेतून म्हणतात..
 ‘अन्तरले पाय तुझे हाय हाय माते
मागें तव दर्शन मजलागुनीं जहाले
 तदनन्तर लोटुनिया दिवस फार गेले,
फिरुनी तुझ्या चरणांतें उत्सुक मी बघण्यातें
असता अन्तींहि न तेङ्क
अशा आशयगर्भ कवितांमधून त्यांनी नव्या वाटा निर्माण केल्या. केशवसुत त्याकाळच्या काव्यजगताचे युगप्रवर्तक ठरले.  कवितेलाच जीवनसर्वस्व मानणाèया या कवीला वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले आणि एका काव्यसूर्याचा अस्त झाला. केशवसुतांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करताना महाराष्ट्रातील कवी आणि काव्यरसिकांनीही अंतर्मुख होऊन कवितेकडे पाहण्याची गरज आहे.
             
                                                   -शिवाजी कांबळे, लातूर
                                                          ९०४९२ ९८७५०
                                             

क्रांतीकारी शुभेच्छा!


मित्रानो,
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या क्रांतीकारी शुभेच्छा!
पण या शुभेच्छा देताना वाईटही तेवढेच वाटते आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील वेदनेने महिलांच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले आहे. ती शहिद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुतांश तरुणाईने नव वर्षाचा जल्लोष साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रास्तच आहे. देशात यापूर्वीही बलात्काराच्या रोज अनेक घटना घडत होत्याच, पण त्या अत्याचाराला वाचा फुटत नव्हती, वाचा फुटली तर पोलिस प्रशासन आणि सरकार दरबारी तिला न्याय मिळत नव्हता. आपल्या देशाचे कायदे कणखर आहेत, पण कायद्याची अंमलबजावणी करणारेच नालायक, जातीवादी, अत्याचारी असल्याने असंख्य सावित्रीच्या लेकींना न्याय मिळू शकला नाही. आता दिल्लीच्या पीडित मुलीच्या भयावह प्रसंगाने देशालाच नव्हे तर जगाला हादरे दिले आहेत. परंपरेने नटलेल्या, सारे भारतीय भाऊ-बहिण आहोत म्हणून रोज गजर करणाèया देशाची जगभर छी थू होत आहे. काही वर्षांपूर्वी खैरलांजी प्रकरणातील पीडितांना न्याय मिळाला असता तर आज दिल्लीत दामिनीवर बलात्कार झाला नसता. तालिबान्यांशी दोन हात करणाèया पाकिस्तानातील मलालानेही भारत सरकारला रेपिस्ट संबोधून आरोपीच्या पिंजèयात उभे केले आहे. अण्णांच्या आंदोलनानंतर आता पीडित मुलीच्या मृत्यूने पुन्हा एकदा देशात क्रांतीची मशाल पेटली आहे. इजिप्त आणि लिबियाप्रमाणे आपल्या देशातही क्रांतीची गरज आहे. स्वत: नपुंसक असलेले सत्ताधारी बलात्काèयांना काय नपुंसक बनविणार? आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे क्रांतीचा...बदलाचा....
......................शिवाजी कांबळे


Thursday, December 27, 2012

अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई'


अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई 
२४ डिसेंबर हा सानेगुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त सानेगुरुजींची मुले म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाणारी तथाकथित मंडळी त्यांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत असतात. पण सानेगुरुजींचा अशाही एक पैलू आहे की, ते आज पुरोगामी महाराष्ट्राला विचार करावयास लावणारा आहे. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे आपल्या प्रार्थनेतून बालमनावर संस्कार करणा-या सानेगुरुजींच्या ‘श्यामची आई पुस्तकातच तेही अस्पृश्यता कसे पाळत होते, हे दिसून येते. त्यांनी लिहिलेले ‘श्यामची आईङ्क हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान, असे मानले जाते. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ साली ‘श्यामची आईङ्कनावाने चित्रपट बनवला. १९५४ साली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. लहान मुलांवर संस्कार करणारे पुस्तक म्हणून गेली पाऊणशे वर्षे उदो उदो केला जात आहे. सानेगुरुजींकडे संपूर्ण महाराष्ट्र हा एक सत्पुरुष म्हणूनच पाहतो आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरुजींनी आमरण उपोषण केले होते. तेव्हा एका पांडुरंगाने दुस-या पांडुरंगाला जोखडातून मुक्त केले, अशी प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रात उमटली. मात्र सानेगुरुजी स्वत: जातिभेदाच्या, ब्राह्मण्याच्या जोखडातून सुटू शकले नाही. हे त्यांच्याच ‘श्यामची आईङ्क या कादंबरीतून स्पष्ट होते. या पुस्तकातील श्याम हा वसतिगृहातील आपल्या मित्रांना आपल्या आईची कहाणी सांगत असतो. एका रात्री तो आपली आई जातीयवादाला कशी थारा देत नव्हती, याबद्दल सांगत असतो. ते प्रकरण म्हणजे देवाला सारी प्रिय, ही कथा सांगताना एका लाकडाची मोळी विकणा-या अस्पृश्य
समाजातील वयोवृद्ध महिलेला मोळी उचलून देण्याची मदत करून मोठे समाजकार्य केल्याचा आव आणला जातो; परंतु या पुस्तकाच्या पान क्रं. १११,११२ आणि ११५ वर ‘श्यामची आईङ्क कशी अस्पृश्यता पाळणारी होती, हे स्पष्टच होते. रस्त्यात असह्य ती अस्पृश्य महिला असते. तिला तिच्या जातीमुळे मोळीसुद्धा कोणी उचलून देत नाही. ‘श्यामची आईङ्क पाहते, तीही तिला मदत करत नाही. पण श्यामच्या आईला सरपणाची खरी गरज असते. त्यातून ती श्यामला सांगते की, बाळ, त्या महारिणीला मोळी उचलून दे. तो म्हणतो लोक काय म्हणतील, तेव्हा आई म्हणते घरी येऊन आंघोळ कर. श्याम मोळी
उचलून देतो. श्याम घरी आल्यानंतर त्याची आई त्याला घरात न घेता बाहेरच दुरूनच त्याच्या अंगावर पाणी
ओतते. स्नानात शुद्धी आहे, हे त्याला आईने सांगितलेले नसते, पण महाराला शिवल्यानंतर ब्राह्मण अशुद्ध
होतो, असे त्याला आधीच माहीत असते. या प्रसंगामध्ये आई देवाला सारीच प्रिय आहेत, यावर प्रवचन देते, मात्र अस्पृश्यता हे पाप आहे, असे ती कधीच सांगत नाही. दलितांना स्पर्श केल्यानंतर घरी जाऊन आंघोळ करावी, हा संस्कार आजच्या मुलांनी घ्यावा का?
                   --- शिवाजी कांबळे

Friday, March 16, 2012

22 प्रतिज्ञा

बाबासाहेबानी नाग भूमित एक अभूतपूर्व सोहळ घडवून आणला. हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा तो सोहळा म्हणजे हिंदुंच्या जातियवादावर घातलेला घणाघाती घाव तर होताच. पण  धर्मांतराची दुसरी बाजू म्हणजे दास्यात खितपत पडलेल्या अस्पृश्यांना आत्मसन्मानाने जगण्याच्या नव्या वाटा दाखविणार हा सोहळा होता. दलिताना हजारो वर्ष  गुलामीत ठेवणारे देव देवता नाकरणे या धम्मसोहळ्यातील एक मुख्य़ भाग होता. नुसतं धम्म स्विकारुन काही होणार नाही हे बाबासाहेब्न जाणून होते, त्यामुळे त्यानी देवाचा बंदोबस्त करणा-या बावीस प्रतिज्ञा तयार केल्या. त्या लोकांकडून वदवून घेतल्या. बाबासाहेबानी बौद्ध धर्माला दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिल प्रमाणे आहेत
१) मी ब्रम्हा, विष्णु व महेश याना देव मानणार नाही व त्यांची पुजा करणार नाही।
२) मी राम व कृष्ण याना देवाचा पुनरजन्म मानत नाही व त्यांची पुजा ही करणार नाही।
३) मी गौरी गणपती व ईतर कुठल्याही देविला मानत नाही व पुजाही करणार नाही।
४) मी देवाचा पुनरजन्म मानत नाही।
५) मी बुद्धाला विष्णूचा अवतार मानत नाही, हा एक अपप्रचार आहे।
६) मी श्राद्ध करणार नाही व पिंडदान करणार नाही।
७) मी बुद्धाच्या शिकवणुकीच्या विसंगत वागणार नाही
८) मी कुठलेही कार्य ब्राह्मणाच्या हस्ते करणार नाही
९) मी सगळ्या मानव जातिला समान मानतो.
१०) मी समानता प्रस्थापीत करण्यासाठी कटिबद्ध राहीन
११) मी बुद्धाने सांगितलेला अष्टप्रधान  मार्गाचे पालन करेन।
१२) मी बुद्धाने सांगितलेल्या १० पारमितांचे पालन करेन।
१३) मी समस्त प्राणीमात्रावर प्रेम करेन व त्यांचे रक्षण करेन।
१४) मी चोरी करणार नाही।
१५) मी खोटे बोलणार नाही।
१६) मी वैषयीक अपराध करणार नाही।
१७) मी मद्यपान व इतर कुठेल्याही नशेचे सेवन करना नाही।
१८) मी अष्टांग मार्गाचे पालन करेन आणी दया, करुना व प्रेमाचे रोज आचरन करेन।
१९) मी मानव जातीच्या विकासात बाधा घालणा-या व जातिभेद करणा-या या हिंसक अशा हिंदु धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्विकार करतो आहे।
२०) मी फक्त बुद्धांच्या धम्मावर विश्वास ठेवतो।
२१) मी बौद्ध धम्माचा स्विकार करतो, अन हाच माझा पुनरजन्म आहे असे मानतो।
२२) मी अशी प्रतिज्ञा घेतो की, या नंतरचे माझे जीवन मी बुद्ध व त्यांचा धम्म यांच्या शिकवणुकी प्रमाणे जगणार॥

क्रांतीज्योती आणि क्रांतिसूर्य

जयभीम म्हणजे ...


जयभीम म्हणजे स्वान्त्र्याची युगयात्रा
जयभीम म्हणजे नंदादीपाप्रमाणे स्वतःला  जाळून घेणारा 
जयभीम म्हणजे अज्ञान , अंधकार  प्रकाशमय  करणारा 
जयभीम म्हणजे  धाम्म्प्रदीप 
जयभीम म्हणजे  अन्यायाशी  अविश्रांत झुंज 
जयभीम म्हणजे रूढी , परंपरा,  अंध्श्र्धेवरील अटम्बोम्ब
जयभीम म्हणजे  असंख्य अबलांचे अश्रू पुसणारा 
जयभीम म्हणजे पददलितांचे स्म्र्तीस्थान, आश्रयस्थान 
जयभीम म्हणजे बौद्धांचे उगमस्थान 
जयभीम म्हणजे बौद्धांचा बौधीवृक्ष
जयभीम म्हणजे  सुबोध , ओजस्वी , आदर्श , विद्वता प्रचुर वक्तृत्व 
जयभीम म्हणजे ज्ञानयोगी , कर्मयोगी, राजयोगी 
जयभीम म्हणजे निरामिष, प्रेममय ,नीतीचा परम आदर्श 
जयभीम म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन 
जयभीम म्हणजे नवसमाज निर्माण 
जयभीम म्हणजे संविधान शिल्प्कारिता 
जयभीम म्हणजे महात्मा गांधीचे प्राणदान 
जयभीम म्हणजे भारत भाग्य विधाता 
जयभीम म्हणजे महासागरासारखे विशाल  अंतकरण 
जयभीम म्हणजे हिमालयासारखी प्रचंड बुद्धिमत्ता            

समता संघर्षाच्या पुन्हा पेटवा मशाली ...!

 पुण्याच्या अनुज बिडवे याची इंग्लंडमधील  मंचेस्तारमध्ये वंश विद्वेषातून हत्या झाल्यानंतर  प्रसारमाध्यमामध्ये  बातम्या येत आहेत . चर्चाही मोठ्या  प्रमाणात  झडत आहेत. ब्रिटीश सरकार आणि मंचेस्तर पोलीस वंश विद्वेषाचा  मुद्धा नजरेआड  करीत आहेत  काय ? न्याय  मिळण्यासाठी चोहोबाजूंनी चर्चा केली जात आहे . परंतु देशातील दलितांवरील विखारी जातीयवादातून होणाऱ्या अन्याय _अत्याचारांच्या  घटनाचे येथील राज्यकर्त्यांना , सिविल सोसायटीला आणि  प्रसारमाध्यमाना काहीच सोयरसुतक नाही. आज भारत स्वतंत्र होऊन ६४ वर्षे  उलटली . तरी जातीवाद , विषमता  संपताना दिसत नाही.  एकीकडे महासत्तेची स्वप्ने पाहतोय  तर दुसरीकडे जातीवाद इथल्या समाजव्यवस्थेला कॅन्सरसारखा  पोखरतोय . देशात दलित-आदिवासिवरील  अत्याचारात वाढ झाल्याची आकडेवारी  गतवर्षी  जून महिन्यात केंद्रीय सामाजिक न्याय  मंत्री मुकुल वासनिक यांनी जाहीर केलेली आहे . प्रामुख्याने महाराष्ट्रात  आणि त्यातही मराठवाड्यातील दलितांना जातीवादाचे चटके अधिक सहन करावे लागत आहेत . मराठवाडा विध्यापिठच्या  नामांतर  आंदोलनापुर्विपासुंच इथला मराठा  समाज  जातीयवादातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाही . हे वेळोवेळी  सिद्ध झालेले आहे . कुठ आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली जाते .तर कुठे दलीन्ताच्या स्मशानभूमीवर  अतिक्रमण करून त्यांना मेल्यावरही  अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव केला जातो . किरकोळ कारणावरून त्यांना जातीवाचक शिवीगाळ, मारहाण केली जाते .एवढेच नाही तर त्यांची हत्या केली जाते.येनकेन प्रकारे दलितांच्या विकासात अडथला आणला जातो . याची दाद फिर्यादही प्रशाशनात बसलेले जातीवादी लोक घेत नाहीत .महाराष्ट्राचे कर्तेधर्ते समजणाऱ्या राज्यकर्त्यांच्या नसणासातील जातीवादाचा प्रत्येय इथल्या दलित-आदिवासींना आलेला आहे. मनुस्म्र्तीच्या समर्थकांनी  इथल्या मराठा  समाजाच्या डोक्यात जातीवाद्ची केलेली पेरण  जाता जात नाही.हे परिवर्तनवादी, पुरोगामी मान्हुवून घेणाऱ्या तथाकथित विचारवंत आणि राज्याकार्त्यासामोरील  एक  मोठे आव्हान आहे. एका ताज्या घटनेमुळे मराठवाड्यातीलच नाही तर सबंध महाराष्ट्रातील दलिताच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ५ जानेवारी २०१२ रोजी  परभणी जिल्ह्यातील भोगाव साबळे येथील बौद्ध वस्तीवर मराठा समाजाने लाठ्या काठ्यानी हल्ला चढविला .दिसेल त्याला मारहाण केली. यात गर्भ्वातीनही सोडले नाही. दलिताचे घर जाळले , कारण काय  तर २१ डिसेंबर २०११ रोजी तेथील बौध्द समाज  बांधवानी इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या आंतरराष्ट्रीय  स्मारक साठी केंद्र सरकारने देण्याचे मान्य केल्याने गावात केलेला आंदोत्स्व .उपेक्षित बौद्धांनी गावात आंदोस्तोव साजरा केल्याने जातीयवाध्याना पोटसूळ  उठला .मराठा  समाजातील काही जातीयवाध्यानी बौद्ध समाजातील आनासाहेब पुंदगे आणि संजय कचरू पुंदगे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत जबर मारहाण केली होती. त्यामुळे येथील चार जातीयवाद्ध्याविरुद्ध atrosity  कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले होते .याचा राग मनात धरून  बौद्ध वस्तीतील समाज मंदिरासमोर माणिक साबळे ,अजित साबळे  या जातीवादी गावगुंडानी जातीवाचक शिवीगाळ करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचीत्राची विटम्बना केली.लहाडे यांच्या घरावर हल्ला केला .दलित समाजातील महिला -पुरुषांना जबर मारहाण केली. लहाडे यांच्या घराला आग लावली.यात त्यांचा संसार जाळून खाक केला .अनेकांचे संसार उघड्यावर पडले .गावातील वाहने बंद केली. ग्रामस्थांनी दलितावर बहिष्कार टाकला.गावातील दलित समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.या भयानक घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती चे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी गलांडे यांची भेट घेऊन भोगाव यथील पिडीत दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच जातीवादी आरोपींना अटक करावी यासाठी निवेदन दिले.या शियाय कुठल्याही स्थानिक लोकप्रतिनिधीला या घटनेची गांभीर्याने दाखल घ्यावीशी वाटली नाही प्रस्थापित प्रसारमाध्यामानी या घटनेला कवरेज दिले नाही .कसे  देणार ? तेथेही जातीवादी पिलावळ आहेच  न!मराठवाड्यातल्या खेड्या-पाड्यात जातीवादी कारवाया कोण करते आहे ? मनुस्मृतीच्या समर्थकांनी भूतकाळात दलितावर अतोनात अत्यचार केले .पण आज मनूचा प्रभाव असलेला मराठा समाज दलितावर अत्याचार करीत आहे. हे बुद्ध आणि  डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना मानतो असे म्हणणाऱ्या मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांना दिसत नाही का? त्यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय उपक्रम राबविले आहेत ? राबवीत आहेत ? महासत्तेची स्वपने  पाहणारे इथले तथाकथित राज्यकर्ते ,बुद्धीजीवी  विचारवंत इथला जातीवाद संपविण्यासाठी काय उपाय योजना करीत आहेत ? विषमतेच्या छातीवर समतेचे कलमीकरण करण्यासाठी ज्या क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवतोड प्रयत्न केले .त्यांचा वारसा कोण जतन करीत आहे? इथल्या गोरगरीब दिन-दलीतामध्ये सुरक्षेची भावना कशी आणि कधी निर्माण होईल ?असे एक न अनेक प्रश्न समाजाला भेडसावत आहेत .पण अशा परिस्थितीत समाजात समतेचा झेंडा रोवण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना आता पुन्हा समतेच्या संघर्षासाठी माश्ली पेटवाव्या  लागतील ...अन्यायाचा  प्रतिकार  लोकशाही मार्गाने करण्यासाठी मुठी आवलाव्या  लागतील ...इथल्या जातिवाद्यांना धडा शिकविण्यासाठी .

                                                                                                                       *      शिवाजी  कांबळे

पेशवेशाहीचा पाडाव करून समाजाला व्रर्णव्यास्थेतून मुक्त करणाऱ्या महार बटालीयनच्या शूरवीरांना क्रांतिकारक अभिवादन !


भारतात अनेक पकारच्या लढाया झाल्या. पण महाराष्ट्रातील पुणे जिह्यात भिमाकोरेगाव येथे पेशवे विरूद्ध महारसैनिक जी लढाई झाली `ती न भुतो न भविष्यती' होती. म्हणजे अशी लढाई मागे ही झाली नाही आणि पुढेही कधी होणार नाही. या लढाईत 500  महारसैनिकांनी 25000 हजार  पेशव्यांचा धुव्वा उडविला तर काही जायबंदी करून टाकले तर काहींना धरणीवर लोळविले, काहींचे मुडदे पाडले, तर काहीजणांना पळती भूई थोडी करून टाकली. अशा पद्धतीन धाडसी शुर, वीर, जाबाज महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण करून टाकली. आजही या लढाईची आठवण  महारसैनिक म्हणजे आजचे भिमसैनिक यांच्या स्मरणात आहे. ही लढाई का घडली? कशी घडली? आणि कोठे घडली? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ही लढाई घडण्यापूर्वी पेशव्यांना पुणे काबिज करावयाचे होते. पेशव्यांकडे धारदार शस्त्रास्त्रs, तलवारी, भाले, कुऱहाडीही होत्या. 25000 पेशव्यांचा फौज फाटा पुणे काबिज करण्यासाठी चालून येत आहे. याची कुणकुण गोऱया अधिकाऱयांना आधीच लागली होती. 25000 पेशव्यांचा फौज फाटा म्हटल्यानंतर सहाजिकच काळजाचे ठोके वाढणारच, काळजात धस्स होणारच. पुणे आणि नगर रस्त्यावर असलेले भिमाकोरेगावच्या रस्त्यांनी एक गोरा शिपाई पुण्याहून शिरूरला निघाला होता. त्या शिपायास कमांडर बटर्नरचे पत्र शिरूर छावणीला पोचवायचे होते. त्याकाळात वाहनांची फारशी सुविधा नव्हती. हत्ती किंवा घोडे या पाण्यांचा वापर त्यावेळस होत असे. सगळीकडे घनदाट जंगल होते. हत्ती, वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, कुत्रे यापासून जीवाचे रक्षण करणे महत्वाचे होते. अचानक एक गोरा शिपाई शिरूर छावणीत त्याचे आगमन झालेले पाहून शिरूर छावणीचे गोरे अधिकारी ही अचबिंत झाले.  त्या गोऱया शिपायाने मी कमांडर बटर्नरचे पत्र घेऊन आलो असल्याचो सांगितले. बटर्नरचे पत्र वाचल्यानंतर शिरूर छावणीतील गोऱया अधिकाऱयांना घाम सुटला. लेफ्टनंट कर्नल फिल्समन या गोऱया अधिकाऱयांना पत्र वाचल्यानंतर जो घाम सुटला आणि जी त्यांची दयनीय अवस्था झाली ती खरोखरच पाहण्यासारखी होती. अतिशय कडाक्याची थंडी असूनही त्याला घाम सुटला होता. जणु तो काही घामाने न्हाऊनच निघाला होता. असे काय होते त्या  पत्रामध्ये लिहिलेले. त्या पत्रामध्ये कमांडर बटर्नर कळविले होते की, दुसरा बाजीराव पेशवा 25000 सैन्य घेऊन पुणे काबिज करण्यासाठी येत आहे. शस्त्रास्त्रासह तो अफाट फौज घेउढन येत आहे. पुण्याकडे आगेकुच करत आहे. तेव्हा पुण्यातील ब्रिटीश आर्मीकडे फौज कमी आहे. तुम्हीसुद्धा फौज फाटा घेऊन यावे. सध्या चाकणे या ठिकाणी पेशव्यांची फौज तळ ठोकून आहे. तर पेशवे सैनिकांच्या पाठीमागे जनरल स्मिथ आपल्या फौजेनिशी पाठलाग करत आहे. लेफ्टनंट कर्नल फिल्समनने सर्व पत्र वाचले आणि तो स्वतशीच विचार करू लागला. येणाऱया पसंगाला कसे तोंड द्यायचे असा तो विचार करू लागला. पेशव्यांना भूईसपाट करण्यासाठी जर कुठली शुर, वीर, आणि धाडसी जमात असेल तर ते फक्त महार सैनिक आहे हे त्याच्या लक्षात आले. लेफ्टनंट कर्नल फिल्समन महारसैनिक असलेल्या बॉम्बे इन्फंट्रीच्या पहिल्या रेजिमेंटची दुसरी बटालियन त्याला डोळ्यासमोर दिसू लागली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता पुढील कारवाई त्वरीत सुरू केली.  या महारसैनिक असलेल्या बटालियनमध्ये 500 महारसैनिक होते.
फिल्समन कर्नल फिल्समन यांच्या नेतृत्वाखाली शिरूर ते कोरेगाव येथपर्यंत पायी चालत आले होते. पेशव्यांना धुळ कशी चारायची याचीही योजना करण्यात आली होती. ही लढाई डोंगरावर किंवा कोणत्या किल्ल्यावर होणार नव्हती तर ही लढाई समोरासमोर सपाट जमिनीवर होणार होती. ब्रिटिश सैनिकांची आणि पेशव्यांची भेटगाठ भिमाकोरेगाव येथे पडली. आणि येथून पुढे जे घडले त्याची कोणी कल्पनाही करणार नाही. पेशव्याच्या अफाट सैनिकांनी महारसैनिकांवर हल्ला चढविला त्यावेळी महारसैनिक बेसावध होते. पेशवे कोणत्याही क्षणी हल्ला करतील याची त्यांना कल्पना होतीच. महारसैनिकांनी अत्यंत चालाखीने पेशव्यांना घेरले. धाडसी शुर, वीर, महारसैनिक ही आपल्या जिवाची पर्वा न करता पेशव्यांच्या सैनिकावर तुटून पडली. तलवारीला तलवारी भिडल्या होत्या. सपासप एकदुसऱयावर वार होत होते. पेशव्यांचे मुडदे पडल्या जात होते. एकटा म्हणजे एक महारसैनिक 40 ते 50 पेशवे सेनिकाबरोबर लढत होते. आपल्या जिवाची पर्वा न करता महारसैनिक शत्रु वर तुटून पडले होते. छातीला छाती भिडवून, तलवारीला तलवार भिडवून, न घाबरता न डगमता, शत्रूवर वार करून त्यांना धरणीवर लोळवले जात होते. आणि घरादाराची बायकापोरांची पर्वा न करता ते शत्रुशी लढत होते. डर, भीती, म्हणजे काय हे महार सैनिकांना माहित नव्हते. बस शत्रूचा नायनाट कसा करायचा, हे त्यांना माहित होते. शेवटचा श्वास असे पर्यंत महारसैनिक लढत होते. जिकडे बघावे तिकडे पेशव्यांचे मुडदे पडलेले होते. कुणाचा हात, तर कुणाचे डोके कलम करण्यात आले होते. एवढ्यात ब्रिटीश सैनिकाने आपल्या कमांडरास माघार घेण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा या घटनेची कुणकुण महारसैनिकांना लागली तेवढ्यात एक महारसैनिक जोरात कडाडला , `साहब, डरो मत... और भागने की मत सोचो... ये महार सैनिक अपने जान की बाजी लगा देंगे' हे धाडसी शुरवीर महारसैनिकांचे विचार ऐकून ब्रिटीश अधिकाऱयांचा उत्साह अजुनच वाढला. महारसैनिक किती बलवान शक्तीशाली शुरवीर आणि धाडसी आहेत. हे ब्रिटीश सैन्यांनाही कळून चुकले होते. महारसैनिक आणि पेशव्यात तुंबळ युद्ध सुरूच होते. जवळपास महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण उडवली होती. अनेकांना धरणीवर लोळविले होते. ब्रिटीश सैनिक थोड्याफार पमाणात डगमगत होते. पण महारसैनिक मुळीच डगमगत नव्हते. उलट महारसैनिक कडाडले `साहेब आखरी गोली आखरी दुश्मन ' शेवट दुश्मनला शेवटच्या गोळीने आम्ही ठार करू.
महारसैनिक मरणाला कधीच घाबरत नाही. तलवार, चालाखबुद्धी आणि मनगटाच्या जोरावर लढाई चालूच ठेवली. तलवारीला तलवार भिडत असलेल्या आवाज सैनिकांच्या कानात गुंजत होता. घनघोर चाललेल्या लढाईत सैनिकांच्या अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. बरेच सैनिक रक्ताने माखले होते. या लढाईत पेशव्यांचा सरसेनापती बापू गोखले यांचा थोरला मुलगा बाबा लढाईत मारला गेला होता. त्यामुळे ही खबर बापू गोखल्यांच्या कानावर पडली त्यामुळे पेशवे सैनिक घाबरून विचलीत झाले होते. त्यांचे अवसान गळून पडले. बापू गोखलेंनी आपल्या मुलाचा देह मांडीवर ठेवला आणि तो मोठमोठ्याने हांबरडा फोडू लागला. सुर्य उगवले का असतांनाही त्याला अंधार वाटू लागला होता. त्यामुळे पेशव्यांचे उरले सुरले सैनिक घाबरून जिकडे रस्ता मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. पळण्यात आपली भलाई आहे नाही तर महारसैनिक आपल्याही ठार करतील. अशापद्धतीने पेशव्यांचा हजारो सैनिकांची महारसैनिकांनी दाणादाण उडवली तर काहींना पळती भूई थोडी करून टाकली. बापू गोखल्यांचा थोरला मुलगा या लढाईत मारला गेल्यामुळे बापू गोखल्यांची स्थिती नाजुक आणि भित्रत झाली होती.
ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी घडली. पेशव्यांनी केलेल्या जुलमांचा हा एकपकारे बदलाच होता. आधीच महार सैनिकांच्या उरात अन्याय आणि अत्याचाराची आग धगधगतच होती. कधीतरी ह्या आगीने अन्याय, अत्याचार करणाऱयांना धडा शिकवायचाच होता आणि तसेच घडले. या लढाईत जाबाज महारसैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून त्याग आणि बलिदान देऊन भिमा कोरेगावच्या युद्धात विजय मिळवून दिला. आम्हाला आणि बहुजन समाजाला सार्थ अभिमान राहिल. 
                                                                            
                                                                                                                  शिवाजी  कांबळे 

Translate