Monday, January 21, 2013

काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे


काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे
दैनिक ‘एकमतच्या दि. २५-१२-२०१२ च्या अंकातील वाचककट्ट्यामध्ये शिवाजी कांबळे यांचे ‘अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई या मथळ्याचे प्रसिद्ध झालेले पत्र वाचले. त्यांच्या पत्राचे शवविच्छेदन करावे व त्यांच्या कुविचारांची नांगी वेळीच ठेचावी हा या लेखनामागचा हेतू. कोणत्याही घटनेचा व प्रसंगाचा विचार
माणसाने कालसापेक्षच केला पाहिजे नसता काल-विपर्यासामुळे चुकीचा निष्कर्ष निघतो. ऐतिहासिक घटनांचा विचार कालसापेक्षच करावा म्हणजे कोणावर अन्याय होत नाही. तत्कालीन मूल्यांतूनच गतकालीन घटनांचे मूल्यमापन करावे. विद्यमान मूल्यांतून गतकालीन घटनांचे मूल्यमापन करण्याची घोडचूक शिवाजीराव कांबळे करीत आहेत. रछत्रपती शिवाजी महाराजांना भवानीमाता प्रसन्न होती. प्रसन्न होऊन देवीने दिले काय तर भवानी तलवारच! का देऊ नये तिने अ‍ॅटमबॉम्ब, नायट्रोजन बॉम्ब वा एखादे लांब पल्ल्याचे मिसाईल? शिवाजी महाराजांनी अफझलखानचे हृदयपरिवर्तन न करता त्याला ठारच केले व औरंगजेबाच्या दरबारात सत्याग्रहाचा मार्गाचा अवलंब न करता,‘शक्तीने मिळती राज्ये युक्तीने कार्य होतसे,ङ्क हाच मार्ग चोखाळला. ज्या ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवण्याचा व निर्जीव qभत चालवण्याचा चमत्कार केला. चमत्कार सोडून द्या पण वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा व एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा महान योग साधला. त्या योगीयाच्या राजाला निवृत्ती सोपान मुक्ताबाई या भावंडांना घेऊन पैठणच्या कर्मठ व सनातनी ब्राह्मणांकडे पायपीट करीत जाऊन प्रमाणपत्र आणण्याची काय आवश्यकता होती, त्या काळात ती होती हेच आजच्या या प्रश्नाचे एकमेव उत्तर आहे.काळाची गती, विज्ञानाची प्रगती, औद्योगिकीकरण या विक्रीकरण यांचा रेटा जबरदस्त असतो. त्यात शिक्षणाची भर पडली की परिवर्तनाला लक्षणीय गती येते. १९५० साली मी
सातवीला होतो. आमच्या घरी वडिलांची आत्या होती. फारच कर्मठ व सनातनी तिचे सोवळे ओवळे फारच जाचक. तिच्या तुलनेत माझी आई फारच उदारमतवादी. माझे सहकारी सर्वश्री साबणे, कांबळे, वाघमारे, ताटे, आदोडे, उजगरे, लोंढे, क्षीरसागर माझ्या घरी निमित्ताने जेवावयास येत. ते सर्व माझ्या पाटाला पाट व ताटाला ताट लावून जेवत.माझी आईच पंक्तिप्रपंच न करता मायेने वाढीत असे. मी ज्या काळात सातवीला होतो त्या साली पु.साने गुरुजींनी निराश, उदास होऊन उद्विग्नतेने झोपेच्या गोळ्या गिळून जीवनयात्रा संपविली.त्यांची आई त्यांच्या बालपणी, कोकणातल्या पालगड गावी, समाजावर
सनातनी व कर्मठांच्या कर्मकांडाचे वर्चस्व व प्रस्थ होते. त्या काळात प्रथेप्रमाणे अस्पृश्यता पाळत होती. तरी तिचे अंतःकरण करुणेनेव भूतदयेने भरून ओसंडत होते. हे न लक्षात घेता तिच्यावर दोषारोप करून आक्षेप घेणे
कमालीच्या असहिष्णू वृत्तीचे व निष्ठूरपणाचे निदर्शक आहे. अशा माणसाला मी एकारलेल्या विचाराचे संबोधतो. अशा माणसाला काकदृष्टी व गिधाडाचीच चोंच असते.
                                    -राजेश्वर शिवाजी देशमुख
                                पेठ परळी वैजनाथ, जि. बीड.

बुरसटलेल्या विचारांचे राजेश्वरराव


बुरसटलेल्या विचारांचे राजेश्वरराव
   मी ‘एकमतच्या २५ डिसेंबरच्या अंकात वाचक    कट्यामध्ये अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई, या         मथळ्याखाली एक पत्र लिहिले होते. पावित्र्याच्या मखरात बसविलेली शामची आई कशी अस्पृश्यता पाळणारी, जातीयवादी होती, हे मी पुराव्यानिशी त्या पत्रात दिलेले आहे; पण माझ्या एका पत्रामुळे पेठ, परळी वैजनाथ येथील बुरसटलेल्या आणि मनुस्मृतीचा समर्थक असलेल्या राजेश्वर देशमुखांचा जळफळाट झालेला दिसतोय. त्यांनी १५ जानेवारी २०१३ च्या ‘एकमतङ्कच्या अंकात काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे या मथळ्याखाली  कालसापेक्षतेच्या नावाखाली चातुवण्र्य व्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे समर्थनच  केले आहे. माझ्या मूळ पत्राशी कसलेही ताळतंत्र नसलेले दाखले देऊन जे काही त्यांनी विद्वतेचे दिवे पाजळले आहेत तेच सत्य आहे, असा चुकीचा संदेश वाचकांत जाऊ नये म्हणून हा पत्रप्रपंच करीत आहे. माझ्या पत्रात देशमुखांना नेमके काय खटकले? हे त्यांनी सांगितलेले नाही. मी सानेगुरुजींच्या सामाजिक आणि संस्कार चळवळीतील योगदान नाकारलेले नाही; पण याचा अर्थ असा नव्हे की, सानेगुरुजींच्या साहित्यकृतीवर, टीका वा चर्चाच होऊ नये. बाबा वाक्य प्रमाणम् हे कसे चालेल? कोणत्याही घटनेचा व प्रसंगाचा विचार माण-साने कालसापेक्षच केला पाहिजे, असे ते नमूद करतात. याचाच अर्थ इतिहासात जी अस्पृश्यता पाळली जात होती, दलितांना महारोग्यांसारखी वागणूक मिळत होती, ते काळानुरुप योग्यच होती. त्यामुळेच श्यामच्या आईला अस्पृश्यता पाळावी लागली, असा बालिश युक्तिवाद देशमुखांनी केला आहे. यातून श्यामची आई अस्पृश्यता पाळत होती हेही त्यांनी ओघाने कबूल केले आहे.               देशमुखसाहेब, महापुरुष वा इतिहासातील आदर्शांचे विचार कधीच कालसापेक्ष नसतात. ज्यांच्याकडे प्रवाहाविरुद्ध जाण्याची निर्भयता असते, अनिष्ट रूढी-परंपरांचे चक्रव्यूह भेदण्याची ज्यांच्याकडे जिगर असते तीच माणसे   महामा-नव बनतात. सर्वांनाच तेवढी प्रतिभा नसते qकवा समाजाचे नेमके आकलन करून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळेच महामानवाने शोधलेल्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न लोक करीत असतात. आजही आपण महापुरुषांच्या विचारांचे, प्रसंगाचेच दाखले देत असतो.
  जसे तुम्ही तुमच्या पत्रातही संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवरायांचे दाखले दिले आहेत पण ते चुकीच्या पद्धतीने दिले आहेत. माझ्या मूळ विषयाशी त्याचा काहीएक संबंध नसलेले. देशमुख यांच्या पत्रावरून हेच सिद्ध होते की, आजही मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती अजूनही जिवंत आहे. ते सरळ सरळ समतेचा तिरस्कार आणि विषमतेचा पुरस्कार करतात. दोन-चार दलित मित्रांना घरी नेऊन जेऊ घातले हे सांगणे हीसुद्धा अस्पृश्यतेचीच भावना आहे. या प्रसंगाचे भांडवल करून आपणही पुरोगामी हेच कदाचित त्यांना सांगावयाचे असेल. देशमुखसाहेब यातून आपण फार मोठे समाज परिवर्तन केलेत त्याबद्दल आपले अभिनंदनच केले पाहिजे. मनुवाद्यांनी निर्माण केलेली चातुवण्र्य व्यवस्था, भेदभाव, द्वेषभाव हे देशमुखांना कालसापेक्षतेच्या नावा-खाली योग्य वाटत असतील तर त्यांनी खुशाल वाटू द्यावे, मी तसे करू शकत नाही.
   समाजात बुरसटलेल्या विचारांची, जातीयवादी प्रवृत्तीची कांही तथाकथित मंडळी लोकांचा बुद्धिभेद सातत्याने करीत असतात. त्यांचे अमानवी विचार हाणून पाडणे हेच परिवर्तनवाद्यांसमोरील आजचे खरे आव्हान आहे.
                                                                           -शिवाजी कांबळे
                                                                             सोनानगर, लातूर

Wednesday, January 2, 2013

विद्येची खरी देवता

                                                  


                                           आपल्या सर्वांची खरी आई, विद्येची खरी देवता 
                                         क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना विनम्र अभिवादन !


आज ३ जानेवारी सावित्रीमाईंची जयंती. त्यानिमित्ताने सावित्रीमाईंचे जीवनकार्य इथं सांगणं म्हणजे केवह उपचार ठरेल. माईंचे कार्य, जीवन सर्वांना माहित असलेच पाहिजे. ते गृहीतच आहे. असे म्हणतात संत ज्ञानेश्वरांनी भींत चालवली, पण चार भींतीचे घर स्त्री एकटी चालवते. त्याचं काय? स्त्रीला जगत जननी म्हणून संबोधले जातं. जिल्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, स्त्री-पुरुष समानता आली पाहिजे, असा डीढोरा आज सर्वत्र पिटला जातो. सरकार, विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्तेही मोठा आव आणत स्त्री स्वातंत्र्याच्या आणि महिला अत्याचार विरोधी तास न तास बौद्धिक गप्पा मारत असतात. पण अलिकडे देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी या सगळ्या बुद्धिवाद्यांच्या थोबाडीत चपराक मारली आहे. सद्या आपल्या भारत देशात महिला अत्याचार, बलात्काराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडत नव्हते असे नाही, पण आता या प्रकरणांना वाचा फुटते आहे. सावित्रीमाईच्या लेकींवरील अत्याचारानं कळस गाठलाय. ज्या काळात स्त्रीयांना भोगवस्तू म्हणून संबोधलं जाई, स्त्री स्वातंत्र्याची भाषा करणं, तिनं शिक्षण घेणंही पाप समजलं जाई. अशा काळात सावित्रीमाईंनी मुलींना शिक्षणाचे दारे खुली करुन दिली. सावित्रीमाई भारतातील आद्य स्त्री शिक्षिका ठरल्या. शिक्षणासारखे अत्यंत पवित्र कार्य करणा-या सावित्रीमाइंचा आदर्श, राष्ट्रमाता जिजाऊंचा, रमाइंमातेचा आदर्श आपल्या सर्व तरुणाईसमोर असताना देशातील महिला-मुलींवर अत्याचार होतात. ही बाब देशाच्या दृष्ठीने अत्यंत लाजीरवाणी आहे. भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला व्यक्ती म्हणून स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. परंतु धर्मशास्त्राने अनेक वर्षांपासून तिला भोगवस्तू, दासीचा दर्जा दिला आहे. त्याची चिकित्सा कोणी करायलाच तयार नाही. स्त्रीया आजही अनिष्ट रुढी,परंपरेच्या बळी ठरत आहेत. जोपर्यंत भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. समाजाची स्त्रीयांकडे पाहण्याची मानसिकता बदलत नाही. लोकशिक्षण होत नाही. तोपर्यंत परिवर्तनाची अपेक्षा करणं म्हणजे पालथ्या घडयावर पाणीच.
हे तर षडयंत्र.........
दुसरा मुद्दा म्हणजे दलित-बहुजनांचे अत्यंत महत्वाचे प्रतीक असणाèया दिवसीच काळा दिवस पाळला जात आहे. ६ डिसेंबर हाही काळा दिवस पाळण्यात येतो. संविधान दिवसी बहिष्काराचे आवाहन केले जाते आणि आता ३ जानेवारीला सावित्रीमाईंच्या जयंती दिनी काळा दिवस पाळण्याचे आवाहन. अखेर प्रत्येक वेळी विरोध, निषेध व्यक्त करण्यासाठी दलित, बहुजन नायकांच्या प्रतीकांनाच लक्ष्य का केले जाते ? हा संयोग कसा असू शकतो, हे तर विचारपूर्वक केलेले षडयंत्र वाटते.
                                                                         ...........शिवाजी कांबळे


Translate