Saturday, August 10, 2013

मराठीतील पहिला अ‍ॅनिमेशनपट ‘छत्रपती शिवाजी '



लातूरकरांची ऐतिहासिक कलाकृती
.............................................
 लातूरचे चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अझहर खान आणि त्यांच्या टीमने ‘छत्रपती शिवाजीङ्क हा मराठीतील पहिला ऐतिहासिक अ‍ॅनिमेशनपट तयार  केला असून नुकताच हा अ‍ॅनिमेशनपट महाराष्ट्रात सर्वत्र रुपेरी पडद्यावर झळकला आहे. मनोरंजनाबरोबरच बालप्रेक्षकांना छत्रपतींचा इतिहास कळावा, या हेतून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाला बालकांसह पालक, शिक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाबद्दल घेतलेला हा आढावा...
....................................................
 मराठवाडा मागासलेला आहे, म्हणून या भागाला नेहमी हिणविलं जातं. परंतु वेळोवेळी मराठवाड्याने राजकारण, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली गुणवता सिद्ध करून अटकेपार झेंडा फडकावला आहे. विकासाकडे वाटचाल करणारे लातूर शहर तर यामध्ये आघाडीवर आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख हे चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच  बीपी (बालक-पालक) या  चित्रपटाची निर्मिती केली, त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. त्यानंतर पेशाने शिक्षक असलेले लातूरचे अझहर खान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर ‘छत्रपती शिवाजी : द एम्परर ऑफ पीपल्स प्राईडङ्क हा अ‍ॅनिमेशनपट तयार करून सिनेजगतात एक वादळ निर्माण केले आहे. मराठीतील हा पहिलाच अ‍ॅनिमेशनपट ठरला आहे. गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रात केवळ पाच चित्रपट तयार झाले आहेत. ही खूप खर्चिक अशी बाब आहे. त्यामुळे अ‍ॅनिमेशनपट काढण्याचे धाडस सहसा कोणी करीत नाही. मात्र, लातूरकरांनी हे धाडस करून इतिहास घडविला आहे. अझहर खान हे लातूरमध्ये मॉरेल मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करतात. त्यांनी आपल्या अमन अनम प्रॉडक्शनद्वारे त्यांच्या संस्थेतील अ‍ॅनिमेशनचे शिक्षक आणि विद्याथ्र्यांच्या कौशल्याचे सहकार्य घेऊन या ऐतिहासिक अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती केली. अझहर खान यांनी छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास मांडला आहे. छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. एक आदर्श जाणता राजा म्हणून त्यांची ओळख भारत खंडात आहे. त्यांचा इतिहास आजपर्यंत कथा, कादंबèया आणि इतिहासाच्या पुस्तकातून मांडण्यात आला. काही बोटांवर मोजण्याइतपत चित्रपटही निघाले. मात्र, आतापर्यंत त्यांच्या चरित्रावर अ‍ॅनिमेशनपट कुणी तयार केला नव्हता. अ‍ॅनिमेशन qकवा कार्टून म्हटले की, लहान मुलांना लवकर आकर्षित करणारे माध्यम आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांची शौर्य कथा विद्याथ्र्यांसमोर मांडावी आणि मनोरंजनातून त्यांचे प्रबोधन व्हावे, कारण ज्यांना आपला इतिहास माहित असतो, तेच इतिहास घडवू शकतात, या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली असून, याचा निश्चितच विद्याथ्र्यांच्या जडणघडणीवर काहीअंशी चांगला परिणाम होईल, यात शंका नाही, असा विश्वास या अ‍ॅनिमेशनपटाचे निर्माते, दिग्दर्शक अजहर खान यांनी दैनिक एकमतशी बोलताना व्यक्त केला.
‘छत्रपती शिवाजीङ्क हा अ‍ॅनिमेशनपट बाल प्रेक्षकांसाठी जेवढा उद्बोधक आहे, तेवढाच मनोरंजक आणि वीररसाने परिपूर्ण असा चित्रपट आहे. मराठीसह qहदी, तामिळी, तेलुगू आणि इंग्रजी अशा पाच भाषांत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही खान यांचेच आहेत. त्यांना जगमोहन कपूर, कार्तिकेय तिवारी आनंदqसग आदी नामवंत तज्ज्ञांनी सहकार्य केले आहे. या चित्रपटाला राम गौतम व कार्तिकेय तिवारी यांनी अप्रतिम असे संगीत दिले आहे. चित्रपटात सहा गाणी असून सुप्रसिद्ध गायक कैलास खेर, अमेय दाते, संजीवनी, जावेद अली, साधना सरगम आणि मधुश्री यांनी गायिली आहेत. त्यांच्या या गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. या चित्रपटाची पूर्णपणे डिजीटल टेक्नॉलॉजी आहे. या अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग जर्मनीहून करून आणली आहे. अतिशय महागड्या तंत्रज्ञांनाचा वापर करून चित्रपट आकर्षक आणि प्रभावी तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी राज्यात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी शासनाने हा चित्रपट टॅक्स फ्री केला. त्यामुळे  या चित्रपटाने गेल्या आठवड्यात ९६ टक्के व्यवसाय मिळविला आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो, असेही खान यांनी सांगितले. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूरमध्ये पीव्हीआर आणि बिग सिनेमा या थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी झुंबड उडालेली दिसून येत आहे. पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न या प्रमुख शहरांतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 या चित्रपटाच्या निर्मितीचे मोठे आव्हान होते. तथापि, लातूरकरांवर अपार प्रेम करून सर्वांनाच प्रोत्साहन देणारे आमचे प्रेरणास्थान माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी प्रारंभी मदतीचा हात आणि प्रेरणा दिल्याने चार वर्षांच्या अथक परिश्रमातून हे कार्य पूर्ण केले. या ऐतिहासिक कार्यामागे साहेबांचीच खरी प्रेरणा आहे. त्यामुळे हा अ‍ॅनिमेशनपट त्यांनाच समर्पित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
   यात शिवरायांच्या जन्मापूर्वीचा काळ, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती, शिवरायांचा जन्म, बालपण ते शिवराज्याभिषेक असे प्रसंग घेतले असून, यामध्ये एकूण वेगवेगळे ५६ प्रसंग चितारले आहेत. यामध्ये सलग ११ लाख चित्र आहेत. चित्रपटातील रिमिक्सही खरोखरच अफलातून  आहे.
या चित्रपटाची कथा लिहिताना कोणताही वाद ओढवून घेतलेला नाही. शासनाला जो छत्रपती शिवरायांचा इतिहास मान्य आहे, तोच इतिहास चितारण्यात आला आहे. शिवरायांचे कृषी धोरण, सीमा सुरक्षा, समुद्रीतट असे विविध विषयही हाताळले आहेत. अ‍ॅनिमेशन हे बालमनोरंजनाचे उत्तम साधन असल्याने  आणि मुले शौर्यप्रिय असल्याने त्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास कळावा, हा या चित्रपटाचा हेतू असल्याचा पुनरुच्चार अझहर खान यांनी केला. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर द मॅन ऑफ सेंच्युरी या नावाने अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होईल. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा संकल्प असल्याचे निर्माता-दिग्दर्शक अजहर खान यांनी सांगितले.
बॉक्स..............
  या अ‍ॅनिमेशनपटाची वैशिष्टये
 *छत्रपती शिवाजी महाराजांवरील जगातला पहिला अ‍ॅनिमेशनपट.
* विद्याथ्र्यांनी विद्याथ्र्यांसाठी तयार करण्यात आलेला पहिलाच चित्रपट.
*लातूरसारख्या ग्रामीण भागातील शिक्षक, विद्याथ्र्यांची अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानामध्ये गरुडझेप.
*मराठीतील सर्वांत बिग बजेट चित्रपट.
*१३ चित्रपट चॅनलनी कव्हरस्टोरी बनविली.
*एकूण पाच भाषा मराठी, तेलुगू, इंग्रजी, तामिळ आणि qहदी भाषातून एकाचवेळी प्रदर्शित होणारा चित्रपट.
 लोकनेते विलासराव देशमुख यांना समर्पित !
छत्रपती शिवरायांप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख  साहेबांनीही महाराष्ट्रात एक आदर्श राज्य करून दाखविले. ‘छत्रपती शिवाजीङ्क या अ‍ॅनिमेशनपटाला साहेबांचीच खरी प्रेरणा आहे. साहेबांनीच प्रोत्साहन आणि मदतीचा हात दिला म्हणूनच या चित्रपटाचा प्रकल्प पूर्ण होऊ  शकला. साहेबांच्याच हस्ते या चित्रपटातील गाणी १९ फेब्रुवारी २०११ रोजी लॉन्चिग करण्यात आली. साहेबांच्याच संस्कारात वाढलो, मोठा झालो. वडिलांनी मला जन्म दिला आणि साहेबांनी मोठे केले. त्यामुळे हा अ‍ॅनिमेशनपट साहेबांनाच समर्पित केला आहे. शिवाय या चित्रपटासाठी आमदार अमित देशमुख आणि सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनीही वेळोवेळी हातभार लावला. त्यांचेही आभार मानतो, असे निर्माता-दिग्दर्शक अझहर खान यांनी भावूकपणे सांगितले.
लातूरकरांची भरारी सातासमुद्रापार...
शिवरायांवरील अ‍ॅनिमेशनपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्येही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या माध्यमातून लातूरकरांनी सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. त्यातच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर द मॅन ऑफ सेंच्युरी या नावाने अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होईल. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा संकल्प असल्याचेही निर्माता-दिग्दर्शक अजहर खान यांनी सांगितले. या माध्यमातूनही ते मोठी झेप घेऊ शकतात.
रितेश देशमुख यांच्या हस्ते प्रोमोचा शुभारंभ
६ जानेवारी २०१३ रोजी मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजीङ्क या अ‍ॅनिमेशनपटाचा प्रोमो सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी रितेश देशमुख यांनी लातूरचे दिग्दर्शक, निर्मात्यासह सर्व कलावंताचे कौतुक करून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. निर्माता अझहर खान व त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांचे आभार मानले.
अ‍ॅनिमेशनची ‘एबीसीडीङ्क माहित नसलेला दिग्दर्शक
‘छत्रपती शिवाजीङ्क या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे अझहर खान हे जरी महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ  फॅशन अ‍ॅण्ड इंटेरिअर आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य असले तरी त्यांना चार वर्षांपूर्वी अ‍ॅनिमेशनची साधी एबीसीडी सुद्धा माहित नव्हती. परंतु त्यांनी आपल्या महाविद्यालयातील अ‍ॅनिमेशनच्या शिक्षकांकडून ते कौशल्य अवगत करून घेतले. आपण तज्ज्ञ नसलो तर त्याबाबत जाणकार मात्र आहोत, असे ते सांगतात.
चित्रपटाची रेंडरिंग जर्मनीत
 या अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग ही जर्मनीतून करून आणली आहे. कारण अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग म्हणजे जे चित्र असतात, त्यांना उत्कृष्टरित्या पॉलिश करण्याचे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान भारतात केवळ मुंबईत आणि त्यानंतर स्वित्झर्र्लंंड आणि जर्मनीत उपलब्ध आहे. आपल्या देशात ही प्रक्रिया खूप महाग असल्याने चित्रपटाची रेंडरिंग जर्मनीतून करण्यात आली आहे.
अशी सूचली चित्रपट कथा
 अझहर खान यांच्या शिक्षण संस्थेतील अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाèया शिक्षकांनी घोडे आणि हत्तीचे जिवंत चित्र संगणकाच्या स्क्रीनवर तयार केले आणि या चित्रातूनच अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याची प्रेरणा घेऊन लातूरकर असलेल्या निर्माता, दिग्दर्शक अजहर खान यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा निश्चय केला आणि चार वर्षांत त्यांनी हा आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण करून अ‍ॅनिमेशनपटातून शिवरायांचे चरित्र मांडले.
                     
                                                      -  संपादन : शिवाजी कांबळे,मोबा ९०११३०८५८०

माक्र्स आणि आंबेडकरवादाचे ‘फ्युजन'


..............................................................
 लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या उभ्या आयुष्यात जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा यांच्या सीमा तोडून दीन-दलितांसाठी त्यांनी आपली लेखणी झिजविली. दलित, पीडित, शोषित, बहिष्कृत, तिरस्कृत, कष्टकरी बहुजन समाजाच्या गुलामीचे, बंडाचे, जगण्याचे चित्रण अफलातून निर्माण केले. आज त्यांची जयंती. त्यांची जयंती कर्मकांड ठरू नये म्हणून त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच अण्णा भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल.
..........................................................
लोकशाहीर, साहित्यरत्न क्रांतिवीर  तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक लोकशाहीर, कथा-कादंबरीकार म्हणून परिचित असले तरी ते क्रांतिकारी विचारवंत, राष्ट्रनिर्माते होते.  मानवमुक्तीच्या लढ्यासाठी समाजपरिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाèया अण्णा भाऊंची मात्र जिवंतपणी आणि निर्वाणानंतरही उपेक्षा झाली असली तरी त्यांच्या विचारांची धग आजही समाजमनात कायम आहे पण आज आम्ही महापुरुषांची वाटणी करून घेतली असून त्यांच्या नावाखाली निरर्थक वाद निर्माण करून चळवळीचे तीनतेरा करीत आहोत. एकमेकांपासून दूर जात आहोत. तो मांग आहे, तो महार आहे, मातंग समाजातील अण्णा भाऊंचे समर्थक म्हणवून घेणारे आंबेकरवाद्यांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात तर काही आंबेडकरवादी मातंगांना हीन लेखतात. एवढेच नाही तर बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांमध्येही काही अंशी अशीच स्थिती आहे. त्यामुळेच परिवर्तनवादी बहुजनांच्या चळवळींची वाताहत झाली. आताशा तर पावसाळ्यातल्या छत्र्याप्रमाणे चळवळ गटा-गटांत विखुरलेली दिसून येत आहे.  काही ना-लायक नेत्यांनी जाती-पोटजातीचे सुरू केलेले राजकारण, समाजकारणच त्याला कारणीभूत आहे. तथागत गौतम बुद्ध, समतावादी लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची गुंफण एक आहे हे अद्यापही समाजमनात रुजलेच नाही.
      या थोर महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसवून त्यांना संकुचित करणे  हे वैचारिक दारिद््रय नाही तर काय? व्यक्तिपूजक बनण्यापेक्षा या महापुरुषांचे विचार आचरणात आणणे ही खरी काळाची गरज आहे. अण्णा भाऊ कम्युनिस्ट होते की आंबेडकरवादी होते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र चर्चा करणाèयांनी कितीही चर्चा केली तर ती निरर्थकच ठरेल यात शंका नाही. कारण अण्णा भाऊ माक्र्स आणि आंबेडकरवादाचे एक रसायन होते  हेच  चर्चेअंती स्पष्ट होईल.परवा नामवंत आंबेडकरी विचारवंत आणि नाटककार दत्ता भगत यांनी एका वृत्तपत्रातील लेखात आपणास माक्र्सबद्दल अपार आदर असल्याचे नमूद करीत माक्र्सवादाला विरोध करणाèया पोथीनिष्ठ आंबेडकरवाद्यांचा समाचार घेतला. भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीविरोधात माक्र्सचे विचार होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यांसमोर भारतातल्या जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीचे स्वरूप होते. अण्णा भाऊ  कम्युनिस्ट होतेच पण ते आंबेडकरवादी होते हे त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने जाणवते. कारण देशाच्या अधोगतीस जात हीच संकल्पना कारणीभूत आहे. जातीच्या गुलामगिरीतून बाहेर पडल्याखेरीज सामान्य लोकांची प्रगती होणार नाही.
    अण्णा भाऊंनी या जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला. जात, वर्ण, भेद यांच्या सीमा त्यांनी नाकारल्या.  अण्णा भाऊंनी शाहिरी, कथा-कादंबरी, तमाशाला  प्रतिष्ठा मिळवून दिली. याच कलांच्या माध्यमातून त्यांनी कष्टकरी जनतेत अन्याय-
अत्याचारांविरुद्ध जागृती आणली. सामाजिक न्यायासाठी ते आयुष्यभर झगडले. आपल्या साहित्यातून सत्याला महत्त्व दिले. अण्णा भाऊंनी क्रांतिqसह नाना पाटील यांचे रेठरे (बु.) च्या जत्रेतील तमाशाच्या फडात भाषण ऐकले. तेव्हा अण्णा भाऊ हे त्यांचे मावसभाऊ बापू साठे यांच्या तमाशा फडात काम करीत होते. तेव्हापासून अण्णा भाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा मिळाली. अण्णा भाऊंचे कुटुंब सांगलीहून मुंबईला आले आणि अण्णा भाऊ कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले. या काळात त्यांची वैचारिक जडणघडण झाली.  तद्नंतर ‘चले जावङ्क चळवळीत ते सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध वॉरंट निघाले आणि  अण्णा भाऊंना कायमचे घर सोडावे लागले. त्यानंतर अण्णांनी मुंबई गाठली आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. पक्षाच्या प्रचारासाठी १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटाङ्क  कलापथकाची स्थापना केली. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर होते. अण्णांचे लिखाण  मात्र अखंडपणे सुरूच होते. दरम्यानच्या काळात ते रशियाचा दौराही करून आले. अण्णा भाऊंचा लढा सर्वांना माहीत असलाच पाहिजे आणि हे गृहीतच आहे. अण्णा भाऊंची जयंती कर्मकांड ठरू नये. अण्णा भाऊंची समतावादी, मानवतावादी चळवळ पुढे नेण्यासाठी आपणांस अण्णा भाऊ थांबले त्यापुढचे पाऊल टाकायचे आहे. हा दृढ निर्धार अण्णा भाऊ आणि बाबासाहेबांच्या समर्थकांनी करण्याची खरी वेळ आहे. अण्णा भाऊ  साठे यांच्या जयंती- निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन !!!
             
                                                                                          -शिवाजी कांबळे
                                                                                                 ९०११३०८५८०

Translate