Tuesday, July 16, 2013

दहावीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात चुकांची सेन्चुरी !


                                              शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराचा कळस
                                                                 शिवाजी कांबळे
लातूर :  राज्य शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिर्मित शालेय अभ्यासक्रमांच्या अनेक पुस्तकातील गंभीर चुका यावर्षी चव्हाट्यावर आल्या आहेत. आता दहावी वर्गाच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील इंग्रजी तृतीय भाषेच्या पाठ्यपुस्तकात शेकडो गंभीर चुका आढळून आल्या असून याचा थेट परिणाम विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक दर्जावर होत आहे.
त्यामुळे अशा चुकांना जबाबदार असणाèया दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे. 
    गेल्या काही दिवसांत पाठ्यपुस्तकांमधील काही चुकांवरून वादळ उठले आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाला इतिहास, भूगोलची मंडळे बरखास्त करावी लागली. नवव्या वर्गाच्या qहदीच्या पुस्तकातही अक्षम्य चुका समोर आल्या. आता २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून दहावी वर्गाच्या अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या  'English Reader A Coursebook in English (Standard X) ' या पाठ्यपुस्तकात १०१ चुका आढळून आल्या आहेत. शिक्षण मंडळातील तज्ज्ञ लेखक, शिक्षकांकडून छाननी, पुनर्विलोकन करून हे पुस्तक निर्दोष झाल्याचा दावा पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात या पुस्तकात गंभीर चुकांचा समावेश आहे.  अगदी ऋणनिर्देशात पृष्ठ क्र. ४ पासून ते शेवटचे पृष्ठ क्र. २०६ पर्यंत शब्दांचे स्पेलिंग (वर्णरचना), विरामचिन्हे, शब्दकोडे, पुनरावृत्ती, व्याकरण व अस्थानी छपाईत विविध प्रकारच्या शंभरावर चुका आहेत. प्रामुख्याने पृष्ठ क्र.४ वर Acknowledgement  मधील तिस-या परिच्छेदातील शेवटच्या ओळीतीर्ल  subsequent या शब्दातील"b' हे अक्षर गायब आहे. पृष्ठ क्र. १० वरApproach , Method and Techniques या शीर्षकाखालील सहाव्या ओळीच्या परिच्छेदात एकूण चार चुका आहेत. त्यात Maharashtra State या दोन शब्दांमध्ये ऑब्लिक (/) या चिन्हाची गरज नसताना टाकण्यात आले आहे. नियमानुसार साधा वर्तमानकाळाच्या वाक्यातील कर्ता एकवचनी व तृतीयपुरुषी असेल तरच त्यापुढे येणा-या  मुख्य क्रियापदास  "s ' प्रत्यय लागतो. मात्र येथे Underscores  असे छापण्यात आले आहे. पान क्र. ९ वर Approach , Method  या शीर्षकाखालील सहाव्या ओळीत practise  ऐवजी practice असे चुकीचे स्पेqलग छापले आहे. पान क्र. ५ वरA 8 Part II Q. 1 मध्ये  Result ऐवजी Reason असा चुकीचा शब्द छापण्यात आला आहे. पान क्र. १४ वरही अशीच चुक आहे.Traveller  ऐवजी  Traveler  अशी स्पेqलगमध्ये चुक आहे. पान क्र. ३० वर chidiya ऐवजी chidya, पान क्र. ३३ वर made  ऐवजी mad असे छापले आहे. अशा अनेक प्रकारच्या चुका या पुस्तकात आहेत. या चुकांच्या गोंधळामुळे विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक दर्जावर विपरित परिणाम होत असून शिक्षण खात्याने तात्काळ या चुकांची दखल घेऊन चुकांसाठी दोषींवर कारवाई करावी आणि  दुरुस्तीची उपाययोजना करावी किंवा पुस्तक बदलून द्यावे, अशी मागणी सुजाण पालक व शिक्षणप्रेमी जनतेतून केली जात आहे. 
बॉक्स..............
माजी गटशिक्षणाधिका-यांनी केली चुकांची यादी
३५ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापनाचे कार्य करून सेवानिवृत्त झालेले आणि देवणीचे माजी गटशिक्षणाधिकारी माणिक वाघमारे यांनी या दहावीच्या इंग्रजी पुस्तकातील चुका शोधून काढल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांनी १०१ चुकांची यादीच तयार केली असून अपेक्षित दुरुस्त्याही सूचविल्या आहेत. ‘माझ्या ३५ वर्षांच्या इंग्रजी अध्यापन कारकिर्दीत कोणत्याच क्रमिक पुस्तकात एवढ्या चुका आढळून आलेल्या नाहीत.ङ्क असे त्यांनी म्हटले आहे.  

Saturday, July 6, 2013

मस्ती, मजा आणि धमाल म्हणजे ‘फेकमफाक' : भरत जाधव



......................................
 एमईएफएसी प्रॉडक्शन्स निर्मिती संस्थेचा पहिलाच चित्रपट ‘फेकमफाक' हा १२ जुलैला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार  अभिनेता भरत जाधव हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्या निमित्ताने दै. एकमतशी त्याने या चित्रपटाबद्दल आणि इतरही विषयावर  दूरध्वनीवरुन मनमोकळ्या गप्पा मारल्या.   ‘फेकमफाकङ्क चित्रपट हा मस्ती, मजा आणि धमाल करणाèया थापाड्याची एक कहाणी असून ती लोकांनी आवर्जून पाहावी आणि आनंद घ्यावा, असे त्याने आवर्जून सांगितले.
......................................................................
प्रश्न : ‘फेकमफाकङ्क चित्रपटाबद्दल सांगा,  आपण या चित्रपटात कोणती भूमिका साकारली आहे?
 - दयानंद राजन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मी, ऋचिता जाधव, विजय चव्हाण, विजू खोटे आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात आहेत. सस्पेन्स कॉमेडी थ्रिलर असा चित्रपट असून   माझी भूमिका गोपीनाथ देसाई नामक मस्ती, मजा आणि धमाल करणाèया हाका मारत वस्तू विक्रेत्याची आहे. तो सतत थापा मारत असतो, त्यातून लोकांचे मनोरंजन करतो. पुढे त्याची एक थाप खरी ठरते आणि त्यातून सस्पेन्स थ्रिलर निर्माण होते. तेथूनच चित्रपट नवे वळण घेतो.
प्रश्न : या चित्रपटात तुमच्या कॅरेक्टरमध्ये
 नेहमीपेक्षा काही वेगळेपण आहे ?
- वेगळेपण आहे म्हणून चित्रपट बघायला लोक येत नाहीत. निखळ मनोरंजन हाच त्याचा उद्देश असतो. माझ्या भूमिकेत गरजेप्रमाणे वेगळेपण असतेच. भूमिकेशी समरसता महत्त्वाची आहे.
प्रश्न : कोणत्या वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट खेचून आणेल असे तुम्हाला वाटते ?
-  सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी एकत्र बसून बघायला हरकत नाही. शहरात फिरुन हाका मारीत विविध वस्तू विक्री करणारे हा चित्रपट एॅन्जॉय करतील.
प्रश्न : कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला तुम्हाल आवडतात ?  
- सगळ्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतात.
प्रश्न : हिन्दी चित्रपटात काम करण्याचा विचार केला नाही का?
- थोड्याच दिवसांत न्यूज कळेल. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.
प्रश्न :  मराठी चित्रपटाचा चेह
रा बदलला आहे काय?  काय वाटते?
- निश्चितच ! प्रेक्षक मराठी मराठी चित्रपटाची दखल घेत आहेत. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. मराठी चित्रपट जगभर पोहचत आहेत. तुम्हाला काय वाटते, तेच माझेही मत आहे.
प्रश्न : ‘कुणी घर देता का घरङ्क नंतर ‘फेकमफाक' बद्दल   काय अपेक्षा आहेत?
-  कुठलाही चित्रपट चालला पाहिजे.लोकांनी हा चित्रपट पाहावा, अशीच अपेक्षा आहे. हा चित्रपटातील विनोदी पात्रांमुळे प्रेक्षक खळखळून हसतील.शिवाय रहस्य आणि थ्रिलरमुळे त्यांना धक्के ही बसतील. या चित्रपटात चार गाणी असून सध्या गाजत असलेले अ‍ॅटम साँग वैशाली सामंतने गायिले आहे. तर अन्य गाणी साधना सरगम आणि शान यांनी गायिली आहेत. तर भरत बलवली हे उमदे संगीतकार आहेत.

                                                                       -  शिवाजी कांबळे                                                              
       ९०११३०८५८०

संगीत क्षेत्रातला ‘एकलव्य'


 जी माणसे विविध क्षेत्रात मोठी झाली. ज्यांनी स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले. ती बहुतांश माणसं मूळची खरी ग्रामीण भागातलीच. पण काही माणसं स्टार झाली की गावच्या मातीला विसरतात. तर काहींना त्यांची जाण असते.  सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव म्हणतात ना, मातीत जगावं, मातीत मरावं, बाळा, माती लई थोर तिला कसं विसरावं?     तसंच सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुक्यातील उपळा दुमाला या लहानशा गावचा लक्ष्मण अंकुश नाईकवाडी हा युवक आज संगीत क्षेत्रात आपल्या ‘ हर पल तेराही नशाङ्क, मनवारा, तुझ्याविना या आठ गाण्यांच्या तीन अल्बमने उजेडात आला आला आहे. खेड्या राहून शेतातली सर्व कामे करुन त्यानं संगीत क्षेत्रात भरारी घेतली आहे. मुंबई-पुण्याच्या मोठ मोठ्या संगीतकार आणि गीतकारांनी त्याची दखल घेतली आहे. ग्रामीण मातीशी नांत सांगणारा कवी, गीतकार आणि संगीतकार त्याच्या रुपाने उदयास येत आहे. तो संघर्ष करतो आहे, शिकतो आहे, जीवनात यशस्वी होण्यासाठी. म्हणून  कुणब्याची मुलं आता कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता लढायला शिकत आहेत. प्रतिकुल परिस्थितीत लक्ष्मणने बार्शीच्या शिवाजी कॉलेजात बारावी पर्यंतचे कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने सांगली येथे इंजिनिअरींगचे दोन वर्षे शिक्षण घेतलं पण ते अपुरेच राहीले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो आपले शिक्षण पूर्ण करु शकला नाही. पण मनाने न खचता त्याने गावाकडची कोरडवाहू दहा एकर शेती सांभाळली. शेतीत घाम गाळून आपल्या गीत-संगीताचा छंद जोपासू लागला. खेड्यात रेडिओशिवाय कोणतं साधन नव्हतं. तो रेडिओवर विविध गाणी ऐकायचा. यातूनच तो संगीताच्या प्रेमात पडला. तो स्वत: गाणी लिहितो, कंपोज करतो आणि गातोही. सुरुवातीला त्यानं लातूरच्या एका छोट्याशा स्टुडिओमध्ये ‘तुझ्याविना...ङ्क नावाचा गाण्याचा अल्बम रेकॉर्ड केला. तो २००५ मध्ये मुंबई आकाशवाणीवरुन प्रसारित झाला. तेव्हा लक्ष्मणला आकाश ठेंगणे झाले होते. त्यानंतर ‘ मनवाराङ्क हा  अल्बम २०११ मध्ये फाउंटेन म्युझिक कंपनीने प्रसारित केला. त्यापूर्वी २००८ -०९ मध्ये तयार केलेला ‘हर पल तेराही नशाङ्क हा हिंदी गाण्यांचा अल्बम तब्बल चार वर्षांनंतर रसिकांच्या सेवेत सादर झाला. हा अल्बम ऑनलाईन   प्रकाशित झाला आहे. या तिनही अल्बमची रॉयल्टी अजून त्याला मिळालेली नाही. पण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुझ्या प्रवासात...ङ्क हा आणखी एक गाण्यांचा अल्बम लवकरच येणार आहे. मात्र आयुष्यात एखाद्या आव्हानात्मक कामात कोणाच्या आधाराची गरज असते,पण कुणाचाही आधार नसल्याची खंत लक्ष्मणने व्यक्त केली. मात्र संगीतकार मिqलद इंगळे यांनी आपणास खूप मदत  केली, गाण्यांसाठी मार्गदर्शन केले. शिवाय निखिल विनय, लेस्ली या मान्यवरांनी आपणास खूप मदत केल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तरुणांनी मनापासून जे आवडते त्यामध्येच करिअर करावे, त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश हमखास मिळू शकते. अशी लक्ष्मणची धारणा आहे.
लक्ष्मण नाईकवाडी शेवटी म्हणतो...
 ‘सोबती होती खरी होती
 का तिला नाकारले मी
नेम का तेव्हा कुणाचा हात मी
शोधित होतो.ङ्क

                                                                        -शिवाजी कांबळे                                                                  
                                                                           ९०११३०८५८०

Translate