Monday, November 28, 2016

किराणा दुकानेही ओस



लोकांना चलन उपलब्ध होण्याची प्रतीक्षा
 सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजारात चिल्लर मिळणे दुरापास्त झाले आहे. चलन तुटवड्याचा परिणाम किराणा व्यापारावरही जवळपास ५० टक्केंपर्यंत झाला आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू कशा खरेदी करायच्या? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीचा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया बाजारपेठेतील काही किराणा दुकानदारांनी व्यक्त केली आहे. मात्र या निर्णयाच धंद्यालाही फटका बसल्याचे सांगत आहेत.
हजार qकवा पाचशे रुपयांची नोट घेऊन किराणा दुकानात येणाèया ग्राहकांना पूर्ण रकमेचा माल खरेदी करावा लागेल, अशी अट काही किराणा व्यापाèयांकडून घालण्यात येत आहे. त्यामुळे किरकोळ किराणा खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्पच झाली आहे. किराणा धंद्यातही मंदी आली आहे. पैशांअभावी किराणा व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. किरकोळ किराणा दुकानदारांकडून ठोक व्यापारी हजार, पाचशे रुपयांच्या नोटा स्विकारीत नसल्याने किरकोळ व्यापाèयांनी देखील ग्राहकांकडून या अधिक किमतीच्या नोटा घेणे बंद केले आहे. त्यामुळे छोटे व्यापाèयांनी दुकानात माल आणणे बंद केले आहे.

चांगल्या निर्णयासाठी त्रास होणारच : अभिजित खंदाडे
 मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चांगला आहे. चांगल्या निर्णयासाठी अडचणी तर येणारच आहेत. सध्या मोठ्या नोटा बाजारपेठेत कोणीच स्वीकारीत नाहीत. आम्हीही नाही. आमच्या व्यवसायावर ३० च्या आसपास  परिणाम झाला आहे. ग्राहकाने पाठ फिरविली आहे, कारण त्यांच्याकडेही पैसे नाहीत. सगळीकडे चिल्लरचे वांदे आहे. असे मत औसा रोडवरील प्रीती किराणाचे मालक अभिजित खंदाडे यांनी व्यक्त केले.

चिल्लर असेल तरच माल : सुनील बोमणे
नोटाबंदीमुळे व्यावहारात चिल्लरची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या किराणा दुकानाच्या व्यापारावर ५० टक्के परिणाम झाला आहे. धंदा मंदावला आहे. चिल्लर असेल तरच आम्ही किराणा माल देत आहोत. आमच्याकडून मोठे व्यापारी  हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारीत नाहीत, त्यामुळे आम्ही त्या नोटा स्वीकारीत नाहीत. अशी प्रतिक्रिया बार्शी रोड, येथील शिव प्रोव्हीजनचे सुनील बोमणे यांनी व्यक्त केली.

ग्राहकांची संख्या रोडावली : तुकाराम कदम
पैसे बदलून घेण्यासाठी बँकेसमोर तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. शिवाय मोठ्या नोटा ठोक व्यापारीही घेईनासे झालेत. त्यामुळे हजार, पाचशेच्या नोटा घेणे बंद केले आहे. दोन हजार रुपयांच्या नोटेची चिल्लर शक्य नाही. त्यामुळे धंदा खूप कमी होत आहे. मात्र मोदी सरकारचा निर्णय काळा पैसेवाल्यांना आळा घालण्यासाठी चांगला आहे. अशी प्रतिक्रिया पाच नंबर चौकातील नृqसह प्रोव्हीजन आणि जनरल स्टोअर्सचे तुकाराम कदम यांनी दिली.

............................................



स्टील मार्केटमधील
उलाढाल थांबली : राजेंद्र खटोड
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम लातूरच्या स्टील मार्केटवरही झाला आहे. स्टील मार्केट जवळपास थंडच आहे. चलन तुटवड्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्टीलचा व्यवसायाचे बहुतांशी नुकसान झाले. मात्र सरकारचा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचा थांबविण्यासाठी चांगला आहे. लोकांना महिनाभर कळ सोसावी लागणार आहे. त्यानंतर नेहमीसारखे सुरूळीत व्यवहार होतील. अशी प्रतिक्रिया मार्केट यार्डातील प्रिन्स स्टीलचे ठोक विक्रेते राजेंद्र खटोड यांनी एकमतशी बोलताना दिली.

दागिण्यांसाठी धनादेशही
 स्वीकारतो : विश्वनाथ किनीकर
सध्या लग्नसराई सुरू झालेली आहे. अशातच नोटाबंदीचा निर्णय झाल्यामुळे लग्न समारंभ ज्यांच्या घरी आहे, त्यांची मोठी अडचण झाली आहे. ज्या लोकांना लग्नासाठी दागिणे अत्यावश्यक आहेत, अशा लोकांकडून आम्ही धनादेश आणि आरपीजीएसच्या माध्यमातून पेमेंट घेत आहोत. सराफा बाजारात चलनच उपलब्ध नसल्यामुळे बाजारपेठ थंडावली आहे. नवीन चलन हातात येईपर्यंत लोकांना त्रास सहन करावा तर लागणार हे निश्चित. सोन्या -चादींच्या व्यापारावर सुमारे ५० टक्के  परिणाम झाला आहे. अशी प्रतिक्रिया लातूरच्या सराफा पेठेतील सराफा व्यापारी विश्वनाथ किनीकर यांनी व्यक्त केली आहे.
...........................................................

नोटाबंदीने पान-सुपारीला ‘चुनाङ्क
टपरीधारक म्हणतात, उधार द्यावं लागतं
पान-सुपारी, सिगरेट, बिडी, पान मसाला, तंबाखू या गोष्टी आरोग्याला हानीकारक असल्या तरी दैनंदिन गरज बनलेल्या आहेत. अनेकांना या गोष्टी मिळाल्या नाही तर त्यांना अस्वस्थ  व्हायला लागते. बहुतांशी लोकांना लागलेल्या व्यसनामुळे शहरातील टपरीधारकांचा व्यवसाय चालतो. लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते. एका एका टपरीचा व्यवसाय  दिवसाकाठी ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंतचा होतो. मात्र पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबरला हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यापासून टपरीधारकांना गेल्या १३ दिवसांत मोठा आर्थिक फटका बसला आहे.
चिल्लर अभावी ग्राहकांनी टपरींकडे पाठ फिरविल्याचे चित्र लातूर शहरात दिसून येत आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारात कोणीच स्वीकारीत नाहीत. आणि नव्या नोटा बाजारात उपलब्ध नाहीत. दोन हजार रुपयांची नोट काही प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध झाली आहे. पण त्याचे चिल्लर कसे आणि कोण देणार, हा मोठा गहन प्रश्न व्यापारी आणि ग्राहकांसमोरही आहे. त्यामुळे अनेकवेळा टपरीवर आलेल्या ग्राहकांना उधारी पान, सुपारी द्यावी लागते qकवा ग्राहकांकडील नोट ठेवून घेऊन त्यातूनच त्या ग्राहकाला रोज पान-सुपारी दिली जाते. चिल्लरअभावी या व्यावसायाचेही वांदे झाले आहे. सरकारने लवकरात लवकर चलन उपलब्ध करून लोकांचा त्रास थांबविण्याची मागणी करण्यात येत आहे.

दोन हजाराची नोट कशी
स्वीकारणार ? : राम काळे
 सरकारने चलनातून बाद ठरविलेल्या नोटा घेणे तर आम्ही केव्हाच बंद केले आहे. सुरूवातीला लोक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन टपरीवर यायचे आणि १० रुपयांची सुपारी मागायचे. पण चिल्लरच नसल्याने पान, सुपारी ग्राहकांना देणे शक्य नाही. काही नियमित आणि ओळखीच्या ग्राहकांना उधार द्यावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत चिल्लर बाजारात आणि व्यवहारात उपलब्ध नसल्याने टपरीच्या व्यवसायात  बèयाच प्रमाणात नुकसान झाले आहे. बरेचजण २ हजाराची नोट घेऊन येतात, या नोटेचे करायचे काय, चिल्लर कुठून आणायची, हा मोठा प्रश्न ग्राहक आणि आमच्यासमोरचा आहे. अशी प्रतिक्रिया पीव्हीआर थिऐटर जवळील अभिजीत पान सेंटरचे राम काळे यांनी दिली आहे.

ग्राहक कमी झाले : किशोर सुरवसे
 जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्या. आम्हीही स्वीकारणे बंद केले. तरी देखील अनेकजण या नोटा घेऊन सुपारी खाण्यासाठी टपरीवर येतात.किंवा नवीन २ हजार रुपयांची नोट घेऊन येतात. त्यात काही ओळखीचे व नियमित ग्राहक असतात. मग त्यांना उधारी सुपारी, पान द्यावे लागते.  चलन पुढे जात नसल्यामुळे टपरीवरील ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. ज्या पीव्हीआर सिनेमा थिएटरसमोर आमची टपरी आहे, त्या थिएटरचा धंदा चलन तुटवड्याने ठप्प झाल्याने टपरीवर ग्राहक तुरळक येत आहेत. सरकारने लवकर चलनात कमी qकमतीच्या नव्या नोटा आणाव्यात आणि हेळसांड थांबवावी. असे मत पीव्हीआर सिनेमा थिएटरसमोरील न्यू स्वप्नलोक पान शॉपचे किशोर सुरवसे यांनी व्यक्त केले.

७५ टक्के टपरी मार्केट थंड : शेख इमामसाब
नोटाबंदीमुळे आमच्या टपरीवाल्यांचा धंदा ७५ टक्के थंड पडला आहे. याचं कारणे म्हणजे मार्केटमध्ये चिल्लरच नाही. दिवसभराचा धंदा २०० रुपये देखील होण्याची मारामार आहे.चिल्लर घेऊन येणाèया ग्राहकांची वाट पाहात बसावे लागते. अशी प्रतिक्रिया टाउन हॉल, मैदान, मेन रोडवरील टपरीचालक शेख इमामसाब यांनी दिली.

चिल्लरची समस्या कायम : संतोष मानकर
 हजार आणि पाचशे तर सोडाच इथे शंभर रुपयांचेही चिल्लर उपलब्ध नाही. ग्राहकांना कुठून चिल्लर द्यायची, ज्या ग्राहकांकडे चिल्लर आहे, तेच ग्राहक चहा पिण्यासाठी आमच्या हॉटेलात येत आहेत. त्यामुळे चहा पिण्याची इच्छा असूनही अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. खरे तर या चार महिन्यात लोक चहा जास्त पितात. मात्र नोटाबंदीनंतर गेल्या १३-१४ दिवसांपासून चहाचा धंदा थंड झाला आहे. ग्राहकअभावी हॉटेलवर बसून राहावे लागते. अशी प्रतिक्रिया  पाच नंबर चौकातील रेल्वे स्टेशन रोडवरील राधिका हॉटेलचे चालक संतोष मानकर यांनी व्यक्त केली.

Thursday, November 24, 2016

बाजारपेठ मंदावली

बाजारपेठ मंदावली
चलन तुटवड्याने सामान्यांचे हाल
९० टक्के दैनंदिन व्यवहार ठप्प
लातूर : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रोजच्या व्यवहारासाठी बँकांतून पैसे काढण्यासाठी सर्वसामान्यांना तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. पैशांचा खडखडाट असल्याने अनेक एटीएम मशिनही बंद आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी ९० टक्के बाजारपेठ ठप्प झाली आहे. एक तर जुन्या नोटा बाजारात घेणे बंद झाले आहे, तर दुसरीकडे नव्याने बाजारात आलेल्या २००० रुपयांच्या नोटेचे चिल्लर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे अडचण निर्माण झाली असून, यातून व्यवहारावर विपरित परिणाम झाला आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाने चलन तुटवडा झाल्याने लातूर शहरातील बाजारपेठेत अक्षरशः शुकशुकाट दिसून येत आहे. ग्राहकच फिरकत नसल्याने अनेकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. नोटाबंदीने पैशाचे व्यवहारच थंडावले असून, लोकांकडे चलन राहिले नाही आणि २ हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध असूनही दुकानदारांनी त्याचे चिल्लर कुठून द्यायचे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हिरव्या पालेभाज्यांच्या बाजाराचीही बिकट अवस्था झाली आहे. लोकांकडे सुटे पैसे नसल्याने भाजीपाला बाजारात ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. अनेक भाजी विक्रेत्यांना आपला भाजीपाला सडून जात असल्याने तो फेकून देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहिला नाही.
याशिवाय औषध विक्रेते, किराणा भुसार व्यापारी, ऑटो रिक्षा, स्वेटर विक्रेते, जनरल स्टोअर्स, सराफा व्यापारी, भांड्यांची दुकाने, रॅस्टॉरंट, बांधकाम साहित्य विक्रेते, फळ विक्रेते आदी प्रकारचे सर्व व्यापारी चलन तुटवड्यामुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. नोटाबंंदीचा सर्वांत विपरित परिणाम सर्वसामान्यांवर झाला आहे. जवळ चिल्लर नाही आणि २ हजार रुपयाची नोट घेऊन बाजारभर फिरले तरी त्याची चिल्लर कुणाकडेच उपलब्ध नाही qकवा कोणी देत नाही. अशा परिस्थितीत करायचे तरी काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने ५०, १००, ५०० रुपयांचे चलन लवकर सर्वत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्राहक व व्यापारी वर्गातून केली जात आहे.

आधी दुष्काळ आता व्यापार बंद : प्रदीप सोळंकी
दुष्काळामुळे त्रस्त असलेली लातूरची जनतेला पावसाळाअखेर पावसाने दिलासा दिला होता. बाजार सुधारण्याच्या स्थितीत असतानाच मोदी सरकारने हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. यामुळे लातूरची बाजारपेठ पूर्णत: थंडावली आहे. लोकांचा नोटा बदलण्यासाठी बँकांसमोरील रांगेतच वेळ गेला. यामुळे शेतकरीही यामध्येच अडकले त्यामुळे बाजारपेठेत मंदी निर्माण झाली. रिटेल व्यापाèयांनीही  हजार, पाचशे रुपयांच्या नोटा घेणे बंद केल्याने सर्व चक्रच बंद पडले. जवळपास ९० टक्के  बाजारपेठ ठप्पच झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत ग्राहक बाजारात राहणारच नाही. पैसे खर्चाची मानसिकता आता लोकांमध्ये बदलू लागली आहे. लोकांना बचतीची सवयही लागेल. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे. या निर्णयामुळे आता खèया अर्थाने समाजवाद येईल. सामान्य लोकांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोळंकी यांनी एकमतशी बोलताना व्यक्त केली.

सोन्या-चांदीची खरेदी-विक्री थांबली : विजय सूर्यवंशी
नोटाबंदीमुळे सध्या सराफा बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात चलन तुटवड्याचा परिणाम झाला आहे. जवळपास ९५ टक्के खरेदी -विक्रीचे व्यवहार थंडावले आहेत. साधारणपणे फक्त ५ टक्के व्यवहार सुरू असून ९५ टक्के बाजारपेठ ठप्प झाली आहे. सोनेविक्री करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना देण्यासाठी चिल्लर  नसल्याने खरेदीही बंद झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाआधी लातूरच्या सराफा बाजारपेठेत दररोज २० ते २५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होत असे. आता मात्र दिवसाला ५ लाख रुपयांचाही व्यवहार होत नाही, अशी प्रतिक्रिया लातूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजयराव सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सगळीकडून आर्थिक कोंडी : प्रमोद साळुंखे
नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास गरिबांनाच आधिक होत आहे. आधी दुष्काळाचा आणि आता नोटाबंदीचा फटका यामुळे सामान्य लोक हैराण झाले आहेत. गेल्या ९ नोव्हेंबरपासून आमच्या रेस्टॉरंटचा  व्यवसाय ७० टक्के  थंडावला आहे. हजार व पाचशेच्या नोटा आमच्यासह बाजारात कोणीच स्वीकारत नाहीत. २ हजारची नोट चलनात आहे; पण त्याचे चिल्लर मिळत नाही. सामान्यांची सगळीकडूनच आर्थिक कोंडी होत आहे त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे, असे मत पीव्हीआर चौकातील आनंद रेस्टॉरंटचे मालक प्रमोद साळुंखे यांनी व्यक्त केले.

लग्नसराईत भांडी खरेदी नाही : रामेश्वर पुनपाळे
नोटाबंदीमुळे ऐन लग्नसराईत भांडी खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला मोठा फटका बसला आहे. लग्नकार्यात लोक अल्युमिनीयमची भांडी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात पण भांडीविक्रीचा सुमारे ७० टक्के व्यवहार कोलमडला आहे. पहिल्यासारखा व्यवहार सुरू होण्यासाठी साधारणपणे आणखी दोन महिने लागतील. चलन तुटवड्यामुळे धंदाच मंदावला आहे. सरकारने कोणत्याही प्रकारचा होमवर्क न करता हा नोटाबंदीचा निर्णय लादला आहे. बाजाराचे अर्थचक्रच बिघडले आहे. कामगारांचे पगार करण्यासाठीदेखील पैशांची चणचण निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया सुयोग मेटल इंडस्ट्रिजचे संचालक रामेश्वर पुनपाळे यांनी एकमतशी बोलताना दिली.
-----------------------

औषधविक्रेत्यांकडेही चलन तुटवडा
काही विक्रेते स्वीकारताहेत धनादेश
तर काही जणांना हवे चिल्लरच
चलनातून रद्द ठरविण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा औषध विक्रेते आणि खाजगी रुग्णालयांनी २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकाराव्यात. असे शासनाने आदेश आहेत. चलन तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून सरकारने खाजगी रुग्णालय आणि औषधविक्रेत्यांना जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. तसेच चलनाच तुटवडा त्यांनाही जाणवला तर त्यांनी धनादेश स्वीकारावेत, असे निर्देश देखील शासनाने दिले आहेत. मात्र लातूर शहरातील काही औषध विक्रेते शासनाच्या या निर्देशाचे पालन करताना दिसतात तर काहीजण हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होताना दिसत आहे.
तसे पाहिले चलन तुटवड्यामुळे रुगांसोबतच औषध विक्रेते आणि डॉक्टरांची अडचण निर्माण झाली आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारून ग्राहकांना चिल्लर पैसे कुठून द्यायचे, हा प्रश्न गंभीर आहे. तर ग्राहकांकडे हजार, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांशिवाय चिल्लर नसल्याने ग्राहक अडचणीमध्ये आले आहेत. एकंदर विचार केला तर सगळ्यांचीच हेळसांड होत आहे. अनेक औषधविक्रेत्यांचे म्हणणे आहे की, मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय लांबच्या काळासाठी चांगला आहे. काही दिवस आम्हाला  आणि ग्राहकांना त्रास तर होणारच आहे.

अडचण आहे, पण निर्णय चांगला : रामदास भोसले
शासनाने औषधविक्रेत्यांना जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुभा दिली आहे. तरीदेखील ग्राहकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. आम्ही नियमित ग्राहक असेल तर त्यांना औषधे उधारीवर पण देत आहोत. चलन तुटवड्यामुळे लोकांकडे पैसे नाहीत, त्यामुळे अनेकवेळा चिल्लरसाठी वादाचे प्रसंगही दुकानावर उद्भवत आहेत. लोकांच्या अडचणी असल्या तरी देशाचा विचार केला तर मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया शहरातील  अशोक चौकातील औषध विक्रेते रामदास भोसले यांनी दिली आहे.

जुन्या नोटा स्वीकारल्या जातात : रमाकांत गंजेवार
 आम्ही ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा  रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून स्वीकारत आहोत. रुग्णांसाठी आम्ही औषधी देत आहोत. चिल्लरची अडचण निर्माण होते, पण शासनाने जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा दिली आहे. काही दिवस अडचण असली तरी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चांगला असल्याचे मत शहरातील मेन रोड, टिळकनगर येथील गंजेवार मेडिकल दुकानचे संचालक रमाकांत गंजेवार यांनी ‘एकमत बोलताना व्यक्त केले.

रुग्णांकडून धनादेशही स्वीकारला
 जातो : अविनाश अंबेकर
येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत शासन आदेशानुसार आम्ही रुग्णांना औषध विक्रीसाठी हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारत आहोत. या शिवाय नोटांची अडचण निर्माण झाल्यास आम्ही रुग्णांकडून धनादेशाने देखील रक्कम स्वीकारत आहोत, अशी प्रतिक्रिया मेन रोड, लातूर येथील शांप्रद मेडिकल दुकानचे मालक अविनाश अंबेकर यांनी व्यक्त केली आहे. सरकारने ५०,१०० आणि ५०० रुपयांच्या अधिक नोटा चलनात आणल्यास सामान्य लोकांची गैरसोय थांबेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया............


चिल्लरची अडचण आली नाही : शेख अफसर
गांधी हॉस्पिटलमध्ये लिव्हरच्या आजारावर उपचार घेत असलेले विष्णू बालेकर यांचे निकटवर्तीय शेख अफसर म्हणाले, की औषधी खरेदीसाठी मेडिकलच्या दुकानावर अजून तरी काही अडचण आली नाही. मेडिकल दुकानात हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. चिल्लरही देत आहेत.

दोन हजारांचे चिल्लर दिले : डी. पी. घोडके
 मी माझ्यासाठी बीपीच्या गोळ्या आणि पत्नीसाठी औषधी  गांधी चौकातील बालाजी मेडिकलमधून खरेदी केले. दुकानदारास २००० रुपयांची नवी नोट दिली. २०० रुपयांचे बिल झाले. तरी देखील १८०० रुपयांचे चिल्लर दुकानदाराने दिल्याचे मुरूड येथील नागरिक डी.पी. घोडके यांनी सांगितले.
...........................................................

ऑटोरिक्षाचा धंदाही
३० टक्क्यांनी मंदावला
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा फटका ऑटोरिक्षा चालकांनाही बसत आहे. चलन तुटवड्याचा परिणाम ऑटोचालक-मालकांच्या मिळकतीवर झाला आहे. लातूर शहरात ऑटोरिक्षांवर हजारो गोरगरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मोदी सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे ९ नोव्हेंबरपासून ऑटोरिक्षाचा व्यवसायही मंदावला आहे.
या नोटाबंदीच्या निर्णयाआधी ऑटोचालकांना दिवसाला ८०० ते १००० रुपयांची कमाई होत होती. आता गेल्या दहा दिवसांपासून दिवसाला ४०० ते ५०० रुपये कमाई होत आहे. ५००,१००० आणि दोन हजारांच्या नोटा ऑटोचालक स्वीकारत तर नाहीतच मात्र ग्राहकही ऑटोलचालकांना या मोठ्या नोटा न देण्याचे शहाणपण दाखवित आहेत. केवळ चिल्लर ५ रुपये, १० आणि १५ रुपयांसह १०० रुपयांपर्यंतचे या व्यवसायात व्यवहार होताना दिसत आहेत. मात्र कमी qकमतीच्या चलन तुटवड्यामुळे ऑटोरिक्षा व्यवसायाला जवळपास २५ ते ३० टक्के फटका बसल्याचे ऑटोरिक्षाचालक सांगत आहेत.
तसेच मिळालेल्या मिळकतीतून पेट्रोलसाठी किमान ३०० रुपये खर्च करावे लागतात. ऑटोचालक पाचशे qकवा दोन हजार रुपयांची नोट घेऊन पेट्रोलपंपावर गेल्यास त्यांना चिल्लर मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी वादाचे प्रसंगही निर्माण होत असतात.

पेट्रोलला महाग झालो आहोत : अशोक qचदे
नोटाबंदी झाल्यामुळे व्यवहारात अडथळा निर्माण होत आहे. चिल्लर पैसे देण्यासाठी ग्राहक का कू करीत आहेत. अनेकवेळा मोठी नोट दाखवून चिल्लर आहे का, अशी विचारणा करतात. आधी दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये मिळायचे. पण १०० रुपयेही कमाई होत नाही. पेट्रोलला महाग होत आहोत, अशी प्रतिक्रिया पाच नंबर चौक ते गंजगोलाईपर्यंत ऑटोने प्रवाशी वाहतूक करणारे ऑटोचालक अशोक qचदे यांनी व्यक्त केली आहे.

जगणे कठीण झालेय : तुकारात थोरात
 लोकांकडे चिल्लर उपलब्ध नसल्यामुळे आमचा ऑटोचा धंदा चांगलाच मार खालाय. मला याआधी रोज ४०० ते ५०० रुपये मिळायचे. आता तेलाचा खर्च वजा जाता केवळ २०० रुपये हातात येतात. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह, गाडीचे मेंटेन्स कसे करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. मी भाड्याने ऑटो घेऊन चालवितो, भाडे देण्याचा ताणही वाढला आहे, अशी प्रतिक्रिया ऑटोचालक तुकारात थोरात या युवकाने व्यक्त केली.

त्रास आहे, पण सरकारचा निर्णय चांगला : गणपती कांबळे
नोटाबंदीमुळे ऑटोरिक्षाचा धंदा मंदावला आहे. २५ ते ३० टक्के धंद्याला फटका बसला आहे. पण हे काही दिवसच त्रास सहन करावा लागेल. सरकारचा नोटाबंदीचा निर्णय ‘नंबर एकचाङ्क आहे. कारण या निर्णयाने गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी होईल, असे मत ऑटोचालक गणपती कांबळे यांनी ‘एकमतङ्कशी बोलताना व्यक्त केले.

 ग्राहक सहसा ५०० ची नोट
काढत नाही : संजय जंगापल्ले
 माझा ऑटोचा धंदा पूर्वी ९०० ते १००० रुपयांपर्यंत व्हायचा. पण आता चिल्लरची चणचण सगळ्यांनाच भासत असल्याने धंद्यावर परिणाम झाला आहे. आता ६०० ते ७०० रुपये दिवसाकाठी धंदा होतो आहे. सहसा पाचशे रुपयांची नोट ग्राहक काढत नाही. आमचा धंदा चिल्लरवर चालतो, अशी प्रतिक्रिया ऑटोचालक संजय जंगापल्ले यांनी व्यक्त केली.

Translate