बाबासाहेबानी नाग भूमित एक अभूतपूर्व सोहळ घडवून आणला.
हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा तो सोहळा म्हणजे हिंदुंच्या जातियवादावर घातलेला घणाघाती घाव तर होताच. पण धर्मांतराची दुसरी बाजू म्हणजे दास्यात खितपत पडलेल्या
अस्पृश्यांना
आत्मसन्मानाने जगण्याच्या नव्या वाटा दाखविणार हा सोहळा
होता. दलिताना
हजारो वर्ष
गुलामीत ठेवणारे देव देवता नाकरणे या धम्मसोहळ्यातील एक
मुख्य़ भाग होता. नुसतं धम्म स्विकारुन काही होणार नाही हे बाबासाहेब्न जाणून होते,
त्यामुळे त्यानी देवाचा बंदोबस्त करणा-या बावीस प्रतिज्ञा तयार केल्या. त्या
लोकांकडून वदवून घेतल्या. बाबासाहेबानी बौद्ध धर्माला दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिल
प्रमाणे आहेत
१) मी ब्रम्हा,
विष्णु व महेश याना देव मानणार नाही व त्यांची पुजा करणार
नाही।२) मी राम व कृष्ण याना देवाचा पुनरजन्म मानत नाही व त्यांची पुजा ही करणार नाही।
३) मी गौरी गणपती व ईतर कुठल्याही देविला मानत नाही व पुजाही करणार नाही।
४) मी देवाचा पुनरजन्म मानत नाही।
५) मी बुद्धाला विष्णूचा अवतार मानत नाही, हा एक अपप्रचार आहे।
६) मी श्राद्ध करणार नाही व पिंडदान करणार नाही।
७) मी बुद्धाच्या शिकवणुकीच्या विसंगत वागणार नाही
८) मी कुठलेही कार्य ब्राह्मणाच्या हस्ते करणार नाही
९) मी सगळ्या मानव जातिला समान मानतो.
१०) मी समानता प्रस्थापीत करण्यासाठी कटिबद्ध राहीन
११) मी बुद्धाने सांगितलेला अष्टप्रधान मार्गाचे पालन करेन।
१२) मी बुद्धाने सांगितलेल्या १० पारमितांचे पालन करेन।
१३) मी समस्त प्राणीमात्रावर प्रेम करेन व त्यांचे रक्षण करेन।
१४) मी चोरी करणार नाही।
१५) मी खोटे बोलणार नाही।
१६) मी वैषयीक अपराध करणार नाही।
१७) मी मद्यपान व इतर कुठेल्याही नशेचे सेवन करना नाही।
१८) मी अष्टांग मार्गाचे पालन करेन आणी दया, करुना व प्रेमाचे रोज आचरन करेन।
१९) मी मानव जातीच्या विकासात बाधा घालणा-या व जातिभेद करणा-या या हिंसक अशा हिंदु धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्विकार करतो आहे।
२०) मी फक्त बुद्धांच्या धम्मावर विश्वास ठेवतो।
२१) मी बौद्ध धम्माचा स्विकार करतो, अन हाच माझा पुनरजन्म आहे असे मानतो।
२२) मी अशी प्रतिज्ञा घेतो की, या नंतरचे माझे जीवन मी बुद्ध व त्यांचा धम्म यांच्या शिकवणुकी प्रमाणे जगणार॥
No comments:
Post a Comment