Wednesday, February 27, 2013

मराठी साहित्यात कर्जबळींची उपेक्षा



                                                          शिवाजी कांबळे
लातूर : मराठी साहित्यात बोटावर मोजण्या इतपत लेखक, साहित्यिकांनी शेतक-यांच्या आत्महत्या अर्थात कर्जबळींची दखल घेतलेली आहे. परिस्थितीचे वर्णन केले गेले पण परिस्थितीला कलाटणी देणारे साहित्य निर्माण झाले नसल्याची खंत आठव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनातील  कर्जबळी शेतक-यांचे मराठी साहित्यातील दर्शन सत्यशोधकी दृष्टिकोनातून, या विषयावरील परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केली.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार नेते भाई प्रा. एस. व्ही. जाधव हे होते तर किशोर ढमाले, प्रा. अर्र्जुन जाधव, कॉ. धनाजी गुरव आदी वक्त्यांनी परखड मांडणी केली. शेतक-यांच्या प्रश्नांची दखल साहित्यात अलिकडे घेतली जाऊ लागली आहे. १९८० पासून शेतीमालाचे भाव कोसळू लागले. राज्यकत्र्यांनी जाणीवपूर्व शेतीक्षेत्राला तोट्यात ढकलले. गॅट, डंकेल नंतर शेती क्षेत्रात मोठा हस्तक्षेप वाढला त्यामुळे शेती उत्पादन कमी होत चालले तेव्हापासून शेतक-यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. कर्जबळी हा सरकारच्या देशातील शेती विषयक धोरणांचा परिपाक होता, असे मत किशोर ढमाले यांनी मांडले. शिवाय मराठी साहित्यात कर्जबळी शेतक-यांची दखल घेतली गेली नाही. शेतक-यांच्या विरोधात चित्रण केले गेले. एकमेव रा. रं. बोराडे यांची चारापणी कादंबरी सोडली तर शेतक-यांची दखल कोणी घेतली नसल्याचे दिसते, असेही त्यांनी सांगितले. कॉ. धनाजी गुरव यांनी शेतक-यांच्या आत्महत्याच नव्हे तर भूमिहीन शेतमजुरांना साहित्यात स्थान मिळालेले नाही. लेखकांचे आकलन व्यापक झाले पाहिजे. आदिवासी, भटके, भूमिहिन, शेतमजुरांचे प्रश्न वेशीवर टांगणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. परिवर्तवादी साहित्य, सत्यशोधकी साहित्य निर्माण होणे ही सामुदायिक जबाबदारी असल्याचे मत त्यांनी मांडले तर प्रा. अर्जुन जाधव यांनी स्वतंत्र भारतात शेतजमिनीचे क्रांतिकारी फेरवाटप झाले नाही. उत्पादनखर्च वजा जाता जे उत्पादन राहिल त्यातून पाच जणांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. ग्रामीण भागातून साहित्य संमेलने झाली पाहिजेत. शेतक-यांच्या व्यथा त्यातून मांडणे गरजे आहे. चिपळूणच्या साहित्य संमेलनात तर कु-हाड दाखविण्यात आली. अशा साहित्य संमेलनाला शेतक-यांच्या खिशातून ७५ लाख रुपये खर्च करण्यात येतात, ही बाब अत्यंत लाजीरवाणी असल्याचे मत प्रा. जाधव यांनी मांडले. अध्यक्षीय समारोपात प्रा. एस. व्ही. जाधव यांनी शेतक-यांचा आक्रोश न ऐकू येणा-या साहित्यिकांचा आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला. शेतकरी कुटुंबातून आलेले लेखक साहित्यिकांच्या लेखनीतून शेतक-यांचा टाहो, आक्रोश उतरत नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत देशात २ लाख ४० हजार शेतकèयांनी आत्महत्या केल्या. मराठी साहित्याला याचे काहीच गांभीर्य दिसून येत नाही. वेदनेला वाचा फोडणारी लेखणी महात्मा फुले यांची होती. चार वेद, १८ पुराणे आणि सहा शास्त्रांत डांबून ठेवलेला समाज मुक्त करण्याचा विचार महात्मा फुले यांनी मांडला पण हा विचार कृतीत आणण्याची गरज आहे. आताशा शेतक-यांची पोरे रस्त्यावर उतरून लढताना दिसत नाहीत. दिनकरराव जवळकर आणखी १५ वर्षे जगले असते तर शेतक-यांमध्ये क्रांती निर्माण झाली असती, असे प्रा. जाधव यांनी सांगितले.

सुधीरचा स्वप्नरंगी रंगलेला कुंचला !



....................................................
 ग्राम संस्कृती आणि मानवी भाव-भावनांना चित्रांतून जिवंत करणारा, ब्रश आणि रंगांच्या साह्याने कॅनव्हॉसवर आपली स्वप्ने उतरविणारा मराठी पिकासो सुधीर बांगरची ही यशकथा...
..............................................
सुप्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे, की
उपजिविकेसाठी आवश्यक असणाèया विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. अशाच एका चित्रकलेशी मैत्री जमवलेल्या चित्रकाराबद्दल.... सुधीर सूर्यभान बांगर असे या चित्रकाराचं नाव. सद्या पुण्यातील भोसरीत राहत असलेला  आणि मुळ उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बांगरवाडी सारख्या छोट्याशा खेड्यातला हा चित्रकार. सुधीरने आज महाराष्टातील सुप्रसिद्ध चित्रकार म्हणून ख्याती मिळवली आहे. गावच्या उदास माळरानावर ब्रश आणि रंगाच्या साह्याने ग्रामीण जीवनाच्या मनमोहक छटा आणि माणसांच्या मनातील भाव-भावनांची चित्रे रेखाटत सुधीरचा स्वप्नरंगी कुंचला आज देश-विदेशातील कलारसिकांना भारावतो आहे.
 शालेय जीवनात अनेकांना चित्रकलेची आवड असते. पण कांही कारणांमुळे अनेकांना ही आवड जोपासायला सवड मिळत नाही. पण या आवडीमध्ये करिअर करणाèयांपैकी सुधीर आहे. सन १९९२ मध्ये सुधीरने लातूर येथून चित्रकला शिक्षकाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सन १९९६ मध्ये पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून जी.डी आर्ट ही पदवी मिळवली. सुरुवातीच्या काळात सुधीर निसर्गचित्र काढत असे. त्यानंतर  तो रंगरेषाच्या माध्यमातील चित्रांकडं वळला. या शैलीतून माणसांमधील भाव-भावना चित्रबद्ध करु लागला. याच विषयाशी संबंधित त्याचा लव्ह अ‍ॅण्ड लाइफ या नावाचे चित्रप्रदर्शन मुंबईतील के. सुभाष मार्गावरील काला घोडा येथील द म्युझियम गॅलरी येथे भरलं. या चित्रप्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. श्रृंगार हा या विषयाचा पाया होता. विवाहानंतर माणसाचं आयुष्य बदलतं. पती-पत्नीमधील सुरुवातीच्या काळातील शृंगारिक जीवनाचे परिवर्तन कालांतराने भावनिक एकरुपतेत होतं. या नातेसंबंधात होणारा बदल सुधीरने चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे सुधीर सांगतो. प्रेम आणि जीवनाचा सुंदर अविष्कार चित्रातून साकारण्याची सुधीरची कल्पना मोहक अशीच आहे. सुधीरनं लव्ह अ‍ॅण्ड लाइफ ची अनेक ठिकाणी प्रदर्शनं भरवली. यात बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आर्ट वर्कशॉप कोल्हापूर, साउथ सेंट्रल झोन नागपूर, ओक आर्ट एक्झिबिशन ग्रुप शो लातूर, बालगंर्धव कलादालन, पुणे, जे. जे. स्कूल, विमाननगर, मुंबई, आर्ट प्लाझा, मुंबई, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणची सुधीरची चित्रप्रदर्शनं चांगलीच गाजली. देशातील प्रसिद्ध आर्ट गॅलरी जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे सुधीरच्या चित्रांची तीन वेळा प्रदर्शने झाली. ग्रामीण भागातील सौंदर्य उलगडणारी कलाकृती सुधीरने कॅनव्हॉसवर उतरवली आहे. त्याने आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून ब्युटी ऑफ आर्ट च्या निमित्ताने चित्रकार सुधीरने ग्रामीण स्त्रीच्या रांगडेपणाचं आणि अप्रतिम सौंदर्याचं दर्शन घडवून आणले आहे. आजही एकविसाव्या शतकात ग्रामीण भागात मुलगी जन्माला आली तर तिची राजरोसपणे हत्या केली जाते. गर्भातच अनेक कळ्या खुडल्या जातात. परिणामी मुलींची संख्या कमी होताना दिसते. या सगळ्या प्रथा मोडून काढ्ण्यासाठी सुधीरने त्याच्या चित्रात स्त्रीभू्रणाची पूजा करताना दाखवले आहे. सुधीर केवळ चित्रकार नाही तर समाजqचतकही आहे. सामाजिक बांधिलकी असणारा हा युवा चित्रकार समाजातील विविध घडामोडींबद्दल तेवढाच संवेदनशील आहे. सुधीरची काही निवडक चित्रे संग्रहासाठी अमेरिका, दक्षिण कोरिया, स्वित्र्झलँड, फ्रान्स, मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकात्ता आदी ठिकाणी पाठविली आहेत. हा ध्येयवेडा मराठी पिकासाची यशाची आनंदमयी वाटचाल मंत्रमुग्ध करणारी आहे.

                                                                                    .........शिवाजी कांबळे

                                                                                                       ९०११३०८५८०

Sunday, February 24, 2013

भाऊचा डबा



  नांदेड शहरात समाजसेवी ऎडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे - भाउचा डबा. शहरातल्या श्री गुरु गिविंदसिंघजी जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेणारे गरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना सकाळ संध्याकाळ दोन वेळा घरगुती जेवण मोफत पुरवणारा हा भाउचा डबा. चार वर्षात चाळीस हजार रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना जेवणाचे डबे पुरवण्यात आले आहेत. ही समाजसेवा अविरत सुरू आहे.
नांदेड शहरातलं श्री गुरु गिविंदसिंघजी जिल्हा सरकारी रुग्णालय. आवारातला हा संवाद - ‘बाबा, दोन दिस झालं...तुमी काहीच खाल्लं नाही. दोन घास खाऊन घ्या...अन माय, आज्ये तुमीही भाकरी खाऊन घ्या. मी बसते इथे पेशंटजवळ.‘ आणखी एक नातेवाईक म्हणत होता, ‘हो...जेवण केलं नाही तर तुमालाबी इथंच दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल.
 पण त्यांच्याकडे ना भाकरी ना हॉटेलचं खाणं खायला पैसा. त्यात मुलीच्या काळजीपायी तहानभूक उडालेली. स्टोव्हच्या भडक्यात भाजलेली त्यांची पोर रुग्णालयात मरणाशी झुंज देत होती. या अनोळखी नांदेड शहरात कुणी नातेवाईक नाहीत, मित्र नाहीत, आसरा नाही नि जवळचे पैसेही संपलेले. आणखी किती दिस काढायचे तेही माहीत नाही. आपलं गाव दूर राहिलेलं. आजीनं रुग्णालयाच्या आवारात चूल मांडून खिचडी शिजवण्याचा प्रयत्न करून पाहेला. पण कर्मचारी तिथे चूल पेटवायला परवानगी कशी देणार?
 असे प्रसंग तिथे रोजचेच झाले होते. शिवसेनेचे नगरसेवक ऎडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांना राहवलं नाही. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची ही परवड थांबण्यासाठी त्यांनी सुरुवातीला गरजूंना जेवणासाठी पैसे द्यायला सुरुवात केली. या छोट्या सुरुवातीतूनच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना जेवणाचे डबे पोचवण्याची कल्पना दिलीप ठाकूर यांना सुचली. नांदेडचे दिवंगत आमदार प्रकाशभाऊ खेडकर हे दिलीप ठाकुर यांचे गुरू. या प्रकाशभाऊंच्याच नावाने सुरू केलेला हा सेवाभावी उपक्रम भाऊचा डबा. या उपक्रमात ठाकूर यांना साथ आहे आमदार अनसुया खेडकर आणि नांदेड शहरातल्या गिरीश खियाणी, मुकेश्भाई ठक्कर, प्रदीप उंचलवार, राहुल बासटवार यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींची.
  ‘मागीतली भाकरी मिळाले चटके‘ अशा सध्याच्या वातावरणात भाऊचा डब्बा या अनुकरणीय उपक्रमाची दखल घ्यायलाच हवी. उपक्रम सुरू केला तेव्हा शहरातल्या काही सधन व्यक्तींनी सर्व खर्च द्यायची तयाती दाखवली होती. पण ठाकूर यांना उपक्रमात जास्तीत जास्त लोकसहभाग हवा होता. म्हणून त्यांनी वर्तमानपत्रातून आवाहन करून लोकांचा प्रतिसाद मिळवला. रुग्णालयाच्या प्रशासनानेही उपक्रमाला सहकार्यच दिलं. श्री गुरु गिविंदसिंघजी जिल्हा सरकारी रुग्णालयात येणार्‍या या डब्यांमध्ये घरगुती जेवण असतं. चपाती, भाजी आणि वरण भात हे रोज. आणि सणावारी पक्वान्न. डबा खाऊन रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तृप्त होतात. २००६ साली सुरू झालेल्या या उपक्रमात उत्स्फूर्त्पणे डबे देणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकदा ठाकूर हे डबे विकत घेण्यासाठी शहरातल्या अतुल लोटिया यांच्या भांड्यांच्या दुकानात गेले. लोटिया
  यांनी वर्षभर पुरतील इतके स्टीलचे डबे मोफत देऊन टाकले. दिलीप ठाकूर यांनी आपल्या कामातून मिळवलेल;या विश्वासार्हतेमुळे लोक त्यांच्या कामात स्वयंप्रेरणेने सामील होतात.आता या उपक्रमात १५०० नागरिक डबे (जेवण) देण्याचं काम करतात. सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी २५ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना हे डबे पुरवले जातात.
प्रत्येक वॉर्डातल्या नर्सच्या मदतीने रुग्णांची यादी तयार केली जाते आणि बाहेरचं खाणं परवडत नाही अशा गरीबांनाच डब्याचा लाभ मिळेल याची खातरजमाही केली जाते. डबे पुरवल्यानंतर दर दिवशी नर्सची सहीसुद्धा घेतली जाते. जेव्हा रुग्णांची संख्या जास्त असते तेव्हा शहरातले खाणावळवाले जास्तीचे डबे पुरवण्याची जबाबदारी उचलतात. रुग्णांचं जेवण झाल्यावर डबे धुवून पुन्हा वापरण्यासाठी गोळा केले जातात.
   चार वर्षात चाळीस हजार डबे पुरवण्यात आले आहेत. तीन स्वयंसेवक, त्यांचे गणवेश, त्यांच्यासाठी दुचाकी वाहानं, स्टिइलचे आणि प्लास्टिकचे डबे ही या उपक्रमासाठी लागणारी सामुग्रीही लोकांनी सामाजिक जाणिवेतून दिली आहे. हा उपक्रम कायमस्वरुपी सुरू राहावा यासाठी निधीसंकलन करून नियोजनबद्ध काम करण्याचा संकल्प केल्याचं ठाकूर सांगतात.
या उपक्रमाबद्दल गरिबांच्या मनात कोणत्या भावना आहेत हे या एका प्रसंगावरून कळतं. एकदा दिलीप ठाकूर हे माहूरला रेणुका माउलीच्या पदयात्रेला गेले होते. तिथे मंदिराच्या दरवाजाबाहेर फुलवालीकडून फुलं विकत घेण्यासाठी ते थांबले. फुलं विकणार्‍या बाईने त्यांना फुलं दिली. पण पैसे घेण्याचं मात्र नाकारलं. ती ठाकूर यांना म्हणाली, ‘सायेब, तुमी लई पुण्यवान माणसं हायती. माजी पोरगी आजारी असताना आमी नांदेडच्या दवाखान्यात आलो होतो. तिथं
 आमी तुमचा भाऊचा डबा खाल्ला होता. तुमी हजारोंच्या उपाशी पोटाला अन्न देता आणि मी तुमच्याकडून फुलासाठी पैसे घ्यावे का?‘
                                                                          
                                                                                                      ०००शिवाजी कांबळे०००

Monday, February 18, 2013

जोतीराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली !!

जोतीराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली !!

शिवराज्याची पुनःस्थापना करण्यासाठी जोतीराव फुले स्वतः 1874 साली रायगडवर गेले शिवाजिराजांची समाधि तर दृष्टिआड़ गेली होती... तात्यांनी चार दिवस गडावर मुक्काम केला व झाडे झुडपे वेळी,घाणेरी यामध्ये अडकलेली राजांची समाधि व् परिसर स्वच्छ केला..फुले आणली आणि राजांच्या समाधीला ती वाहिली ही घटना रायगडवरील ग्रामजोशिस समजली तो धावत पळत आला आणि जोतीरावना व् शिवरायांना अत्यंत हिन् भाषेत बोलू लागला..शिवरायांच्या समाधीला वाहिलेली फुले ग्रामजोशिने लाथेने उधालुन लावली. 
जोतीरावना शिवरायांचा झालेला अपमान सहन झाला नाही..भट पेशव्यांनी नष्ट केलेल्या शिवरायांचा इतिहास बहुजनंना समजावा यासाठी जोतीरावयांनी शिवजयंती उत्सव सुरु केला... तात्यांनी राजांच्या जीवनावर अत्यंत अभ्यासपूर्ण असा पोवाडा लिहला... सत्यशोधक समाजामार्फत शिवाजिराजांच्या पोवाड्याचे कार्यक्रम गावोगावी होऊ लागले तात्यांनी सुरु केलेली शिवजयंती गावोगावी सुरु झाली. पेशव्यांनी केलेल्या क्रूरकटकारस्थानाचा बदला जोतीराव यांनी घेतला.. 
शिवजयंती उत्सव सुरु केला त्यामुळे पुण्यातील सनातनी भयानक चिडले पण त्यांचा नाईलाज होता कारण बहुजन समाजात जोतीराव यांच्यामुले जागृति झाली होती... त्यामुले शिवजयंती बंद पाडने सनातनी लोकांना म्हणावे तेवढे सोपे नव्हते..यासाठी पेशवेकैवारी टिळक यांनी शिवजयंती बंद पाडन्यासाठी गणपति उत्सव सुरु केला.. आणि खुप मोठ्या प्रमाणात टिळक यशस्वी ठरले कारण आपले मुर्ख लोक आजकाल शिवजयंती जेवढ्या उत्साहात साजरी करत नाहित तेवढ्या उत्साहात गणपति उत्सव साजरा करतात त्यात सहभाग नोंदाविता.. अरे आपली बुद्धि कुठे शेन खायला गेली आहे तेच कळत नाही खरे तर लाज वाटायला पाहिजे आपल्याला ज्या मानसामुळे तुम्ही आम्ही जिवंत आहोत त्याच्या जयंती बाबत एवढा निरुस्ताह म्हणजे आपण स्वार्थी झालो आहोत...एवढे मात्र निश्चित.

Tuesday, February 5, 2013

व्यक्ती नव्हे संस्था !



 आदिवासीबहुल जिल्ह्यात रुग्णालय
 बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय उपक्रम
 युवक, किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण
 ‘डॉक्टर होऊन समासेवा करायचीय...ङ्क बोर्डात  येणाèया विद्याथ्र्यांच्या मुलाखतीत हमखास ऐकू येणारं वाक्य. पुढे त्याच्याशी कितीजण निष्ठा राखतात हा प्रश्नच. आयुष्याकडून खरोखरच अशी अपेक्षा असणा-यांनी मात्र कॉलेजवयातले संस्कार कसे फुलवावेत याचा धडा डॉ. अशोक बेलखोडे यांच्याकडून घ्यावा. १९८० च्या दशकात ‘भारत जोडोङ्क उपक्रमात बाबा आमटे यांच्या कार्यानं प्रभावित सहभागी युवकांमध्ये तेही होते. नागपूरमध्ये वाढलेल्या तरुणाला डॉक्टर झाल्यानंतर तिथं प्रॅक्टीस करुन पैसे कमावत आरामात राहता आलं असतं. पण त्यात समाधान न मानता त्यांनी आदिवासीबहुल किनवटमध्ये आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला.
नांदेड जिल्ह्यातला किनवट तालुका राज्याच्या सीमावर्ती दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात मोडतो. याच कारणानं विकासापासून वंचित. आता आताशा विकासाची पावलं उमटायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याचं ठिकाण नांदेड ते किनवट हे अंतर १५० किमी. पण ते पार करण्यासाठी एसटीबसला तब्बल पाच तास लागतात. याच गतीनं विकास चालला आहे. किनवट प्रशासकीयदृष्ट्या मराठवाड्यात, पलीकडे विदर्भातील यवतमाळची हद्द, तर अवघ्या ५० किमीवर आंध्रप्रदेशातील अदिलाबाद, कापसाची मोठी बाजारपेठ, किनवटच्या उपजाऊ शेतीत कपाशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन असूनही प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक जोडधंदे निर्माण करण्याबाबत सरकार उदासीन. त्याची बीजं सत्ताकारणात. स्थानिक नेतृत्व आदिवासी बंजारा. त्यांना डावलण्याकडे सत्ताधाèयांचा कल.
 किनवटच्या सुमारे सव्वा लाख लोकसंख्येत ४० टक्के आदिवासी आणि ३० टक्के बंजारा समाज. आदिवासींमध्ये प्रामुख्याने गोंड, कोलाम, आंधा, परधान, नाईक यांचा समावेश. २५ टक्के दलित, मुस्लिम, कोमटी समाज. उच्चवर्णीय नाममात्र. येथील व्यवसायीक आणि आर्थिक क्षेत्रावर कोमटी समाजाचं प्राबल्य. इथला आमदार आदिवासी qकवा बंजारा समाजाचाच असतो. डी.बी. पाटील यांच्यासारखा मराठा समाजाचा आमदार अपवादात्मक. यामुळे शासन या भागाकडे नि:पक्षपातीपणे पाहत नाही. असा स्थानिक कार्यकत्र्यांचा आरोप आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासनिधीची फळं सामान्यांना दिसत नाहीत.
प्रशासकीय यंत्रणेत सुसूत्रता नसण्याचेही दुष्परिणाम आहेत. तालुक्याच्या वनविभागीय कारभारावर अकोल्याचं तर प्रशासकीय कारभारावर नांदेडचं नियंत्रण आहे. वनविभागाचा आडमुठेपणाही काही कमी नाही. एकूण जनता अडाणी राहावी यासाठी पोषक वातावरणाची जोपासना झाली आहे. तालुक्यातल्या ४० गावांत वाहतूकीसेवा आजही नाही आणि पावसाळ्यात १० गावांचा संपर्क जगापासून तुटलेला. कोणत्याही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांनी नाहक प्राण गमवावे लागत. तातडीच्या व गंभीर उपचारासाठी या भागातील लोकांना नांदेडला जाण्याशिवाय पर्याय नसे.
औरंगाबादच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून एमएस झाल्यावर १९८९ मध्ये डॉ. अशोक बेलखोडे किनवट इथं ठरवून दाखल झाले तेव्हा अशी स्थिती होती. तालुक्यात एकही सर्जन नव्हता. बालपण कोतेवाडा ता. qहगणा या खेड्यात गरिबीत गेलेलं असल्यामुळे त्यांना गरिबांच्या गरजा नेमक्या ठावूक होत्या. पण किनवटमध्ये वेद्दकीय सेवा देण्याचे  त्याआधीचे इतरांचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते, हा अनुभव पाहता अर्थार्जनाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. हे ही त्यांना उमगलं होतं. अरोग्य अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली ती त्यासाठीच. ते काम सुरु असतानाच किनवटमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारायचा विचार करत होते.
‘हॅलो मेडिकल फाउंडेशनङ्क, ‘मातृमंदिरङ्क बरोबर त्यांनी काम केलेलं होतं. तिथं झालेल्या ओळखीतून अनेकांनी आर्थिक मदत देऊ केली. एका कंपनीनं ऑपरेशन थिएटरचं साहित्य तर डॉ. बोरगावकर यांनी ऑपरेशनची उपकरणं दिली. एका कंपनीनं एक्स रे मशीन दिलं. भंगाराच्या सामानातून पलंग तयार झाले. ३ मार्च १९९५ मध्ये अशा प्रकारे २० खाटांचं साने गुरुजी रुग्णालय ना नफा तत्वावर सुरु झालं. किनवट आणि माहूर तालुक्यातल्या ३९२ खेड्यांतल्या लोकांसाठी ती जीवनरक्षक सेवाच झाली. नांदेड जिल्ह्यातील इतर डॉक्टरांच्या शुल्काच्या ३० ते ५० टक्के कमी शुल्कात इथे तपासणी करुन औषधोपचार दिले जातात. २०१० पर्यंत या रुग्णालयात ३५ हजारांच्यावर कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया, एक हजार हायड्रोसिल शस्त्रक्रिया, सव्वा लाखांवर रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. रुग्णालयातील प्रसुतीला प्रोत्साहन देण्यासाठी इथे प्रसूत होणाèया मातांचा चोळी- बांगडी देऊन सन्मान केला जातो. गावा-पाड्यात शिबिरं आयोजित करुन सानेगुरुजी रुग्णालयाची सेवा वेळोवेळी लोकांपर्यंत पोहचविण्यात आली. वर्षाला ४४० हून अधिक गंभीर रुग्णांवर उपचार असे सरासरी प्रमाण. टँकर अपघातात मृत ठरवल्या गेलेल्या एका महिलेला डॉक्टरांनी योग्य उपचारांनी बरं केल्याची आणि बोअरिंगच्या खोल खड्डयात पडलेल्या मुलाचा जीव वाचविल्याची घटना इथे तात्काळ सेवेचं उदाहरण म्हणून सांगितले जाते. एकखांबी काम असूनही या आडपेठच्या गावात केवळ लोकसहभागातून रक्तपेढी उभारण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी आधी उपचार आणि नंतर आरोग्यशिक्षण असा कार्यक्रमा ठेवला. सानेगुरुजी रुग्णालया हे ‘भारत जोडो युवा अकादमीङ्क सामाजिक कार्यातूनच उभं राहीलेलं असल्यामुळे समाजप्रबोधन आणि सेवा हातात हात घालून चाललं आहे.
कॉलेज युवक मोठ्या शहरात गेले की मौजमजा करतात हे त्यांच्या गुप्तरोगाचं कारण लक्षात आलं तेव्हा डॉ. बेलखोडेंना समुपदेशनाची गरज तीव्रतेने जाणवली. वैयक्तिक समुपदेशनाच्या तुलनेत लैंगिक शिक्षण देणारी व्याख्यानं प्रभावी परिणाम साधतील हा त्यांचा होरा खरा ठरला. शाळा-कॉलेजात अशा व्याख्यानांना विद्याथ्र्यांच्या मोठा प्रतिसाद मिळतो. वैज्ञानिक विचारांची बैठक तयार होणं ही आमची गरज आहे आणि तुमच्या उपक्रमातून ती पूर्ण होतेय, असं विद्यार्थी आवर्जून सांगतात. सामाजिक काम  या दिशेनं पुढे नेण्यासाठी डॉ. बेलखोडेंनी मराठी विज्ञान परिषदचे उपक्रम किनवटमध्ये सुरु केले. अभ्यासक्रमाशी संबंधित प्रयोग मुलांना कार्यशाळेत करु दिल्यामुळे मुलांना, शोधांची, संशोधकांची महती सांगणारी व्याख्यानं आयोजित केल्यामुळे मुलांना शाळेतला अभ्यासक्रम परका वाटेनासा झाला.  आठवी, नववीच्या  मुलींसाठी लैंगिक शिक्षण देणाèया स्लाइड शो व्यतिरिक्त एड्सबाबत माहिती देणारे कार्यक्रमही आयोजित केले जातात. सर्पविज्ञान समजावणं, मुलांसह उल्कावर्षाव पाहणं यातून त्यांना निसर्गवाचनात साक्षर केलं. यातूनच पुढे तालुका विज्ञान-तंत्रज्ञान केंद्र आकाराला आलं. शिवाय महिला सक्षमीकरणाचा मुद्दा संस्थेनं महत्त्वाचा मानला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाèया महिलांना संस्थेतर्फे झेप पुरस्कार महिलांना मार्गदर्शन केलं जातं. बचतगट संस्थांनाही मार्गदर्शन केलं जातं. त्यांच्यासाठी आरोग्य आणि कायदेविषयक शिबिरांचं आयोजन केलं जातं. प्रौढ साक्षरता, रक्तदान प्रसार, बालकामगारांसाठीच्या रात्रशाळा चालविल्या जातात. गरीब मुलांसाठी साने गुरुजी इंग्लिश माध्यमाची शाळा सुरु केलेली आहे. नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य करण्यासाठी प्रथमोपचाराचे धडे घेतलेला युवकांचा गट तयार केलेला आहे. किल्लारीचा भूकंप, गुजरातमधली पूरपरिस्थिती आदी प्रसंगी हा गट मदतीसाठी धावून गेला होता. आरोग्य सुविधा इथेच मिळत असल्याने लोक मोठ्या शहराकडे आताशा जात नाहीत. असं असलं तरी खेड्यांकडं वळणारा  इतर दुसरा डॉक्टर इथे एवढ्या वर्षात दिसलेला नाही, याला काय म्हणायचं?        

                               ---- शिवाजी कांबळे
                           shivaji.kamble5@gmail.com

शेतीविकासाचा मराठवाडी पॅटर्न



 भारतात शेतीवर अवलंबून असणा-यांचं प्रमाण ८० वरून ६० टक्क्यांवर आलं आहे. कारण शेती करणं हे दिवसेंदिवस बिकट होत चाललं आहे. अर्थकारण, तंत्रज्ञान आणि हवामान हे शेतीचं भवितव्य ठरवणारे मुख्य घटक. तीन दशकांपूर्वी मराठवाड्यासारख्या सदाच्याच दुष्काळी भागात शेतक-यांची अवस्था आणखीच बिकट होती. शेतक-यांना शेतजमिनीचा नीठ वापर करता येत नसे. शेतात विहीर करून देण्यास संस्थेंन वा सरकारनं मदत दिली तर शेतक-यांना अप्रुप वाटत असे. मराठवाड्यात सर्वत्र जसं पाण्याचं, तसंच माहितीचंही दुर्भिक्ष आणि आधुनिकतेचंही वावडं. अशावेळी स्कॉटिश मिशन-यांनी ५० व्या दशकात स्थापन केलेल्या ‘वॉर ऑन वॉन्टङ्क या संस्थेचं चांगलं काम पुढे सुरू ठेवण्यासाठी १९६८ साली मराठवाडा शेती सहाय्य मंडळ या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. शेती, ग्रामीण विकास आणि सामजिक काम यातले दीर्घानुभवी आणि दूरदृष्टी असलेले डॉ. बी. आर. बारवाले, बॅ. जे.एम. गांधी, विजयअण्णा बोराडे, दादासाहेब अन्वीकर, डॉ. मोझीझ हे मंडळाचे विश्वस्त. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकèयांच्या शेती उत्पादनात आणि उत्पादकतेत वाढ करणं आणि गरीब शेतक-यांचं जीवनमान उंचावणं यासाठी मंडळानं काम सुरू केलं.
 भूगर्भातील खालावत चाललेली पाण्याची पातळी या समस्येची उकल व्हावी म्हणून तंत्रशुद्ध पर्याय आणि साधनं यांचा शोध घेण्याचं काम मराठवाडा शेती सहाय्य मंडळ करत होतं. सुरूवातीच्या काळात मंडळाने विहिरी खोदत, बोअर करून देत पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकèयांना मदत केली. पण सततचे दुष्काळ आणि जमीन, पाणी, जंगल आणि पशुधन यांत सातत्यानं होणारी घट यामुळे हे प्रयत्न अपूरे पडले. भारतात पहिल्यांदाच सहा इंच व्यासाची आणि २०० फुटंपेक्षा जास्त खोलवर जाणारी ट्यूबवेल परदेशातून आणण्याचं श्रेय संस्थेचंच. मात्र ही ट्यूबवेल जमिनीखालच्या पाण्याचा प्रचंड उपसा करणारी आहे हे लक्षात आल्यानंतर ती वापरणं संस्थेनं बंद केलं. अशा तèहेनं पाणी उपसणं हे पाप असल्याचं संस्था मानते.
१९७२ च्या माठ्या दुष्काळाचे दिवस. ड्रिqलग आणि विहिरी खोदणं याद्वारे भूगर्भातील पाणी काढणं उचित नाही. ते जास्त काळ चालू शकणार नाही, असं चर्चा, अनुभव, qचतन यातून लक्षात आलं. त्यामुळं भूजल पुनर्भरणाचा विचार सुरू झाला आणि पहिला जलसंधारण उपक्रम रेवगांव जिल्हा जालना येथे राबवला. सिमेंद बंधाèयाचा साखळी पद्धतीने वापर करून पाणी अडवण्याचा हा प्रयोग. त्यात अनेक तांत्रिक उणिवा होत्या. त्यापुढे लक्षात आल्या तशा त्या दूर करण्यात आल्या. दुष्काळानंतर १९७४-७६ मध्ये जालना जिल्ह्यातल्या देवqपपळगाव इथे पाणलोटाचं काम हाती घेतलं. १९७८ मध्ये याचा चांगला परिणाम दिसून आला. त्याचवर्षी शेतकरी आणि शासन यांच्या चर्चेतून ‘माती अडवा पाणी जिरवाङ्क हा उपक्रम सुरू झाला. १९८० च्या सुरूवातीला लोकसहभागातून जलसंधारण करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचे संस्थेनं प्रयत्न केले. आडगाव तालुका जिल्हा औरंगाबाद इथल्या ग्रामस्थांनी देवqपपळगावपेक्षाही कामात जास्त सहभाग देण्याची इच्छा आणि तयारी दाखवली. १९८४ मध्ये सुरूवात केली. मात्र या गावाच्या जमिनी तुलनेनं हलक्या होत्या. तांत्रिकदृष्ट्या काम परिपूर्ण होण्यासाठी शासनाच्या मृदसंधारण, सामाजिक वनीकरण या खात्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. जलसंधारणाचं काम शासनासोबत करणं हा त्या काळाचा अनोखा प्रयोग होता. या अनोखेपणामुळच कामाल स्विस डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अर्थसहाय्य केलं. शासनातल्या लोकांची कामं करण्यासाठी मनवणं, वळवणं अवघड होतं. पण आम्हीही आमची रीत थोडे बदलून त्यांच्याशी जुळतं घेत काम केल्यामुळं अपेक्षित परिणाम मिळू शकला असं मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. शासनाशी भागीदारी ही संस्थेसाठी नवीन संधी ठरली.
या प्रकल्पामुळं जेमतेम एक पीक घेणारं आडगाव वर्षाला दोन पिकं घेऊ लागलं. थोडं बागायती क्षेत्रही विकसित झालं. साखळी बंधाèयामुळं पाणीसाठ्यात लक्षवेधी वाढ होऊ शकते हे सिद्ध झालं. राज्यात शासकीय यंत्रणेसोबत समाजसेवी संस्थांचा सहभाग यशस्वी ठरला. हे एक नवीन उदारहण म्हणून पुढे आलं. १९८८ पासून याला ‘आडगाव पॅटर्नङ्क असं नाव पडलं. पुढे आडगाव पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रात अन्यत्र पाणलोटाची कामं व्हावीत. हा विचार जोर धरू लागला. याच काळात संस्थेच्या कामाला खूप प्रसिद्धी मिळाली. संस्थेचं काम बघण्यासाठी आडगावला भेटी देणाèयांचं प्रमाण वाढलं. विजयअण्णा सांगतात, ‘‘ त्या प्रसिद्धीमध्ये आम्ही वाहवत गेलो आणि त्याचा परिणाम कामावर झाला. त्यानंतर मात्र आम्ही प्रसार माध्यामांचा कधी आधार घेतला नाही माध्यमं वाईट नसतात. प्रसिद्धी पचवून पुढे जाणं आम्हाला जमलं नाही ही आमची चूक!ङ्कङ्क ते मोकळेपणाने कबुल करतात. आडगाव अनुभव पुढे इंडोजर्मन पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन या क्षेत्रात भरीव काम करण्याची संधी मिळत गेली. १९९४ साली जर्मन पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कडवंची इथे संस्थेनं पाणलोटाचं काम यशस्वी केलं. या पाणलोटामुळे मातीची धूप कमी होऊन २४५ हेक्टर जमीन लागवडीखाली आली. त्यामुळे सरासरी उत्पन्नात सातपटीने वाढ झाली. याच गावात संस्थेनं १६४ शौचालयं आणि ८० गॅसजोडण्या लोकांना दिल्या.
 शेतीविकासाबरोबरच समाजसंघटन ही एक महत्वाची जबाबदारी असल्याचं संस्था मानते. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातली ६० खेडी स्वयंपूर्ण होणं हा संस्थेनं केलेल्या कामांचा परिणाम आहे. तिथे अनेक चांगल्या प्रथांचा पायंडा पडला. धूलिवंदन आणि कोजागिरी पोर्णिमा या दिवशी गावकèयांना एकत्र करून ग्रामीण विकासाच्या एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा आणि त्यानुसार कृती करण्याचा उपक्रम आजही सुरू आहे. शासनाच्या शेती धोरणाबद्दल मंडळाचे मत काय? शासनाने शेतकèयांना अनुकूल धोरणं राबवली आहेत, असं संस्थेचं मत आहे. शेतकèयांची कर्जमाफी, व्याजदर कमी करण्याचा निर्णय, ५० हजारांपर्यंत बिनव्याजी कर्ज, मालाच्या आधारभूत qकमतीत केलेली भरीव वाढ, राष्ट्रीय जलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून फळबाग लागवड व तत्सम व्यवसायांना, सुक्ष्म qसचनास दिलेली चालना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषीविकास कार्यक्रम यासारखे अनेक स्तुत्य उपक्रम शासनाने हाती घेतलेले आहेत. आणखीही काही गोष्टींची आवश्यकता आहे., असं संस्थेला वाटतं. हा व्यवसाया पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. शेती, पाणलोट या कामात तांत्रिक बाबी महत्वाच्या असतात. त्या शेतकèयांना शिकवणं आणि शेतीमागचा शेतकèयांचा विचार पक्का व्हावा यासाठी मदत करणं असं दुहेरी काम संस्था करत आली आहे. विजयअण्णा बोराडे सांगतात, ‘‘ शेतकरी एकवेळ धर्म बदलतील, पण पीक रचना बदलायला तयार नसतात. मराठवाड्यासारख्या भागात कमी पाण्यावरची पिकं घ्यायला हवीत. गव्हाचा पेरा घेऊ नका, ज्वारी-हरबèयाचा घ्या असं सांगितलं तर शेतकरी ऐकत नाहीत. कारण प्रतिष्ठा आडवी येते. उस, गहू, केळी ही जास्त पाण्यावरची पिकं प्रतिष्ठेची मानली जातात. कारण ती नफा कमावून देतात. पण हा नफा पाण्यावर अवलंबून असतो. पाणी पुरं पडलं नाही की पीक १० वरून दोन क्विंटलपर्यंत खाली येतं.ङ्कङ्क  मात्र संस्थेकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर शेतकरी रासायनिक खतांचा वापर कमी करायला सुरूवात करतात आणि आधुनिक शेतीकडे वळू लागतात.
गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात पावसाच्या सरासरीत फार फरक पडलेला नाही. तरीही पिकांचं नुकसान होतं. कारण पाणलोटाचा अभाव. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही पिकांना योग्य तेवढं पाणी मिळणं. अशी यशस्वी पाणलोटाची व्याख्या विजयअण्णा करतात. दोन पावसामधलं अंतर लांबलं तरी मग पिकांचं नुकसान होत नाही. १९९२ साली संस्थेनं कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. या केंद्राद्वारे तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीवरील चाचण्यांचं आयोजन केलं जातं. शेतकèयांना आधुनिक विकसित शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. दर महिन्याच्या पाच तारखेला पूर्वनियोजित विषयावर चर्चासत्रं होत असतात.  या उपक्रमात आतापर्यंत १६६ चर्चासत्रं झाली आहेत.
संस्थेनं औरंगाबाद जिल्ह्यातल्या २० गावांमध्ये एकात्मिक कापूस कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १० हजार झाडांची लागवड केली. कापसासाठी संस्थेनं प्रयोगशाळा उभी केली आहे. ुुु-ळपवळर  या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने उत्कृष्ट कापूस पुढाकार उपक्रमांतर्गत शाश्वत कापूस उत्पादन पथदर्शक प्रकल्प जालना जिल्ह्यातील ३० गावात एकूण तीन हजार शेतकèयांच्या सहकार्याने ६ हजार हेक्टर क्षेत्रावर सुरू आहे. पाचवर्षांपूर्वी संस्थेनं राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या सहकार्याने फिरतं कृषी चिकित्सालय सुरू केलं आहे. त्यामुळे गावातल्या गावातच पाणी, माती परिक्षणाची सोय झाली. पीक प्रात्याक्षिक दिलं. यामुळे जमिनीचं आरोग्य आणि संतुलित खताच्या वापराबाबत शेतकèयांमध्ये जागरूकता वाढत चालली आहे. मराठवाडा शेती सहाय्य मंडळ विदर्भातही पोचलं आहे. विदर्भ पाणलोट मिशन कार्यक्रमात विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या कामात मंडळ सहभागी आहे. कामासाठी निधी  न मिळणं, चांगले कार्यकर्ते न मिळणं, विपरित शासकीय धोरणांचा त्रास अशा कित्येक अडचणी अन्य स्वयंसेवी संस्थाप्रमाणे मराठवाडा शेती सहाय्य मंडळालाही आल्या. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न संस्था करत आली आहे. लोकसहभाग आणि संस्थेबद्दल शेतक-यांना वाटणारा विश्वास ही संस्थेची बलस्थानं आहेत.
         
                                 ---- शिवाजी कांबळे
                                         ९०४९२९८७५०
                             shivaji.kamble5@gmail.com      

गावविकासाचा उगम



 त्या दिवशी शाळा भरली तेव्हा प्रार्थनेला सगळे चुकार  िशक्षक हजर होते. हो ! शिक्षक, मुलं नव्हे! एरवी शाळा भरल्यावर दोन तासांनी उगवणा-या या महाभागांना चांगली जरब बसली होती. शांततामय मार्गाने महिलांनी ती बसवली होती. qहगोलीतल्या एका खेड्यात शाळेचा कारभार सुधारण्याचा हा चमत्कार बचतगटाने केलेला. केवळ आर्थिक सक्षमतेसाठीच बचतगट नसतात; तर त्यांनी गावाच्या उत्कर्षासाठी कारभारातही लक्ष घातलं पाहिजे हे जयाजी पाईकराव यांनी पक्कं रूजवलय. त्यांच्या ‘उगमङ्क या संस्थेचं काम पाहणाèयांना असे अनेक चमत्कार दिसतात. रखरखाट, पाण्याचा खडखडाट, खेडुतांचं मागासलेपण ही मराठवाड्याची वैशिष्ट्ये इथे गायब होतात. विज्ञाननिष्ठा बाळगून काम करण्यानं लोकांची स्थिती किती बदलू शकते हे कळतं.
नामांतर आंदोलनाच्या काळात झालेली जाळपोळ आणि नुकसान पाईकरावांनी जवळून पाहिलं होतं. ते सांगतात, ‘‘ दलितांच्या शोषणामागे आर्थिक मागासलेपण आहे आणि त्यावर विजय मिळविल्याशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणवलं. पत्रकारिता सोडून सामाजिक कार्याचे रितसर धडे गिरवायचं ठरवून मी १९७९ साली मुंबईच्या ‘टाटाङ्क  सामाजिक विज्ञान संस्थेत प्रवेश घेतला. या संस्थेत प्रवेश घेणारा मराठवाड्यातला मी पहिलाच!ङ्कङ्क अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पाईकरावांनी समाजकल्याण अधिकारी म्हणून नोकरी केली. पण मन रमलं नाही. राजीनामा देऊन पूर्णवेळ समाजकार्य सुरू केलं. युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून नांदेडमध्ये त्यांची ओळख होतीच. १९८३ मध्ये ‘कयाधु ग्रामविकास संस्थेङ्क ची स्थापना करुन त्यांनी कंजारासह १५ गावांत रचनात्मक काम सुरु केलं. १९९० पर्यंत पाणलोट, ग्रामविकास यांवर भर होता. पाणीव्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. मुकुंद घारे, अणदूरचे डॉ. अहंकारी अशा तज्ज्ञांच्या सहकार्याने हे काम पुढे नेणं चाललं होतं. तीन गावात संस्थेच्या पाणलोट क्षेत्राच्या कामाल यश आलं. कळमनुरी तालुक्यातल्या जुंबडा गावात कायम पाणीटंचाई होती. त्यामुळं या गावात लोक आपली मुलगी देत नव्हते. पण पाणलोट क्षेत्रविकास झाल्याने आता याच गावातून चार गावांना पाणी पुरवलं जाऊ लागलं ! आर्थिक विषमता दूर व्हायची असेल, तर महिलाकेंद्रित उपक्रमांना पर्याय नाही, हे जाणून १९९६ साली ‘उगमङ्क ची स्थापन झाली. बचतगट चळवळीला नियोजनबद्ध रूप देणारे विजय कुलकर्णी आणि सुधा कोठारी यांनी जुंबडा गावात बचतगट स्थापण्यासाठी ‘उगमङ्क ला मदत केली. पुढे जमीन अधिकार आंदोलनात सहभागी होऊन ‘उगमङ्क ने गायरानधारक महिलांचे बचतगट गावोगावी तयार केले खरे, परंतु त्यांना पैसे द्यायला बँका कमी पडत होत्या. म्हणून जमीन अधिकार आंदोलनात एकत्र आलेल्या सामाजिक संस्थांनी अनिक फायनान्शियल सव्र्हिसेस प्रा. लि. ची स्थापनाा केली. तिने जिल्ह्यातल्या बचतगटांना २०१० मध्ये २१ लाख ९४ हजार रूपयांचं कर्जवाटप केलं. शेळीपालन, दुग्धविकास, बैलखरेदी, किराणा दुकान, बांगडी व्यवसाय अशासारख्या कामांसाठी ते होतं. दरम्यान पाईकराव यांनी जमिनीचा कस, पिकं यासाठी सेंद्रिय शेती कशी चांगली ठरते त्याची शिबिरं घ्यायला सुरूवात केली होती. लोकांना तिचं महत्व वाटू लागल्यावर दोन -तीन एकर जागेपैकी किमान दहा गुंठे जागेत सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन केलं होतं. १९९६ मध्ये ‘उगमङ्क ची स्थापना झाल्यापासून हिंगोली जिल्ह्यात प्रथमच अशी शेती प्रत्याक्षात आली. व्यवहारात पैसा असेल, तरच पुरुष कामाला सरसावतात ही मानसिकता लक्षात घेऊन बचतगटांच्या महिलांनाच या शेतीचं प्रशिक्षण दिलं होतं.
 रासायनिक खतांना पर्याय म्हणून èहाझोबियम, गांडूळखत अशी जैविक खतं वापरली. एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या भाज्या, धान्यांना चांगला मोबदला मिळवून देण्याकरिता हमखास बाजारपेठही ‘उगमङ्क विकसित केली. qहगोलीच्या जिल्हा परिषदेसमोर दर शुक्रवारी असा वेगळा बाजार भरविण्यात येतो. औरंगाबादमध्ये प्रदर्शन भरवून चोखंदळ ग्राहकांपर्यंत हा माल पोचवण्यात आला. भाज्यांची मुळ चव राखली गेल्यामुळे, तुलनेत त्या जास्त टिकाऊ असल्याने ग्राहकवर्ग कायमचा बांधला गेला. या उत्पादनांना नेहमीपेक्षा १० टक्के भाव जास्त मिळतो. विक्री व्यवहारात दलाल-अडत्याला स्थान नाही त्यामुळे झालेला अख्खा न नफा शेतकèयांचाच. सातत्याने दहा वर्षे या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे ५० गावांतले अडीच हजार अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक या शेतीत स्थिरावले आहेत. आजूबाजूच्या क्षेत्रातून शेतकèयांच्या आत्महत्यांच्या बातम्या येत असताना, या गावात तसं नाही हेही लक्षणीयच. कृषी तंत्रज्ञानाबाबत महिलांना डावललं जातं असं पाईकरावांना दिसून आलं. पुरूष शेतीचं केवळ ३० टक्के काम (पेरणी, वखरणी, नांगरणी) करतात पण त्यांना ७० टक्के तंत्रज्ञान मिळतं. सातबारा उताèयावर नावही पुरूषाचंच असतं. पण शेतात राबते महिला. शेतकी प्रशिक्षणात मात्र तिला मागे ठेवलं जातं. पुरुषांनी शिबिरात ऐकलेलं बाईपर्यंत पोचतच असं नाही. ‘उगमङ्क ने महिलांसाठी कृषीतंत्रज्ञान प्रशिक्षण सुरू केलं. त्यांना कृषी विद्यापीठात नेऊन कृषी अधिकाèयांशी भेट घडवून आणली. पेरणी अगोदरची बीजप्रक्रिया, मिश्रपिक घेण्याचे फायदे, दोन तासांमधलं (रोपांच्या ओळी) अंतर, काढणी पश्चात प्रक्रिया हे शिकवलं. २००९ पासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत तीन हजार शेतकरी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. सेंद्रिय पद्धतीनं मिळविलेल्या धान्याची डाळ जात्यावर केली, तर तिची चव टिकते हे हेरून संस्थेनं जात्याचा प्रचार केला. पण गृहणींची जात्याची सवय सुटलेली. यावर उपाय म्हणून बेअरिंग असलेलं जातं निर्माण केलं गेलं. हे सुटसुटीत जातं आता ग्रामीण भागात लोकप्रिय होत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा स्वयंसेवी संस्थाच्या मदतीनं राबवावा असा वटहुकूम २००९ मध्ये सरकारनं काढला. प्रत्येक जिल्ह्याला त्यासाठी निधीही दिला. qहगोली जिल्ह्यात ‘उगमङ्क कडे ही जबाबदारी आली. तेव्हा पाईकराव आपल्या नियोजनबद्ध आराखड्यासह सरसावले. गावसुक्ष्म नियोजन हा ‘मग्रारोहयोङ्क मधला कळीचा घटक. त्यांनी सात ते अकरा गावांचा एक गट करून अभ्यास केला. प्रशिक्षण घेतलं आणि अहवाल सादर केले. त्याद्वारे ७०० गावातल्या मजुरांना कामं मिळाली. वटहुकूमाची तामिली करण्यासाठी सरकारी निधीचा विनियोग झाला. या कामाची इतकी प्रशंसा झाली की इतर गावांनी qहगोलीचा धडा गिरवावा असं वरून सांगण्यात आलं. बाकीच्या जिल्ह्यातला निधी तोपर्यंत अनेक वाटांनी गायब झालेला होता. त्यामुळं पुन्हा एकदा निधी वाटून ‘qहगोली पॅटर्नङ्क राबविण्याचा आदेश देण्यात आला. यावेळी qहगोलीलाही निधी मिळाल्यामुळं पाईकरावांनी काम आणखी परिणामकारक केलं. रोहयोचं काम ७०० वरून १४०० गावांत पोचलं.
जागतिक पातळीवर विविध १२ निकषांनुसार (दरडोई उत्पन्न, दुष्काळाची तीव्रता, साक्षरता, स्त्रीपुरुष लोकसंख्या, बालमृत्युदर वगैरे) मानवविकास निर्देशांक ठरतो. त्यानुसार देशातली मागास राज्यं, राज्यातले मागास जिल्हे शोधले जातात. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील १२ जिल्हे मागास म्हणून निश्चित केले. त्यातही qहगोलीचा क्रमांक खालचाच होता. जिल्ह्यातल्या गावांमधल्या समस्या नेमक्या शोधून त्या मानवविकास मिशन (औरंगाबाद) पुढे मांडणं, त्यांच्या निर्मुलनासाठी प्रयत्न करणं ‘उगमङ्क नं सुरू केलं. qहगोलीत सेनगाव तालुका सर्वाधिक मागास. इथे स्त्रियांची संख्या दर हजारी ८२६. इथे सतत संपर्क ठेवून लोकसहभागातून उपक्रम केले. मागास भागांसाठीचा निधी मिशनकडून सेनगावकडं वळवळा आणि गर्भqलगनिदान रोखणं, जलस्त्रोत बळकटीकरण आदी कामं घडवून आणली.
‘उगमङ्कचे कार्यकर्ते पाच दिवस गावात जाऊन राहतात आणि तिथली परिस्थिती अभ्यासतात. त्यांच्यातलचं एक होऊन राहायचं असल्यानं ते आपल्यासोबत काहीही नेत नाहीत. नेसत्या वस्त्रानिशी जातात. लोकांना भेटतात. समस्या अनुभवतात. त्या मानवविकासला सादर करतात. मिशनकडून गावसुधारणा साधून घेण्यास संपूर्ण गावाला सामावून घेतात. तारेगावमधली सहा महिने बंद असलेली अंगणवाडी सुरू होते. बंद झालेलं खाऊ देणं सुरळीत होतं. ग्रामसेवकाची वागणूक सुधारते. शिक्षकांची मनमानी बंद होते. संडासला जागा नसलेल्या  गावात शोषखड्डयांचा उपाय काढला जातो. किशोरींच्या रक्तचाचण्या घेऊन हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. गावागावानुसार समस्या बदलतात.
शासकीय योजना आणि त्यावर आधारित कामांवर संस्थेचा भर असल्यामुळं जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणेशी संस्थेचा चांगला समन्वय आहे. योजनांच्या अंमलबजावणीसाठी याचा फायदाही होतो. मात्र अन्याय, अत्याचाराविरोधात, न्याय हक्कांसाठी, स्थानिक प्रशासनाच्या, सरकारच्या विरोधात आंदोलन करताना संस्थेचे प्रशासकीय संबंध कधी कधी अडचणीचे ठरतात. ‘उगमङ्क जरी महिलाकेंद्रित कामातून झाला असला तरी संस्थेचं कमा नदीच्या प्रवाहाप्रमाणे वळणावळणाने मार्गक्रमण करत वाटेवरच्या गावांना विकासाच्या दिशेनं घेऊन चाललं आहे.

               ---- शिवाजी कांबळे
                shivaji.kamble5@gmail.com

Translate