Wednesday, June 5, 2013

लातूरचा ‘ हिरा'


परवा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लातूर मुक्कामी एका कार्यक्रमात म्हटले होते की, लातूर हे मराठवाड्यातील ऑक्सफर्ड आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी शिक्षणाचा लातूर पॅटर्न पुढे आणला. पण आता स्पर्धा परीक्षेतही लातूर पॅटर्न निर्माण होत आहे. लातूर जिल्ह्यातील सहा मुलांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. या परीक्षेत उत्तीर्ण होणं साधी बाब नाही. अशा या देशातील सर्वोच्च परीक्षेत देशात पंधरावा येणारा कौस्तुभ चंद्रप्रकाश दिवेगावकर त्यापैकीच एक यशोदिप.
रेणापूर तालुक्यातील दिवेगाव हे त्याचे गाव. वडिल शेती करुन होमिओपॅथी प्रॅक्टीस रतात. तर आई गृहिणी आहे. अशा मध्यमवर्गीय कुटुंबातील कौस्तुभ हा त्यांचा एकुलता एक मुलगा. कौस्तुभचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण लातूरच्या केशवराज विद्यालयात झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरच्याच मिqलद महाविद्यालयात घेतले. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्याने कला शाखेत  मराठी विषय घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं नंतर त्याने औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडर मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.कौस्तुभने २०१२ मध्ये झालेल्या युपीएससीच्या अंतीम परीक्षेत देशात १५ वी रँक मिळवली. त्याने अतुलनीय असं यश मिळवलं. कौस्तुभ आपल्या या यशाबद्दल सांगताना म्हणतो की, फुल-शाहू -आंबेडरी विचारांची प्रेरणा, आई-वडिलांचे आर्शिवाद आणि गुरुजणांचं मार्गदर्शन यामुळंच मी हे यश प्राप्त करु शकलो. युपीएससीसाठी त्याने मराठी, इतिहास आणि समाजशास्त्र हे वैकल्पिक विषय घेतले होते. या विषयांचा अभ्यास करिअरसाठी आणि युपीएससीसाठी महत्त्वाचा वाटला. जाणीवपूर्व आणि डोळसपणे आपण समाजातील प्रश्नांकडं पाहणं आणि संवेदनशील असणं, हे युपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पोषक असल्याचं कौस्तुभने सांगितलं. आपणास युपीएससीच्या मुलाखतीत सद्धा साहित्य, शिक्षण आणि समाज याचा संबंध, यावरच अधिक प्रश्न विचारण्यात आले. अभ्यासाबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, मी स्वत:चे नोट्स काढले, गाईडचा वापर केला नाही. अभ्यास रोज किती तास करायचा, असं काही निश्चिीत नव्हतं, पण किमान चार-पाच तास अभ्यास करत होतो. एनसीआरटी आणि महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांचा उपयोग केला. फ्रंटलाइन, हिंदू सारखी वृतपत्रं आणि मुलाखतीच्या दरम्यान महाराष्ट्र शासनाचे लोकराज्याच्या वाचनाचा खूप फायदा झाला. परीक्षेचा काळ हा खडतर काळ असतो, पण या काळात नाउमेद न होता तयारी केली पाहिजे. कारण ही परीक्षा म्हणजे एक प्रकारे मानसिक कणखरतेचीच असते. अशा स्पर्धा परीक्षेकडे येणाèया विद्याथ्र्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता पुढे आले पाहिजे. मराठीतही अभ्यास साहित्य भरपूर उपलब्ध आहे. त्याचा फायदा स्पर्धा परीक्षेत उतरु इच्छिणाèया विद्याथ्र्यांनी घ्यायला हवा. असा संदेश त्याने आजच्या तरुणाईला दिला आहे.
                                                                                   
                                                                                  -शिवाजी कांबळे
                                                                                    ९०११३०८५८०

No comments:

Post a Comment

Translate