अंधाराच्या सनातनी दुतांनो, तुमच्या तथाकथित अध्यात्मिक शक्तिने
कणभरही मारता आलं नाही नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला,
अंतिमत: ....पराभूत होऊन तुम्हाला टेकावे लागले गुडघे,..
म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं...
सचिन माळी नामक तरूणाने ऑर्थर रोड जेलमधून डॉ.नरेंद्र दाभोलकरांवर लिहिलेली ही कविता तमाम सनातन्यांसाठी एक मोठी चपराक आहे. एवढेच नाही तर पुरोगामीपणाचा टेंभा मिरविणाèया आणि तब्बल दीड महिना उलटून गेला तरी दाभोलकरांच्या मारेकèयांचा शोध लावू न शकलेल्या शासनकत्र्यांसाठी आत्मपरिक्षण करायला लावणारे हे स्पदंन आहे. दाभोलकरांचे मारेकरी अद्यापही मोकाटच असल्याने महाराष्ट्रातील तमाम सुधारणावादी पुरोगामी कार्यकत्र्यांमध्ये अशी प्रचंड अस्वस्थता, एक धुमस् निर्माण झाली आहे. दाभोलकरांच्या हत्येला महिना पूर्ण झाल्यानंतर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकत्र्यांच्या आणि सहानुभूतीदारांच्या बैठका झाल्या. काही ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकाèयांना निवदने देऊन दाभोलकरांच्या हत्येची उकल करण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. पोलिस आणि शासनकर्ते आपल्या नेहमीच्या शैलीत शोध सुरु आहे, आमचे प्रयत्न सुरु आहेत, आम्ही आरोपींपर्यत पोहचत आहोत, काही माग सुद्धा लागलेला आहे, अशी उत्तरे देत आहेत. महिनाभरात केवळ दोन आरोपीचे स्केच, याच्या पलिकडे पोलिसांचा तपास गेलेला नाही. सीसीटीव्ही कॅमेèयावर हत्येत गुंतलेल्या आरोपींचे पुसटसे चित्रण लंडनच्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हे चित्रण महिनाभरापूर्वीच लंडनला का पाठविण्यात आले नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात गुन्ह्यांचा शोध लावण्याच्या पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे कितीही गूढ गुन्हा असला तरी त्याचा शोध लावला जातोच. राज्यातील पोलिस शोध तंत्राचा वापर करण्यास सक्षम नाहीत, असेही नाही, पण दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत दिरंगाई का ? या दिरंगाईमुळेच समाजात अस्वस्थता आणि अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. दाभोलकरांच्या मारेकèयांचा शोध घेण्यास शासन आणि पोलिसांना अपयश येत असल्यामुळे दाभोलकरांच्या हत्येमागे शासनाशी संबंधित असलेल्या कोणाचा तरी हात आहे की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दाभोलकरांच्या संदर्भात अशा अनेक शंका कुजबुजल्या जात असून त्या चर्चेतही आल्या आहेत. या सगळ्या शंकांना एकच उत्तर उपाय ठरू शकतो ते म्हणजे शासनाने तात्काळ तपास करून मारेकèयांना कठोर शासन करणे. जर राज्य शासन आणि पोलिसांना तपास लावणे शक्य होत नसेल तर ते प्रकरण सीबीआयकडे द्यावे. जेणेकरून दाभोलकरांच्या हत्येचा पर्दाफाश होऊ शकेल. मारेकèयांनी दाभोलकरांची हत्या करून परराज्यात पोबारा केला असावा, अशी काहींची शंका असल्याने तपास सीबीआयकडेच देणे पर्याप्त ठरू शकेल. दाभोलकरांचा खुनी शोधण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीचीही मदत घ्यावी, अशी अपेक्षा दाभोलकरांचे चिरंजिव, डॉ.हमीद दाभोलकर यांनी परवा लातूरला आल्यानंतर व्यक्त केली. दाभोलकरांचे कुटुंबही राज्याच्या पोलिस तपासावर विश्वास दर्शवित आहेत आणि पोलिसांना मात्र कसलेच धागेदोरे सापडत नाहीत. याचा अर्थ काय? जादूटोणा विरोधी कायदा संमत व्हावा, यासाठी दाभोलकरांचा बळी गेला. तो कायदा संमत व्हावा यासाठी राज्यासह केंद्रातील बड्या नेत्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी महाराष्ट्राने खंबीरपणे उभे राहण्याची खरी गरज आहे. नागपूरात होणाèया हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर झाला तर तीच दाभोलकरांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल.
कणभरही मारता आलं नाही नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला,
अंतिमत: ....पराभूत होऊन तुम्हाला टेकावे लागले गुडघे,..
म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं...
सचिन माळी नामक तरूणाने ऑर्थर रोड जेलमधून डॉ.नरेंद्र दाभोलकरांवर लिहिलेली ही कविता तमाम सनातन्यांसाठी एक मोठी चपराक आहे. एवढेच नाही तर पुरोगामीपणाचा टेंभा मिरविणाèया आणि तब्बल दीड महिना उलटून गेला तरी दाभोलकरांच्या मारेकèयांचा शोध लावू न शकलेल्या शासनकत्र्यांसाठी आत्मपरिक्षण करायला लावणारे हे स्पदंन आहे. दाभोलकरांचे मारेकरी अद्यापही मोकाटच असल्याने महाराष्ट्रातील तमाम सुधारणावादी पुरोगामी कार्यकत्र्यांमध्ये अशी प्रचंड अस्वस्थता, एक धुमस् निर्माण झाली आहे. दाभोलकरांच्या हत्येला महिना पूर्ण झाल्यानंतर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकत्र्यांच्या आणि सहानुभूतीदारांच्या बैठका झाल्या. काही ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकाèयांना निवदने देऊन दाभोलकरांच्या हत्येची उकल करण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. पोलिस आणि शासनकर्ते आपल्या नेहमीच्या शैलीत शोध सुरु आहे, आमचे प्रयत्न सुरु आहेत, आम्ही आरोपींपर्यत पोहचत आहोत, काही माग सुद्धा लागलेला आहे, अशी उत्तरे देत आहेत. महिनाभरात केवळ दोन आरोपीचे स्केच, याच्या पलिकडे पोलिसांचा तपास गेलेला नाही. सीसीटीव्ही कॅमेèयावर हत्येत गुंतलेल्या आरोपींचे पुसटसे चित्रण लंडनच्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हे चित्रण महिनाभरापूर्वीच लंडनला का पाठविण्यात आले नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात गुन्ह्यांचा शोध लावण्याच्या पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे कितीही गूढ गुन्हा असला तरी त्याचा शोध लावला जातोच. राज्यातील पोलिस शोध तंत्राचा वापर करण्यास सक्षम नाहीत, असेही नाही, पण दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत दिरंगाई का ? या दिरंगाईमुळेच समाजात अस्वस्थता आणि अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. दाभोलकरांच्या मारेकèयांचा शोध घेण्यास शासन आणि पोलिसांना अपयश येत असल्यामुळे दाभोलकरांच्या हत्येमागे शासनाशी संबंधित असलेल्या कोणाचा तरी हात आहे की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दाभोलकरांच्या संदर्भात अशा अनेक शंका कुजबुजल्या जात असून त्या चर्चेतही आल्या आहेत. या सगळ्या शंकांना एकच उत्तर उपाय ठरू शकतो ते म्हणजे शासनाने तात्काळ तपास करून मारेकèयांना कठोर शासन करणे. जर राज्य शासन आणि पोलिसांना तपास लावणे शक्य होत नसेल तर ते प्रकरण सीबीआयकडे द्यावे. जेणेकरून दाभोलकरांच्या हत्येचा पर्दाफाश होऊ शकेल. मारेकèयांनी दाभोलकरांची हत्या करून परराज्यात पोबारा केला असावा, अशी काहींची शंका असल्याने तपास सीबीआयकडेच देणे पर्याप्त ठरू शकेल. दाभोलकरांचा खुनी शोधण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीचीही मदत घ्यावी, अशी अपेक्षा दाभोलकरांचे चिरंजिव, डॉ.हमीद दाभोलकर यांनी परवा लातूरला आल्यानंतर व्यक्त केली. दाभोलकरांचे कुटुंबही राज्याच्या पोलिस तपासावर विश्वास दर्शवित आहेत आणि पोलिसांना मात्र कसलेच धागेदोरे सापडत नाहीत. याचा अर्थ काय? जादूटोणा विरोधी कायदा संमत व्हावा, यासाठी दाभोलकरांचा बळी गेला. तो कायदा संमत व्हावा यासाठी राज्यासह केंद्रातील बड्या नेत्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी महाराष्ट्राने खंबीरपणे उभे राहण्याची खरी गरज आहे. नागपूरात होणाèया हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर झाला तर तीच दाभोलकरांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल.
No comments:
Post a Comment