Friday, March 16, 2012

समता संघर्षाच्या पुन्हा पेटवा मशाली ...!

 पुण्याच्या अनुज बिडवे याची इंग्लंडमधील  मंचेस्तारमध्ये वंश विद्वेषातून हत्या झाल्यानंतर  प्रसारमाध्यमामध्ये  बातम्या येत आहेत . चर्चाही मोठ्या  प्रमाणात  झडत आहेत. ब्रिटीश सरकार आणि मंचेस्तर पोलीस वंश विद्वेषाचा  मुद्धा नजरेआड  करीत आहेत  काय ? न्याय  मिळण्यासाठी चोहोबाजूंनी चर्चा केली जात आहे . परंतु देशातील दलितांवरील विखारी जातीयवादातून होणाऱ्या अन्याय _अत्याचारांच्या  घटनाचे येथील राज्यकर्त्यांना , सिविल सोसायटीला आणि  प्रसारमाध्यमाना काहीच सोयरसुतक नाही. आज भारत स्वतंत्र होऊन ६४ वर्षे  उलटली . तरी जातीवाद , विषमता  संपताना दिसत नाही.  एकीकडे महासत्तेची स्वप्ने पाहतोय  तर दुसरीकडे जातीवाद इथल्या समाजव्यवस्थेला कॅन्सरसारखा  पोखरतोय . देशात दलित-आदिवासिवरील  अत्याचारात वाढ झाल्याची आकडेवारी  गतवर्षी  जून महिन्यात केंद्रीय सामाजिक न्याय  मंत्री मुकुल वासनिक यांनी जाहीर केलेली आहे . प्रामुख्याने महाराष्ट्रात  आणि त्यातही मराठवाड्यातील दलितांना जातीवादाचे चटके अधिक सहन करावे लागत आहेत . मराठवाडा विध्यापिठच्या  नामांतर  आंदोलनापुर्विपासुंच इथला मराठा  समाज  जातीयवादातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाही . हे वेळोवेळी  सिद्ध झालेले आहे . कुठ आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली जाते .तर कुठे दलीन्ताच्या स्मशानभूमीवर  अतिक्रमण करून त्यांना मेल्यावरही  अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव केला जातो . किरकोळ कारणावरून त्यांना जातीवाचक शिवीगाळ, मारहाण केली जाते .एवढेच नाही तर त्यांची हत्या केली जाते.येनकेन प्रकारे दलितांच्या विकासात अडथला आणला जातो . याची दाद फिर्यादही प्रशाशनात बसलेले जातीवादी लोक घेत नाहीत .महाराष्ट्राचे कर्तेधर्ते समजणाऱ्या राज्यकर्त्यांच्या नसणासातील जातीवादाचा प्रत्येय इथल्या दलित-आदिवासींना आलेला आहे. मनुस्म्र्तीच्या समर्थकांनी  इथल्या मराठा  समाजाच्या डोक्यात जातीवाद्ची केलेली पेरण  जाता जात नाही.हे परिवर्तनवादी, पुरोगामी मान्हुवून घेणाऱ्या तथाकथित विचारवंत आणि राज्याकार्त्यासामोरील  एक  मोठे आव्हान आहे. एका ताज्या घटनेमुळे मराठवाड्यातीलच नाही तर सबंध महाराष्ट्रातील दलिताच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ५ जानेवारी २०१२ रोजी  परभणी जिल्ह्यातील भोगाव साबळे येथील बौद्ध वस्तीवर मराठा समाजाने लाठ्या काठ्यानी हल्ला चढविला .दिसेल त्याला मारहाण केली. यात गर्भ्वातीनही सोडले नाही. दलिताचे घर जाळले , कारण काय  तर २१ डिसेंबर २०११ रोजी तेथील बौध्द समाज  बांधवानी इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या आंतरराष्ट्रीय  स्मारक साठी केंद्र सरकारने देण्याचे मान्य केल्याने गावात केलेला आंदोत्स्व .उपेक्षित बौद्धांनी गावात आंदोस्तोव साजरा केल्याने जातीयवाध्याना पोटसूळ  उठला .मराठा  समाजातील काही जातीयवाध्यानी बौद्ध समाजातील आनासाहेब पुंदगे आणि संजय कचरू पुंदगे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत जबर मारहाण केली होती. त्यामुळे येथील चार जातीयवाद्ध्याविरुद्ध atrosity  कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले होते .याचा राग मनात धरून  बौद्ध वस्तीतील समाज मंदिरासमोर माणिक साबळे ,अजित साबळे  या जातीवादी गावगुंडानी जातीवाचक शिवीगाळ करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचीत्राची विटम्बना केली.लहाडे यांच्या घरावर हल्ला केला .दलित समाजातील महिला -पुरुषांना जबर मारहाण केली. लहाडे यांच्या घराला आग लावली.यात त्यांचा संसार जाळून खाक केला .अनेकांचे संसार उघड्यावर पडले .गावातील वाहने बंद केली. ग्रामस्थांनी दलितावर बहिष्कार टाकला.गावातील दलित समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.या भयानक घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती चे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी गलांडे यांची भेट घेऊन भोगाव यथील पिडीत दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच जातीवादी आरोपींना अटक करावी यासाठी निवेदन दिले.या शियाय कुठल्याही स्थानिक लोकप्रतिनिधीला या घटनेची गांभीर्याने दाखल घ्यावीशी वाटली नाही प्रस्थापित प्रसारमाध्यामानी या घटनेला कवरेज दिले नाही .कसे  देणार ? तेथेही जातीवादी पिलावळ आहेच  न!मराठवाड्यातल्या खेड्या-पाड्यात जातीवादी कारवाया कोण करते आहे ? मनुस्मृतीच्या समर्थकांनी भूतकाळात दलितावर अतोनात अत्यचार केले .पण आज मनूचा प्रभाव असलेला मराठा समाज दलितावर अत्याचार करीत आहे. हे बुद्ध आणि  डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना मानतो असे म्हणणाऱ्या मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांना दिसत नाही का? त्यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय उपक्रम राबविले आहेत ? राबवीत आहेत ? महासत्तेची स्वपने  पाहणारे इथले तथाकथित राज्यकर्ते ,बुद्धीजीवी  विचारवंत इथला जातीवाद संपविण्यासाठी काय उपाय योजना करीत आहेत ? विषमतेच्या छातीवर समतेचे कलमीकरण करण्यासाठी ज्या क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवतोड प्रयत्न केले .त्यांचा वारसा कोण जतन करीत आहे? इथल्या गोरगरीब दिन-दलीतामध्ये सुरक्षेची भावना कशी आणि कधी निर्माण होईल ?असे एक न अनेक प्रश्न समाजाला भेडसावत आहेत .पण अशा परिस्थितीत समाजात समतेचा झेंडा रोवण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना आता पुन्हा समतेच्या संघर्षासाठी माश्ली पेटवाव्या  लागतील ...अन्यायाचा  प्रतिकार  लोकशाही मार्गाने करण्यासाठी मुठी आवलाव्या  लागतील ...इथल्या जातिवाद्यांना धडा शिकविण्यासाठी .

                                                                                                                       *      शिवाजी  कांबळे

No comments:

Post a Comment

Translate