Monday, November 28, 2016

किराणा दुकानेही ओस



लोकांना चलन उपलब्ध होण्याची प्रतीक्षा
 सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजारात चिल्लर मिळणे दुरापास्त झाले आहे. चलन तुटवड्याचा परिणाम किराणा व्यापारावरही जवळपास ५० टक्केंपर्यंत झाला आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू कशा खरेदी करायच्या? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीचा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया बाजारपेठेतील काही किराणा दुकानदारांनी व्यक्त केली आहे. मात्र या निर्णयाच धंद्यालाही फटका बसल्याचे सांगत आहेत.
हजार qकवा पाचशे रुपयांची नोट घेऊन किराणा दुकानात येणाèया ग्राहकांना पूर्ण रकमेचा माल खरेदी करावा लागेल, अशी अट काही किराणा व्यापाèयांकडून घालण्यात येत आहे. त्यामुळे किरकोळ किराणा खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्पच झाली आहे. किराणा धंद्यातही मंदी आली आहे. पैशांअभावी किराणा व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. किरकोळ किराणा दुकानदारांकडून ठोक व्यापारी हजार, पाचशे रुपयांच्या नोटा स्विकारीत नसल्याने किरकोळ व्यापाèयांनी देखील ग्राहकांकडून या अधिक किमतीच्या नोटा घेणे बंद केले आहे. त्यामुळे छोटे व्यापाèयांनी दुकानात माल आणणे बंद केले आहे.

चांगल्या निर्णयासाठी त्रास होणारच : अभिजित खंदाडे
 मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चांगला आहे. चांगल्या निर्णयासाठी अडचणी तर येणारच आहेत. सध्या मोठ्या नोटा बाजारपेठेत कोणीच स्वीकारीत नाहीत. आम्हीही नाही. आमच्या व्यवसायावर ३० च्या आसपास  परिणाम झाला आहे. ग्राहकाने पाठ फिरविली आहे, कारण त्यांच्याकडेही पैसे नाहीत. सगळीकडे चिल्लरचे वांदे आहे. असे मत औसा रोडवरील प्रीती किराणाचे मालक अभिजित खंदाडे यांनी व्यक्त केले.

चिल्लर असेल तरच माल : सुनील बोमणे
नोटाबंदीमुळे व्यावहारात चिल्लरची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या किराणा दुकानाच्या व्यापारावर ५० टक्के परिणाम झाला आहे. धंदा मंदावला आहे. चिल्लर असेल तरच आम्ही किराणा माल देत आहोत. आमच्याकडून मोठे व्यापारी  हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारीत नाहीत, त्यामुळे आम्ही त्या नोटा स्वीकारीत नाहीत. अशी प्रतिक्रिया बार्शी रोड, येथील शिव प्रोव्हीजनचे सुनील बोमणे यांनी व्यक्त केली.

ग्राहकांची संख्या रोडावली : तुकाराम कदम
पैसे बदलून घेण्यासाठी बँकेसमोर तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. शिवाय मोठ्या नोटा ठोक व्यापारीही घेईनासे झालेत. त्यामुळे हजार, पाचशेच्या नोटा घेणे बंद केले आहे. दोन हजार रुपयांच्या नोटेची चिल्लर शक्य नाही. त्यामुळे धंदा खूप कमी होत आहे. मात्र मोदी सरकारचा निर्णय काळा पैसेवाल्यांना आळा घालण्यासाठी चांगला आहे. अशी प्रतिक्रिया पाच नंबर चौकातील नृqसह प्रोव्हीजन आणि जनरल स्टोअर्सचे तुकाराम कदम यांनी दिली.

............................................



स्टील मार्केटमधील
उलाढाल थांबली : राजेंद्र खटोड
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम लातूरच्या स्टील मार्केटवरही झाला आहे. स्टील मार्केट जवळपास थंडच आहे. चलन तुटवड्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्टीलचा व्यवसायाचे बहुतांशी नुकसान झाले. मात्र सरकारचा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचा थांबविण्यासाठी चांगला आहे. लोकांना महिनाभर कळ सोसावी लागणार आहे. त्यानंतर नेहमीसारखे सुरूळीत व्यवहार होतील. अशी प्रतिक्रिया मार्केट यार्डातील प्रिन्स स्टीलचे ठोक विक्रेते राजेंद्र खटोड यांनी एकमतशी बोलताना दिली.

दागिण्यांसाठी धनादेशही
 स्वीकारतो : विश्वनाथ किनीकर
सध्या लग्नसराई सुरू झालेली आहे. अशातच नोटाबंदीचा निर्णय झाल्यामुळे लग्न समारंभ ज्यांच्या घरी आहे, त्यांची मोठी अडचण झाली आहे. ज्या लोकांना लग्नासाठी दागिणे अत्यावश्यक आहेत, अशा लोकांकडून आम्ही धनादेश आणि आरपीजीएसच्या माध्यमातून पेमेंट घेत आहोत. सराफा बाजारात चलनच उपलब्ध नसल्यामुळे बाजारपेठ थंडावली आहे. नवीन चलन हातात येईपर्यंत लोकांना त्रास सहन करावा तर लागणार हे निश्चित. सोन्या -चादींच्या व्यापारावर सुमारे ५० टक्के  परिणाम झाला आहे. अशी प्रतिक्रिया लातूरच्या सराफा पेठेतील सराफा व्यापारी विश्वनाथ किनीकर यांनी व्यक्त केली आहे.
...........................................................

नोटाबंदीने पान-सुपारीला ‘चुनाङ्क
टपरीधारक म्हणतात, उधार द्यावं लागतं
पान-सुपारी, सिगरेट, बिडी, पान मसाला, तंबाखू या गोष्टी आरोग्याला हानीकारक असल्या तरी दैनंदिन गरज बनलेल्या आहेत. अनेकांना या गोष्टी मिळाल्या नाही तर त्यांना अस्वस्थ  व्हायला लागते. बहुतांशी लोकांना लागलेल्या व्यसनामुळे शहरातील टपरीधारकांचा व्यवसाय चालतो. लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते. एका एका टपरीचा व्यवसाय  दिवसाकाठी ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंतचा होतो. मात्र पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबरला हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यापासून टपरीधारकांना गेल्या १३ दिवसांत मोठा आर्थिक फटका बसला आहे.
चिल्लर अभावी ग्राहकांनी टपरींकडे पाठ फिरविल्याचे चित्र लातूर शहरात दिसून येत आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारात कोणीच स्वीकारीत नाहीत. आणि नव्या नोटा बाजारात उपलब्ध नाहीत. दोन हजार रुपयांची नोट काही प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध झाली आहे. पण त्याचे चिल्लर कसे आणि कोण देणार, हा मोठा गहन प्रश्न व्यापारी आणि ग्राहकांसमोरही आहे. त्यामुळे अनेकवेळा टपरीवर आलेल्या ग्राहकांना उधारी पान, सुपारी द्यावी लागते qकवा ग्राहकांकडील नोट ठेवून घेऊन त्यातूनच त्या ग्राहकाला रोज पान-सुपारी दिली जाते. चिल्लरअभावी या व्यावसायाचेही वांदे झाले आहे. सरकारने लवकरात लवकर चलन उपलब्ध करून लोकांचा त्रास थांबविण्याची मागणी करण्यात येत आहे.

दोन हजाराची नोट कशी
स्वीकारणार ? : राम काळे
 सरकारने चलनातून बाद ठरविलेल्या नोटा घेणे तर आम्ही केव्हाच बंद केले आहे. सुरूवातीला लोक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन टपरीवर यायचे आणि १० रुपयांची सुपारी मागायचे. पण चिल्लरच नसल्याने पान, सुपारी ग्राहकांना देणे शक्य नाही. काही नियमित आणि ओळखीच्या ग्राहकांना उधार द्यावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत चिल्लर बाजारात आणि व्यवहारात उपलब्ध नसल्याने टपरीच्या व्यवसायात  बèयाच प्रमाणात नुकसान झाले आहे. बरेचजण २ हजाराची नोट घेऊन येतात, या नोटेचे करायचे काय, चिल्लर कुठून आणायची, हा मोठा प्रश्न ग्राहक आणि आमच्यासमोरचा आहे. अशी प्रतिक्रिया पीव्हीआर थिऐटर जवळील अभिजीत पान सेंटरचे राम काळे यांनी दिली आहे.

ग्राहक कमी झाले : किशोर सुरवसे
 जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्या. आम्हीही स्वीकारणे बंद केले. तरी देखील अनेकजण या नोटा घेऊन सुपारी खाण्यासाठी टपरीवर येतात.किंवा नवीन २ हजार रुपयांची नोट घेऊन येतात. त्यात काही ओळखीचे व नियमित ग्राहक असतात. मग त्यांना उधारी सुपारी, पान द्यावे लागते.  चलन पुढे जात नसल्यामुळे टपरीवरील ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. ज्या पीव्हीआर सिनेमा थिएटरसमोर आमची टपरी आहे, त्या थिएटरचा धंदा चलन तुटवड्याने ठप्प झाल्याने टपरीवर ग्राहक तुरळक येत आहेत. सरकारने लवकर चलनात कमी qकमतीच्या नव्या नोटा आणाव्यात आणि हेळसांड थांबवावी. असे मत पीव्हीआर सिनेमा थिएटरसमोरील न्यू स्वप्नलोक पान शॉपचे किशोर सुरवसे यांनी व्यक्त केले.

७५ टक्के टपरी मार्केट थंड : शेख इमामसाब
नोटाबंदीमुळे आमच्या टपरीवाल्यांचा धंदा ७५ टक्के थंड पडला आहे. याचं कारणे म्हणजे मार्केटमध्ये चिल्लरच नाही. दिवसभराचा धंदा २०० रुपये देखील होण्याची मारामार आहे.चिल्लर घेऊन येणाèया ग्राहकांची वाट पाहात बसावे लागते. अशी प्रतिक्रिया टाउन हॉल, मैदान, मेन रोडवरील टपरीचालक शेख इमामसाब यांनी दिली.

चिल्लरची समस्या कायम : संतोष मानकर
 हजार आणि पाचशे तर सोडाच इथे शंभर रुपयांचेही चिल्लर उपलब्ध नाही. ग्राहकांना कुठून चिल्लर द्यायची, ज्या ग्राहकांकडे चिल्लर आहे, तेच ग्राहक चहा पिण्यासाठी आमच्या हॉटेलात येत आहेत. त्यामुळे चहा पिण्याची इच्छा असूनही अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. खरे तर या चार महिन्यात लोक चहा जास्त पितात. मात्र नोटाबंदीनंतर गेल्या १३-१४ दिवसांपासून चहाचा धंदा थंड झाला आहे. ग्राहकअभावी हॉटेलवर बसून राहावे लागते. अशी प्रतिक्रिया  पाच नंबर चौकातील रेल्वे स्टेशन रोडवरील राधिका हॉटेलचे चालक संतोष मानकर यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Translate