Saturday, July 6, 2013

संगीत क्षेत्रातला ‘एकलव्य'


 जी माणसे विविध क्षेत्रात मोठी झाली. ज्यांनी स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले. ती बहुतांश माणसं मूळची खरी ग्रामीण भागातलीच. पण काही माणसं स्टार झाली की गावच्या मातीला विसरतात. तर काहींना त्यांची जाण असते.  सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव म्हणतात ना, मातीत जगावं, मातीत मरावं, बाळा, माती लई थोर तिला कसं विसरावं?     तसंच सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुक्यातील उपळा दुमाला या लहानशा गावचा लक्ष्मण अंकुश नाईकवाडी हा युवक आज संगीत क्षेत्रात आपल्या ‘ हर पल तेराही नशाङ्क, मनवारा, तुझ्याविना या आठ गाण्यांच्या तीन अल्बमने उजेडात आला आला आहे. खेड्या राहून शेतातली सर्व कामे करुन त्यानं संगीत क्षेत्रात भरारी घेतली आहे. मुंबई-पुण्याच्या मोठ मोठ्या संगीतकार आणि गीतकारांनी त्याची दखल घेतली आहे. ग्रामीण मातीशी नांत सांगणारा कवी, गीतकार आणि संगीतकार त्याच्या रुपाने उदयास येत आहे. तो संघर्ष करतो आहे, शिकतो आहे, जीवनात यशस्वी होण्यासाठी. म्हणून  कुणब्याची मुलं आता कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता लढायला शिकत आहेत. प्रतिकुल परिस्थितीत लक्ष्मणने बार्शीच्या शिवाजी कॉलेजात बारावी पर्यंतचे कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने सांगली येथे इंजिनिअरींगचे दोन वर्षे शिक्षण घेतलं पण ते अपुरेच राहीले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो आपले शिक्षण पूर्ण करु शकला नाही. पण मनाने न खचता त्याने गावाकडची कोरडवाहू दहा एकर शेती सांभाळली. शेतीत घाम गाळून आपल्या गीत-संगीताचा छंद जोपासू लागला. खेड्यात रेडिओशिवाय कोणतं साधन नव्हतं. तो रेडिओवर विविध गाणी ऐकायचा. यातूनच तो संगीताच्या प्रेमात पडला. तो स्वत: गाणी लिहितो, कंपोज करतो आणि गातोही. सुरुवातीला त्यानं लातूरच्या एका छोट्याशा स्टुडिओमध्ये ‘तुझ्याविना...ङ्क नावाचा गाण्याचा अल्बम रेकॉर्ड केला. तो २००५ मध्ये मुंबई आकाशवाणीवरुन प्रसारित झाला. तेव्हा लक्ष्मणला आकाश ठेंगणे झाले होते. त्यानंतर ‘ मनवाराङ्क हा  अल्बम २०११ मध्ये फाउंटेन म्युझिक कंपनीने प्रसारित केला. त्यापूर्वी २००८ -०९ मध्ये तयार केलेला ‘हर पल तेराही नशाङ्क हा हिंदी गाण्यांचा अल्बम तब्बल चार वर्षांनंतर रसिकांच्या सेवेत सादर झाला. हा अल्बम ऑनलाईन   प्रकाशित झाला आहे. या तिनही अल्बमची रॉयल्टी अजून त्याला मिळालेली नाही. पण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुझ्या प्रवासात...ङ्क हा आणखी एक गाण्यांचा अल्बम लवकरच येणार आहे. मात्र आयुष्यात एखाद्या आव्हानात्मक कामात कोणाच्या आधाराची गरज असते,पण कुणाचाही आधार नसल्याची खंत लक्ष्मणने व्यक्त केली. मात्र संगीतकार मिqलद इंगळे यांनी आपणास खूप मदत  केली, गाण्यांसाठी मार्गदर्शन केले. शिवाय निखिल विनय, लेस्ली या मान्यवरांनी आपणास खूप मदत केल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तरुणांनी मनापासून जे आवडते त्यामध्येच करिअर करावे, त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश हमखास मिळू शकते. अशी लक्ष्मणची धारणा आहे.
लक्ष्मण नाईकवाडी शेवटी म्हणतो...
 ‘सोबती होती खरी होती
 का तिला नाकारले मी
नेम का तेव्हा कुणाचा हात मी
शोधित होतो.ङ्क

                                                                        -शिवाजी कांबळे                                                                  
                                                                           ९०११३०८५८०

No comments:

Post a Comment

Translate