Saturday, June 1, 2013

राष्ट्रपती प्रणवदा मराठवाडा भेटीवर


..........................................
देशाचे राष्ट्रपती श्रीमान प्रणव मुखर्जी हे आज (शुक्रवार)लातूरात येत आहेत. शहरातील नामांकित दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला ते शनिवारी हजर राहणार असून राष्ट्रपती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मराठवाड्यात येत आहेत, त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तुत्वाची थोडक्यात ओळख करुन देणारा हा मागोवा...
.......................................................
लातूरचे भाग्यविधाते, लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील लातूरला आल्या होत्या. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी त्यांचे भव्य स्वागत केले होते. आता विलासराव साहेबांशिवायच्या लातूरात देशाचे विद्यमान राष्ट्रपती श्रीमान प्रणव मुखर्जी येत आहेत. साहेबांच्या गावात श्रीमान मुखर्जी यांच्या स्वागताचीही जंगी तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या या दौèयाला लातूरकरांची भावनिक किनारही जुळली गेलेली आहे. प्रणव मुखर्जी उर्र्फ प्रणवदा गतवर्षी जुलै महिन्यात देशाचे तेरावे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या फाशीच्या सर्व दया याचिका निकाली काढून देशाच्या या सर्वोच्च पदावरही त्यांनी आपल्या निर्णय क्षमतेची झलक दाखवून दिली.  पक्षीय राजकारणातही ते तेवढेच सक्रिय राहीले. त्यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात देशपातळीवरील महत्त्वाच्या जबाबदाèया  यशस्वीपणे पेलल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील मिराती या लहानशा गावात एका ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या श्रीमान प्रणवदांना लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू त्यांचे पिता qककर मुखर्जी यांच्याकडून मिळाले होते. त्यांचे पिता qककर मुखर्जी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक झुंजार स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीत बंड केल्याने त्यांनी दहा वर्षे तुरुंगवासही भोगला होता. शिवाय ते १९२० पासून कॉंग्रेस पक्षात सक्रिय झाल्यानंतर पश्चिम बंगाल विधान परिषदेचे तब्बल बारा वर्षे सदस्य होते. शिवाय वीरभूम जिल्ह्याचे कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्षही होते. त्यामुळे श्रीमान प्रणवदांची जडणघडण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपसुकच होत गेली. सूरी विद्यासागर महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. कोलकाता विद्यापीठात त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र पदव्युत्तर शिक्षणासोबतच कायद्याची पदवी प्राप्त केली.
 वकिल, प्राध्यापक, पत्रकार
ते वकिल आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी काहीकाळ सेवा केली. मातृभूमी की पुकार या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारिताही केलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांना साहित्यामध्येही रुची होती. बंगीय साहित्य परिषदचे विश्वस्त आणि अखिल भारतीय बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे. श्रीमान प्रणवदांनी १९८४ मध्ये बियॉंड सव्र्हायवल :  एमर्जिंग डायमेंशन ऑफ इंडियन इकॉनॉमी, १९८७ मध्ये ऑफ द टेक, १९९२ मध्ये सागा ऑफ स्ट्रगल अ‍ँड सॅक्रिफाइस आणि १९९२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरील चॅलेंजेस बिफोर द नेशन या ग्रंथांचे लेखन केले. साहित्यिक आणि लेखक म्हणूनही त्यांनी आपला ठसा या क्षेत्रात त्यांनी उमटवलेला आहे.
राजकीय वाटचाल
श्रीमान प्रणदांना काँग्रेस पक्षांतर्गत आणि सामाजिक  धोरणांमध्येही त्यांना सन्मान मिळाला आहे. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात पन्नास वर्षांपूर्वी १९६९ मध्ये काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य म्हणून झाली. ते १९७३ पर्यत पाचही वेळेस राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते औद्योगिक विकास खात्याचे केंद्रीय उपमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील झाले. १९८२-८४ दरम्यान कॅबिनेट पदावर होते आणि १९८४ मध्ये ते देशाचे अर्थमंत्री बनले. याचवर्षी जगातील सर्वात सक्षम आणि चांगल्या पाच अर्थमंत्र्यांमध्ये त्यांची गणना युरोमनी पत्रिकेने केलेल्या सव्र्हेक्षणात करण्यात आली. ते याच काळात पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. प्रणवदा अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहनqसग हे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र ते पक्षांतर्गत कलहामुळे मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकले नाही. काही काळासाठी त्यांना काँग्रे पक्षातून निष्काषित करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र १९८९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत समझोता झाल्याने त्यांनी आपल्या समाजवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. त्यामुळे प्रणवदांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन झाले. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरqसह राव यांच्या कार्यकाळात  नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बनले त्यानंतर ते पहिल्यांदा परराष्ट्रमंत्री झाले. १९९७ मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा बहुमान मिळाला. सन २००४ मध्ये जेव्हा काँग्रेसे संयुक्त पुरोगामी आघाडी निर्माण करुन सर्व समविचारी घटक पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवले. तेव्हा राज्यसभा सदस्य मनमोहनqसग हे पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून प्रणवदा पहिल्यांदा लोकसभा निवडणुक qजकले आणि त्यांना सभागृह नेता बनविण्यात आले. त्यांना संरक्षण, अर्थ, परराष्ट्र विषयक मंत्रालय, राजस्व, परिवहन, दूरसंचार, वाणिज्य आणि उद्योगासह विविध महत्त्वपूर्ण मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांना मान मिळालेला आहे. अत्यंत कार्यकुशलतेने त्यांनी या मंत्रालयांमध्ये त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली. काँग्रेस संसदीय समितीचेही त्यांनी नेतृत्व केलेले आहे. काँग्रेस मंत्रिमंडळाच्या कामकाजात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
आंतरराष्ट्रीय पदांवर कार्य
प्रणवदांनी विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्येही त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. ते बोर्ड ऑफ गव्हर्नसचे सदस्य होते. शिवाय आंतरराष्ट्रीय नाणे निधी, वल्र्ड बँक, एशियन विकास बँक, अफ्रिकन विकास बँकेचे सदस्य म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे.२४ आंतरराष्ट्रीय नाणे निधी मंत्रिमंडळ (आयएमएफ आणि वल्र्ड बँकेशी संबंधित) समूहाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. मे १९९५ आणि नोव्हेंबर १९८५ मध्ये ते सार्क परिषदेचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा त्यांना गाढा अभ्यास आहे.
पक्ष निष्ठावंत
 काँग्रेसमध्ये त्यांची प्रतिमा पक्ष निष्ठावंत वरिष्ठ नेत्यांची आहे. पक्षात त्यांना मोठे मानाचे स्थान आहे. मीडियातून त्यांना दांडगी स्मरणशक्ती असलेला आणि आपले आस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणारा राजकीय नेता म्हूणन संबोधले जाते. जेव्हा सोनिया गांधी यांना राजकारणात सक्रिय सहभागी होण्याची इच्छा नव्हती तेव्हा ज्या वरिष्ठांनी सोनिया गांधी यांना राजकारणात येण्यास राजी केले त्यापैकी  प्रणवदा हे एक आहेत. प्रणवदांची अमोघ निष्ठा आणि पात्रतेने त्यांना विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिेंग यांच्या निकट आणले. त्यामुळेच ते २००४ मध्ये देशाचे संरक्षण मंत्री बनले. २००५ मध्ये पेटंट सुधारणा विधेयकावरील समझोत्या दरम्यान त्यांच्या प्रतिभेचे दर्शन झाले. काँग्रेस हे महत्त्वपूर्ण विधेयक पारित करण्यासाठी कटिबद्ध होते. मात्र संपुआमधील घटक पक्ष असलेल्या डाव्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. तेव्हा संरक्षण मंत्री असताना प्रणवदांनी विरोधकांशी चर्चा करुन यावर तोडगा काढला आणि अखेर २३ मार्च २००५ ला हे विधेयक मंजुर करण्यात आले. कोणत्याही अडचणीतून पक्षाला बाहेर काढायचे, संकटावर मात करायचे कसब प्रणवदांकडे आहे. त्यामुळे त्यांचे काँग्रेस पक्षातील महत्त्व आणखीनच वाढले.
 निष्कलंक व्यक्तिमत्त्व
 श्रीमान प्रणवदांच्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांची प्रतिमा स्वच्छ, निष्कलंक अशी राहीली. १९९८ मध्ये ते परराष्ट्र मंत्री असताना रीडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत कॉंग्रेसवर होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर श्रीमान प्रणवदा म्हणाले होते की, भ्रष्टाचार एक मुद्दा आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात आम्ही भ्रष्टाचार निपटून काढण्याचे आश्वान दिले आहे. मात्र मी हे सांगताना माफ करा की, हे घोटाळे केवळ काँग्रेस सरकारपर्यंतच मर्यादित नाहीत. खूप घोटाळे आहेत, विविध राजकीय पक्षांचे अनेक नेत्यांचा त्यात सहभाग आहे. त्यामुळे हे म्हणणे सहज आहे की, काँग्रेस सरकार सुद्धा या घोटाळ्यांमध्ये सहभागी होती. घोटाळ्यांच्या शुक्लकाष्ठापासून प्रणवदा मात्र कोसो दूरच राहीले. राजकारणात चारित्र्यवान राहण्याचा आणि राजकारण कसे करु नये आणि कसे करावे याचा एक आदर्श पायंडा पाडला. राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या उमेदवारीला सवपक्षीयांनी पाठींबा दिला. हेच त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे यश आहे.
     देशाचे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून देशाची मान उंचावणारे मुत्सदीपणाने राजकारण करण्याचे प्रश्न असोत, प्रणवदांनी आपला ठसा भारतीय राजकारणावर उमटवून ठेवला आहे. सध्या देशाचे तेरावे राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळून आपल्या राजकीय जीवनातील यशोशिखर प्रणवदांनी गाठले आहे.

                                                                                         - शिवाजी कांबळे
                                                                                             ९०११३०८५८०
                                                                                          pub.dt. 31 may 2013

No comments:

Post a Comment

Translate