Tuesday, May 5, 2015

बिनबोभाट भ्रष्टाचार !



.....................................
वैद्यकीय आणि इतर व्यावसायकि शिक्षणासाठी भरमसाठ फी आणि डोनेशन घेऊन शिक्षणाचा बाजार मांडणा-या शिक्षण सम्राटांवर कायद्याचा अंकुश ठेवण्याचा, विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक हिताचे कायदेशीर रक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. या निर्णयामुळे खाजगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणा-या विद्याथ्र्यांची लूटमार करण्याची मक्तेदारी संपुष्टात येण्यास मदत होईल. पण हा नवा कायदा राज्यातील अभिमत(डीम्ड) विद्यापीठांना लागू होणार नाही. त्यामुळे १४२५ जागांसाठी या विद्यापीठांना भ्रष्टाचारासाठी रान मोकळे होईल. अभिमत विद्यापीठांना वेगळा न्याय का? या अभिमत विद्यापीठांमध्ये सरकारच्या नियंत्रणाखाली सामायीक प्रवेश परीक्षा (सीईटी) का घेतली जाऊ नये ? याबाबतचा सरकारने गंभीरपणे विचार करायला हवा.
.......................................................
गरीब, होतकरू विद्याथ्र्यांना वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण सुलभपणे आणि अल्पदरात मिळावे , या हेतूने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कारकिर्दीत विना अनुदानित उच्च शिक्षणाची सोय खाजगी क्षेत्रात उपलब्ध झाली. कालांतराने मात्र शिक्षण संस्थाचालकांनी हे उच्च शिक्षण धंदेवाईक करून टाकले. विनाअनुदानित तत्वाच्या उदार धोरणालाच सुरुंग लावण्याचे काम काही शिक्षण सम्राटांकडून होऊ लागले. विद्याथ्र्यांकडून लाखो रुपयांची फी उकळून आपल्या तुंबड्या भरता येतात, याच हेतून राज्यात अनेक शिक्षण संस्था झपाट्याने वाढू लागल्या. खाजगी उच्च शिक्षण क्षेत्रातही धंदेवाईकपणा आला. त्यामुळे उच्च शिक्षण महागडे झाले. गरीबांना उच्च शिक्षण नाकारणारी व्यवस्था निर्माण होऊ लागली. श्रीमंत वर्गाची मिरासदारी  या शिक्षण क्षेत्रात निर्माण होत आहे. भांडवलदारांना शिक्षणात नफेखोरी करण्याची संधी दिली गेल्यामुळेच बहुजन, गरीब आणि होतकरू विद्यार्थी वैद्यकीय qकवा तांत्रिक उच्च शिक्षणापासनू वंचित राहू लागले. आणि याचे सरकारला काही सोयरसूतक नाही.
 वैद्यकीय शिक्षणाचा तर पार पचका होऊन बसला आहे. खाजगी विनाअनुदानित आणि अभिमत(डीम्ड) विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी  विद्यार्थी, पालकांकडून लाखो रुपयांची लूट बिनबोभाट केली जात आहे. या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांवर सरकारचे कोणतीही बंधने नसल्यामुळे ते विद्याथ्र्यांकडून मनमानी फी उकळू लागले. वेगवेगळ्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा राजरोसपणे सुरू झाला. या शिक्षण संस्था स्वत:च्या सीईटी परीक्षा घेऊन कोट्यवधी रुपयांची लूट करू लागल्या. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तर ‘ बोला किती देता?ङ्क अशा पद्धतीने निव्वळ खोèयाने पैसा लुबाडण्याचे काम सुरू आहे. आज जे खाजगी  आणि अभिमत विद्यापीठे आहेत, ती सर्वसामान्य विद्याथ्र्यांना परवडणारी नसतील तर सरकार ही विद्यापीठे का चालवू देत आहे? हा आजचा कळीचा प्रश्न आहे. राज्यात आजमितीला एकूण ४३ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यात राज्य शासनाची १४, केंद्र शासनाची २ आणि महापालिकांची ४  आहेत. विनाअनुदानित तत्वावरील ११ तर अभिमत विद्यापीठाची १० वैद्यकीय महाविद्यालये आहेत.  या सर्व मिळून साधारणपणे एकूण ५,१९५ जागा आहेत. त्यापैकी अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा १४२५ इतक्या आहेत.
 गल्लाभरू शिक्षण सम्राटांना वेसन
वैद्यकीय आणि इतर व्यावसायकि शिक्षणासाठी भरमसाठ फी आणि डोनेशन घेऊन शिक्षणाचा बाजार मांडणाèया गल्लाभरू शिक्षण सम्राटांवर कायद्याचा अंकुश ठेवण्याचा, विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक हिताचे कायदेशीर रक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने २१ एप्रिल रोजी घेतला. या निर्णयामुळे खाजगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाèया विद्याथ्र्यांची लूटमार करण्याची मक्तेदारी संपण्यास मदत होईल. शिक्षण शुल्क आणि प्रवेश नियंत्रणाचा नवा कायदा आस्तिवात आल्यानंतर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सरकारच्या नियंत्रणाखाली सामायीक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) घेण्यात येणार आहे. शिवाय हा कायदा धाब्यावर बसविणाèया संस्थाचालकांना सहा ते दोन वर्षांपर्यतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद देखील या कायद्यात आहे.एवढेच नाही तर विद्याथ्र्यांकडून जास्तीची फी वसूली केल्याचे आढळल्यास  ती फी देखील परत करावी लागणार आहे. त्यामुळे धंदेवाईक शिक्षण सम्राटांना या कायद्याचा चांगलाच चाप बसणार आहे. जनसामान्यांची अपेक्षा एवढीच आहे की, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील बाजारू वृत्तीला काही प्रमाणात का असेना  या नव्या कायद्याने रोख बसेल. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे २००० विद्याथ्र्यांना सामायीक प्रवेश परीक्षा अर्थात एमच-सीईटी या वैद्यकीय संचालकांकडून घेतल्या जाणाèया गुणानुक्रमानुसार प्रवेश देण्यात येतात. आता पुढील वर्षांपासून खाजगी असोसिएट वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश देखील एमएच-सीईटी या परीक्षेतील गुणानुक्रमानुसारच देण्यात येतील. त्यामुळे राज्यातील शेकडो होतकरू आणि गुणवंत विद्याथ्र्यांना  याचा फायदा होणार आहे. साधारणपणे  या निर्णयामुळे खाजगी असोसिएट वैद्यकीय महाविद्यालयाच्या ६०० पैकी ५१० विद्याथ्र्यांना फायदा होईल.
‘अभिमतङ्क ला वेगळा न्याय का?
शुल्क व प्रवेश नियंत्रणाचा निर्णय घेताना  मात्र सरकारने एक ग्यानबाची मेख मारून ठेवली आहे. शुल्क व प्रवेश नियंत्रणाचा  हा नवा कायदा राज्यातील अभिमत आणि स्वायत्त विद्यापीठांना लागू होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या १४२५ जागांसाठी भ्रष्टाचाराचे रान मोकळे ठेवण्याची सोयीस्कर व्यवस्थाच जणू सरकारने करून ठेवलेली आहे, असेच म्हणावे लागेल.  महाराष्ट्रातील पुण्याचे भारती विद्यापीठ,  कोल्हापुरचे डी.वाय. पाटील, कराडचे कृष्णा, औरंगाबादचे  एमजीएम, लोणीचे प्रवरा अशा पाच अभिमत विद्यापीठाची दहा वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांतील वैद्यकीय शिक्षणक्रमाच्या १४२५ जागांवरील प्रवेश मात्र सामायीक प्रवेश परीक्षेतून घेतले जाणार नाहीत. हा निर्णय  अत्यंत खेदाचा आणि गरीब, होतकरू विद्याथ्र्यांवर अन्यायकारक असा आहे. सर्व खाजगी वैयक्तिक प्रवेशासाठी १५ टक्क्े व्यवस्थापन कोटा असतो, त्यासाठी डोनेशन घेतले जातेच. पण ८५ टक्के जागांसाठी देखील वार्षिक फी  सुमारे ५ लाख रुपये आकारली जाते. अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयांत ८५ टक्के प्रवेश एमएच-सीईटी गुणांनुसार दिल्यास फी भरून का असेना काही होतकरू विद्यार्थी प्रवेश मिळवू शकतील. त्यामुळे राज्यातील सरसगट वैद्यकीय  महाविद्यालयात एमएच-सीईटीच्या माध्यमातूनच प्रवेश द्यायला हवेत. गरीब, होतकरू विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा बळी देऊन सरकार कुणाचे हितसंबंध सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे? अभिमत विद्यापीठांना वेगळा न्याय का? या अभिमत विद्यापीठांमध्ये सरकारच्या नियंत्रणाखाली सामायीक प्रवेश परीक्षा (सीईटी) का घेतली जाऊ नये ? याचे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे.
या संदर्भात नांदेडचे श्री माणिकप्रभू शिक्षण आणि आरोग्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम तेलंगसह अन्य काही शिक्षण तज्ज्ञांनी देखील राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदने पाठविलेली आहेत.
अधिकारांचा गैरफायदा
विद्यापीठ अनुदान आयोग १९५६ च्या कलम ३ नुसार केंद्र सरकारने अभिमत विद्यापीठ म्हणून काही संस्था घोषित केल्या. त्यानंतर अनेक पुढाèयांनी अभिमत विद्यापीठाच्या नावाखाली राज्यात स्वत:ची संस्थाने उभी केली आणि त्यातूनच मनमानी कारभाराला सुरूवात झाली. या अभिमत विद्यापीठांना स्वत:चा अभ्यासक्रम ठरविण्याचा अधिकार, शिवाय प्रवेश प्रक्रिया, शुल्क तसेच विद्यार्थी आणि शिक्षण यांचे स्वतंत्र नियम तयार करण्याचे अधिकारही मिळतात. ज्या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात ही अभिमत विद्यापीठे येतात त्यांनाही यांच्या कारभारात हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे या विद्यापीठांत गैरप्रकार वाढू लागला.  भरमसाठ प्रवेश शुल्क, शिवाय  इतर देणग्या, चुकीची प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांच्या प्राथमिक अधिकारांची पायमल्ली यामुळे अशा विद्यापीठांचा दर्जा घसरत गेला आणि भ्रष्टाचार वाढत गेला. १५ टक्के खाजगी वैयक्तिक कोट्यामध्ये विद्यार्थी पालकांकडून लाखोंची लूट तर केली जातेच. पण ८५ टक्के जागांसाठीही निर्धारित फी पेक्षा मनमानी फी आकारली जाते. अभिमत विद्यापीठांनी गैरकारभार सुरू केल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने सरकारने पाच वर्षांपूर्वी पी.एन. टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती बनवून याची चौकशी केली. त्या समितीने  संबंधित सर्व विद्यापीठांना भेटी देऊन त्यांची तपासणी केली आणि विद्यापीठांच्या चुका, गैरव्यावहार सरकारसमोर मांडले. पण पुढे झाले काहीच नाही. अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बेकायदेशीर  आणि गुणवता डावलून केवळ पैशांच्या मोहापायी प्रवेशांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे?  सरकार या बाबत काहीच उत्तरदायी नाही का? असे अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून अनुत्तरीतच आहेत.
 बारावी विज्ञान शाखेतील उत्र्तीण होणाèया विद्याथ्र्यांना गुणानूक्रमे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याची पद्धत शासकीय पातळीवर राबविली जाते. आता उद्याच्या ७ मे रोजी सीईटीची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात राज्य सरकारने अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या ८५ टक्के प्रवेशाबाबत सरकारने सामायीक परीक्षा घेण्याचा विचार गंभीरपणे करायला हवा. शिवाय प्रवेश आणि शुल्क नियंत्रण कायदा अभिमत विद्यापीठांना लागू करण्याबाबतही विचार केल्यास महाराष्ट्रातील शेकडो होतकरू मुलांना वैद्यकीय अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध होऊ शकेल.

                                                                                                 - शिवाजी कांबळे
                                                                                                    ९०११३०८५८०

Saturday, January 3, 2015

Daily Ekmat pub.Dt. 26/12/2014


Wednesday, July 16, 2014

विठ्ठलपूजेचा अर्थपूर्ण वाद

समतावादी लोकराजे, बहुजनांचे कैवारी राजर्षि शाहू महाराजांचे १८९९ मध्ये वेदोक्त-पुराणोक्त प्रकरण गाजले होते. शाहू महाराजांच्या स्नानाच्या वेळी नारायण शास्त्री हे शूद्रांसाठीचे पुराणोक्त मंत्र म्हणत होते, ही बाब राजाराम शास्त्री भागवत यांनी उजेडात आणली होती. शाहू महाराजांच्या क्षत्रियत्वाला  आमच्या लेखी कवडीची qकमत नाही, असे नारायण शास्त्रींनी म्हटले होते. हा वाद महाराष्ट्रात अनेक वर्षे सुरू होता. या वादामुळेच शाहू महाराजांनी ब्राह्मणांचा वर्णश्रेष्ठत्ववादी संकल्प
धुडकावला. त्यामुळेच त्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाले. आता असाच एक वाद सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. तो म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पूजेवेळी म्हटले जाणारे पुरुषसुक्त मंत्र हे जातीयवादी, चातुर्वण्र्यव्यवस्थेचे समर्थन करणारे असून ते बदलावेत आणि त्याऐवजी संत तुकारामांचे मंगल चरण आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हटले जावे, अशी मागणी विठ्ठल-रुक्मिणी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष भारत पाटणकरांनी केली. खरे तर ही मागणी दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु आता पाटणकरांनी आपल्या या मागणीसाठी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनाच सरकारी महापूजा करू न देण्याचा इशारा दिला. त्यामुळे हा वाद पुन्हा पेटला आहे. काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठलाची बडव्यांच्या विळख्यातून सुटका झाली. त्यानंतर कोणत्याही जाती-धर्माचा पुजारी नेमण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि आता विठ्ठल पूजेच्यावेळी म्हटले जाणारे ऋग्वेदातील जातीयवादी मंत्र बदलण्याच्या मागणीने जोर धरला आहे. हा सगळा प्रकार म्हणजे क्रांतिकारी घडामोडी आहेत. परंतु भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी पाटणकरांचे मंत्रोच्चार बदलण्याचे मत खोडून काढत विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी म्हणल्या जाणा-या पुरुषसुक्तात जातिव्यवस्थेबाबत कोणतेही चुकीचे मंत्र नाहीत. या मंत्रांचा चुकीचा अर्थ लावत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. ऋग्वेदात हे पुरुषसुक्त असून यात सर्वशक्तिमान परमेश्वराचे वर्णन केले आहे. यातील एका मंत्रात ब्राह्मण वर्ण मुखातून, क्षत्रिय वर्ण बाजूंमधून, वैश्य मांडीतून आणि शूद्र वर्ण पायातून उगम पावल्याचे वर्णन असल्याचे उत्पात यांनी सांगितले आहे. मात्र याचा व्यापक अर्थ घ्यायला हवा, असेही ते म्हणतात. चातुर्वण्र्यव्यवस्थेचे समर्थक असलेल्या उत्पातांकडून पुरुषसुक्त मंत्रांचे समर्थनच होणार हे अपेक्षितच आहे. जे पुरुषसुक्त मंत्र विठ्ठलाच्या पूजेच्यावेळी म्हटले जातात, ते धडधडीत जातीयवादी व्यवस्थेचे समर्थन करणारे आहेत. कारण वर्णव्यवस्थेचे मूळ ऋग्वेदातील दहाव्या मंडलात येणाèया पुरुषसुक्तात आहे आणि त्याचाच विस्तार पुढे ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्मृतीत झाला आहे हे सर्वमान्य मत आहे. या पुरुषसुक्तातील ११ व्या आणि १२ व्या ऋचेत काय म्हटले आहे, तर देवांनी जेव्हा पुरुषाचे असे विभाजन केले ते त्याचे तुकडे करून काय? त्याचे मस्तक काय होते? त्याचे हात काय होते? त्याच्या मांड्यांचे आणि पायांचे काय झाले?  तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शूद्र हे त्याच्या पायापासून उत्पन्न झाले. या जातीयवादाचे उगमस्थान असलेल्या या पुरुषसुक्तातील बाराव्या ऋचेची खिल्ली उडवून क्रांतिबा महात्मा
फुले यांनीही  विरोध केला होता. शिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही या पुरुषसुक्ताचे शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथात विद्वत्तापूर्ण विश्लेषण केलेले आहे. त्यांनी या पुरुषसुक्ताबद्दल आपला आक्षेप नोंदविलेला आहे. मात्र आज जातीयवादी व्यवस्थेच्या समर्थकांना विठ्ठल पूजेच्या वेळी म्हटले जाणारे जातीयवादी मंत्र बदलण्याचा वाद निरर्थक वाटत आहे. कारण त्यांना सनातनी, जातीयवादी व्यवस्था टिकवून ठेवायची आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की, जे जे चुकीचे आहे, आक्षेपार्ह आहे, अन्यायी आहे ते बदलले पाहिजे. हजारो वर्षांपासून इथल्या बहुजनांच्या मेंदूवर चुकीचे आणि स्वहिताचे लादलेले तत्त्वज्ञान झिडकारणे हे क्रांतिकारी, पुरोगामीपणाचे लक्षण आहे.


                                                                                             पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर



वैदिकांचा ‘ प्रताप ‘

काही वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल भागातील एका पत्रकाराने एका नक्षलवाद्याची मुलाखत घेतली होती. त्यामुळे या पत्रकाराला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली होती. आता तर  मोस्ट वॉण्टेड कुख्यात अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हफिज सईद याची वेद प्रताप वैदिक या ज्येष्ठ पत्रकाराने पाकिस्तानात जाऊन लाहोरमध्ये मुलाखत घेतली.
एवढेच नाही तर तेथील डॉन न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मग याबाबत सरकार आपले हात वर करून कातडीबचाव धोरण का अवलंबित आहे?  हा प्रश्न कोणाही सर्वसामान्य
माणसाला पडू शकतो. या वैदिक-सईद भेटीवरून सोमवारी आणि मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गोंधळ झाला. कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारला वैदिक-सईद भेटीबाबतचे स्पष्टीकरण मागितले. वैदिक आणि हफिज सईद यांच्यात काय चर्चा झाली ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूत म्हणून वैदिक यांनी हफिजची भेट घेतली काय ? भारतीय दूतावासाने ही भेट घडवून आणली का ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला संसदेत धारेवर धरले.  याच दहशतवादाच्या मुद्यावरून याआधीच्या संपुआ सरकारवर त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने जोरदार हल्ले चढविले होते. आता फक्त बाजू बदलली आहे. काँग्रेसचे महासचिव दिग्विजयqसग यांनी वैदिक-सईद भेटीचा संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी जोडत वैदिक यांनी सईदसोबत कोणती चर्चा केली हे देशातील जनतेला कळलेच पाहिजे. शिवाय वैदिक यांना अटक करावी, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र वैदिक आणि सईद भेटीशी सरकारचा काडीमात्र संबंध नसल्याचे सरकारतर्फे दोन्ही सभागृहांत सांगण्यात आले. सभागृहाबाहेरही भाजपचे नेते, मंत्री वैदिक आणि सईद भेटीचा सरकारशी काही संबंध नसून वैदिक यांनी व्यक्तिगतरीत्या स्वतंत्र पत्रकार म्हणून त्यांची भेट घेतली आहे. पत्रकार म्हणून त्यांना कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे. भेट घेणे हा देशद्रोह नाही.  पण काश्मीरला स्वतंत्र करण्यास हरकत नाही, हे वैदिक यांचे विधान कोणी मान्य करणार नाही, अशा प्रतिक्रिया भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातून व्यक्त केल्या जात आहेत. परंतु पाकिस्तानातील ज्या ‘डॉनङ्क न्यूज चॅनलच्या पत्रकाराने वैदिक यांची मुलाखत घेतली त्या इफ्तिखार शिराजी यांनीच सांगितले की, भारतीय पत्रकार वैदिक जर व्यक्तिगतरीत्या सईदच्या
मुलाखतीसाठी आले असते तर येथील भारतीय दूतावासाने त्यांचे एवढे आदरातिथ्य कसे काय केले? शिवाय वैदिक यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेटही घेतली. तसेच ‘डॉनङ्क न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आहोत, लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपसाठी आपण कॅम्पेन केल्याचेही सांगितले. या सगळ्या बाबींवरून वैदिक हे मोदींचे दूत म्हणून सईद याच्या भेटीला गेले नसतील कशावरून? त्यामुळे केंद्र सरकारने याचे स्पष्टीकरण दिलेच पाहिजे.  काँग्रेससह शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपानेही वैदिक-सईद भेटीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया दिली असून वैदिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यक्ती असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच भारतीय दूतावासाला वैदिक-हाफिज सईदच्या भेटीबद्दल माहिती होती की त्यांनीच ही भेट घडवून आणली, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विषयावरून संसदेतही चांगलेच पडसाद उमटत आहेत. काहीही असले तरी वैदिक आणि हफिज सईद यांच्या भेटीचे गौडबंगाल काय हे उघड झाले पाहिजे. या प्रकरणाचे राजकीय रहस्य असेल तर तेही स्पष्ट झाले पाहिजे. कारण हा विषय देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा  आणि गंभीर असा आहे.

                                                                                          पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Sunday, March 9, 2014

नुसताच थाक्याला थुका



                                                                                                   पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

झ्याक सायेब झ्याक !


                 पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

माती झाली रंऽऽ माती !


Translate