फिल्समन कर्नल फिल्समन यांच्या नेतृत्वाखाली शिरूर ते कोरेगाव येथपर्यंत पायी चालत आले होते. पेशव्यांना धुळ कशी चारायची याचीही योजना करण्यात आली होती. ही लढाई डोंगरावर किंवा कोणत्या किल्ल्यावर होणार नव्हती तर ही लढाई समोरासमोर सपाट जमिनीवर होणार होती. ब्रिटिश सैनिकांची आणि पेशव्यांची भेटगाठ भिमाकोरेगाव येथे पडली. आणि येथून पुढे जे घडले त्याची कोणी कल्पनाही करणार नाही. पेशव्याच्या अफाट सैनिकांनी महारसैनिकांवर हल्ला चढविला त्यावेळी महारसैनिक बेसावध होते. पेशवे कोणत्याही क्षणी हल्ला करतील याची त्यांना कल्पना होतीच. महारसैनिकांनी अत्यंत चालाखीने पेशव्यांना घेरले. धाडसी शुर, वीर, महारसैनिक ही आपल्या जिवाची पर्वा न करता पेशव्यांच्या सैनिकावर तुटून पडली. तलवारीला तलवारी भिडल्या होत्या. सपासप एकदुसऱयावर वार होत होते. पेशव्यांचे मुडदे पडल्या जात होते. एकटा म्हणजे एक महारसैनिक 40 ते 50 पेशवे सेनिकाबरोबर लढत होते. आपल्या जिवाची पर्वा न करता महारसैनिक शत्रु वर तुटून पडले होते. छातीला छाती भिडवून, तलवारीला तलवार भिडवून, न घाबरता न डगमता, शत्रूवर वार करून त्यांना धरणीवर लोळवले जात होते. आणि घरादाराची बायकापोरांची पर्वा न करता ते शत्रुशी लढत होते. डर, भीती, म्हणजे काय हे महार सैनिकांना माहित नव्हते. बस शत्रूचा नायनाट कसा करायचा, हे त्यांना माहित होते. शेवटचा श्वास असे पर्यंत महारसैनिक लढत होते. जिकडे बघावे तिकडे पेशव्यांचे मुडदे पडलेले होते. कुणाचा हात, तर कुणाचे डोके कलम करण्यात आले होते. एवढ्यात ब्रिटीश सैनिकाने आपल्या कमांडरास माघार घेण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा या घटनेची कुणकुण महारसैनिकांना लागली तेवढ्यात एक महारसैनिक जोरात कडाडला , `साहब, डरो मत... और भागने की मत सोचो... ये महार सैनिक अपने जान की बाजी लगा देंगे' हे धाडसी शुरवीर महारसैनिकांचे विचार ऐकून ब्रिटीश अधिकाऱयांचा उत्साह अजुनच वाढला. महारसैनिक किती बलवान शक्तीशाली शुरवीर आणि धाडसी आहेत. हे ब्रिटीश सैन्यांनाही कळून चुकले होते. महारसैनिक आणि पेशव्यात तुंबळ युद्ध सुरूच होते. जवळपास महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण उडवली होती. अनेकांना धरणीवर लोळविले होते. ब्रिटीश सैनिक थोड्याफार पमाणात डगमगत होते. पण महारसैनिक मुळीच डगमगत नव्हते. उलट महारसैनिक कडाडले `साहेब आखरी गोली आखरी दुश्मन ' शेवट दुश्मनला शेवटच्या गोळीने आम्ही ठार करू.
महारसैनिक मरणाला कधीच घाबरत नाही. तलवार, चालाखबुद्धी आणि मनगटाच्या जोरावर लढाई चालूच ठेवली. तलवारीला तलवार भिडत असलेल्या आवाज सैनिकांच्या कानात गुंजत होता. घनघोर चाललेल्या लढाईत सैनिकांच्या अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. बरेच सैनिक रक्ताने माखले होते. या लढाईत पेशव्यांचा सरसेनापती बापू गोखले यांचा थोरला मुलगा बाबा लढाईत मारला गेला होता. त्यामुळे ही खबर बापू गोखल्यांच्या कानावर पडली त्यामुळे पेशवे सैनिक घाबरून विचलीत झाले होते. त्यांचे अवसान गळून पडले. बापू गोखलेंनी आपल्या मुलाचा देह मांडीवर ठेवला आणि तो मोठमोठ्याने हांबरडा फोडू लागला. सुर्य उगवले का असतांनाही त्याला अंधार वाटू लागला होता. त्यामुळे पेशव्यांचे उरले सुरले सैनिक घाबरून जिकडे रस्ता मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. पळण्यात आपली भलाई आहे नाही तर महारसैनिक आपल्याही ठार करतील. अशापद्धतीने पेशव्यांचा हजारो सैनिकांची महारसैनिकांनी दाणादाण उडवली तर काहींना पळती भूई थोडी करून टाकली. बापू गोखल्यांचा थोरला मुलगा या लढाईत मारला गेल्यामुळे बापू गोखल्यांची स्थिती नाजुक आणि भित्रत झाली होती.
ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी घडली. पेशव्यांनी केलेल्या जुलमांचा हा एकपकारे बदलाच होता. आधीच महार सैनिकांच्या उरात अन्याय आणि अत्याचाराची आग धगधगतच होती. कधीतरी ह्या आगीने अन्याय, अत्याचार करणाऱयांना धडा शिकवायचाच होता आणि तसेच घडले. या लढाईत जाबाज महारसैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून त्याग आणि बलिदान देऊन भिमा कोरेगावच्या युद्धात विजय मिळवून दिला. आम्हाला आणि बहुजन समाजाला सार्थ अभिमान राहिल.
शिवाजी कांबळे

No comments:
Post a Comment