Saturday, August 10, 2013

मराठीतील पहिला अ‍ॅनिमेशनपट ‘छत्रपती शिवाजी '



लातूरकरांची ऐतिहासिक कलाकृती
.............................................
 लातूरचे चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अझहर खान आणि त्यांच्या टीमने ‘छत्रपती शिवाजीङ्क हा मराठीतील पहिला ऐतिहासिक अ‍ॅनिमेशनपट तयार  केला असून नुकताच हा अ‍ॅनिमेशनपट महाराष्ट्रात सर्वत्र रुपेरी पडद्यावर झळकला आहे. मनोरंजनाबरोबरच बालप्रेक्षकांना छत्रपतींचा इतिहास कळावा, या हेतून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाला बालकांसह पालक, शिक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाबद्दल घेतलेला हा आढावा...
....................................................
 मराठवाडा मागासलेला आहे, म्हणून या भागाला नेहमी हिणविलं जातं. परंतु वेळोवेळी मराठवाड्याने राजकारण, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली गुणवता सिद्ध करून अटकेपार झेंडा फडकावला आहे. विकासाकडे वाटचाल करणारे लातूर शहर तर यामध्ये आघाडीवर आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख हे चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच  बीपी (बालक-पालक) या  चित्रपटाची निर्मिती केली, त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. त्यानंतर पेशाने शिक्षक असलेले लातूरचे अझहर खान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर ‘छत्रपती शिवाजी : द एम्परर ऑफ पीपल्स प्राईडङ्क हा अ‍ॅनिमेशनपट तयार करून सिनेजगतात एक वादळ निर्माण केले आहे. मराठीतील हा पहिलाच अ‍ॅनिमेशनपट ठरला आहे. गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रात केवळ पाच चित्रपट तयार झाले आहेत. ही खूप खर्चिक अशी बाब आहे. त्यामुळे अ‍ॅनिमेशनपट काढण्याचे धाडस सहसा कोणी करीत नाही. मात्र, लातूरकरांनी हे धाडस करून इतिहास घडविला आहे. अझहर खान हे लातूरमध्ये मॉरेल मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करतात. त्यांनी आपल्या अमन अनम प्रॉडक्शनद्वारे त्यांच्या संस्थेतील अ‍ॅनिमेशनचे शिक्षक आणि विद्याथ्र्यांच्या कौशल्याचे सहकार्य घेऊन या ऐतिहासिक अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती केली. अझहर खान यांनी छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास मांडला आहे. छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. एक आदर्श जाणता राजा म्हणून त्यांची ओळख भारत खंडात आहे. त्यांचा इतिहास आजपर्यंत कथा, कादंबèया आणि इतिहासाच्या पुस्तकातून मांडण्यात आला. काही बोटांवर मोजण्याइतपत चित्रपटही निघाले. मात्र, आतापर्यंत त्यांच्या चरित्रावर अ‍ॅनिमेशनपट कुणी तयार केला नव्हता. अ‍ॅनिमेशन qकवा कार्टून म्हटले की, लहान मुलांना लवकर आकर्षित करणारे माध्यम आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांची शौर्य कथा विद्याथ्र्यांसमोर मांडावी आणि मनोरंजनातून त्यांचे प्रबोधन व्हावे, कारण ज्यांना आपला इतिहास माहित असतो, तेच इतिहास घडवू शकतात, या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली असून, याचा निश्चितच विद्याथ्र्यांच्या जडणघडणीवर काहीअंशी चांगला परिणाम होईल, यात शंका नाही, असा विश्वास या अ‍ॅनिमेशनपटाचे निर्माते, दिग्दर्शक अजहर खान यांनी दैनिक एकमतशी बोलताना व्यक्त केला.
‘छत्रपती शिवाजीङ्क हा अ‍ॅनिमेशनपट बाल प्रेक्षकांसाठी जेवढा उद्बोधक आहे, तेवढाच मनोरंजक आणि वीररसाने परिपूर्ण असा चित्रपट आहे. मराठीसह qहदी, तामिळी, तेलुगू आणि इंग्रजी अशा पाच भाषांत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही खान यांचेच आहेत. त्यांना जगमोहन कपूर, कार्तिकेय तिवारी आनंदqसग आदी नामवंत तज्ज्ञांनी सहकार्य केले आहे. या चित्रपटाला राम गौतम व कार्तिकेय तिवारी यांनी अप्रतिम असे संगीत दिले आहे. चित्रपटात सहा गाणी असून सुप्रसिद्ध गायक कैलास खेर, अमेय दाते, संजीवनी, जावेद अली, साधना सरगम आणि मधुश्री यांनी गायिली आहेत. त्यांच्या या गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. या चित्रपटाची पूर्णपणे डिजीटल टेक्नॉलॉजी आहे. या अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग जर्मनीहून करून आणली आहे. अतिशय महागड्या तंत्रज्ञांनाचा वापर करून चित्रपट आकर्षक आणि प्रभावी तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी राज्यात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी शासनाने हा चित्रपट टॅक्स फ्री केला. त्यामुळे  या चित्रपटाने गेल्या आठवड्यात ९६ टक्के व्यवसाय मिळविला आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो, असेही खान यांनी सांगितले. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूरमध्ये पीव्हीआर आणि बिग सिनेमा या थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी झुंबड उडालेली दिसून येत आहे. पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न या प्रमुख शहरांतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 या चित्रपटाच्या निर्मितीचे मोठे आव्हान होते. तथापि, लातूरकरांवर अपार प्रेम करून सर्वांनाच प्रोत्साहन देणारे आमचे प्रेरणास्थान माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी प्रारंभी मदतीचा हात आणि प्रेरणा दिल्याने चार वर्षांच्या अथक परिश्रमातून हे कार्य पूर्ण केले. या ऐतिहासिक कार्यामागे साहेबांचीच खरी प्रेरणा आहे. त्यामुळे हा अ‍ॅनिमेशनपट त्यांनाच समर्पित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
   यात शिवरायांच्या जन्मापूर्वीचा काळ, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती, शिवरायांचा जन्म, बालपण ते शिवराज्याभिषेक असे प्रसंग घेतले असून, यामध्ये एकूण वेगवेगळे ५६ प्रसंग चितारले आहेत. यामध्ये सलग ११ लाख चित्र आहेत. चित्रपटातील रिमिक्सही खरोखरच अफलातून  आहे.
या चित्रपटाची कथा लिहिताना कोणताही वाद ओढवून घेतलेला नाही. शासनाला जो छत्रपती शिवरायांचा इतिहास मान्य आहे, तोच इतिहास चितारण्यात आला आहे. शिवरायांचे कृषी धोरण, सीमा सुरक्षा, समुद्रीतट असे विविध विषयही हाताळले आहेत. अ‍ॅनिमेशन हे बालमनोरंजनाचे उत्तम साधन असल्याने  आणि मुले शौर्यप्रिय असल्याने त्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास कळावा, हा या चित्रपटाचा हेतू असल्याचा पुनरुच्चार अझहर खान यांनी केला. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर द मॅन ऑफ सेंच्युरी या नावाने अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होईल. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा संकल्प असल्याचे निर्माता-दिग्दर्शक अजहर खान यांनी सांगितले.
बॉक्स..............
  या अ‍ॅनिमेशनपटाची वैशिष्टये
 *छत्रपती शिवाजी महाराजांवरील जगातला पहिला अ‍ॅनिमेशनपट.
* विद्याथ्र्यांनी विद्याथ्र्यांसाठी तयार करण्यात आलेला पहिलाच चित्रपट.
*लातूरसारख्या ग्रामीण भागातील शिक्षक, विद्याथ्र्यांची अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानामध्ये गरुडझेप.
*मराठीतील सर्वांत बिग बजेट चित्रपट.
*१३ चित्रपट चॅनलनी कव्हरस्टोरी बनविली.
*एकूण पाच भाषा मराठी, तेलुगू, इंग्रजी, तामिळ आणि qहदी भाषातून एकाचवेळी प्रदर्शित होणारा चित्रपट.
 लोकनेते विलासराव देशमुख यांना समर्पित !
छत्रपती शिवरायांप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख  साहेबांनीही महाराष्ट्रात एक आदर्श राज्य करून दाखविले. ‘छत्रपती शिवाजीङ्क या अ‍ॅनिमेशनपटाला साहेबांचीच खरी प्रेरणा आहे. साहेबांनीच प्रोत्साहन आणि मदतीचा हात दिला म्हणूनच या चित्रपटाचा प्रकल्प पूर्ण होऊ  शकला. साहेबांच्याच हस्ते या चित्रपटातील गाणी १९ फेब्रुवारी २०११ रोजी लॉन्चिग करण्यात आली. साहेबांच्याच संस्कारात वाढलो, मोठा झालो. वडिलांनी मला जन्म दिला आणि साहेबांनी मोठे केले. त्यामुळे हा अ‍ॅनिमेशनपट साहेबांनाच समर्पित केला आहे. शिवाय या चित्रपटासाठी आमदार अमित देशमुख आणि सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनीही वेळोवेळी हातभार लावला. त्यांचेही आभार मानतो, असे निर्माता-दिग्दर्शक अझहर खान यांनी भावूकपणे सांगितले.
लातूरकरांची भरारी सातासमुद्रापार...
शिवरायांवरील अ‍ॅनिमेशनपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्येही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या माध्यमातून लातूरकरांनी सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. त्यातच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर द मॅन ऑफ सेंच्युरी या नावाने अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होईल. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा संकल्प असल्याचेही निर्माता-दिग्दर्शक अजहर खान यांनी सांगितले. या माध्यमातूनही ते मोठी झेप घेऊ शकतात.
रितेश देशमुख यांच्या हस्ते प्रोमोचा शुभारंभ
६ जानेवारी २०१३ रोजी मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजीङ्क या अ‍ॅनिमेशनपटाचा प्रोमो सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी रितेश देशमुख यांनी लातूरचे दिग्दर्शक, निर्मात्यासह सर्व कलावंताचे कौतुक करून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. निर्माता अझहर खान व त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांचे आभार मानले.
अ‍ॅनिमेशनची ‘एबीसीडीङ्क माहित नसलेला दिग्दर्शक
‘छत्रपती शिवाजीङ्क या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे अझहर खान हे जरी महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ  फॅशन अ‍ॅण्ड इंटेरिअर आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य असले तरी त्यांना चार वर्षांपूर्वी अ‍ॅनिमेशनची साधी एबीसीडी सुद्धा माहित नव्हती. परंतु त्यांनी आपल्या महाविद्यालयातील अ‍ॅनिमेशनच्या शिक्षकांकडून ते कौशल्य अवगत करून घेतले. आपण तज्ज्ञ नसलो तर त्याबाबत जाणकार मात्र आहोत, असे ते सांगतात.
चित्रपटाची रेंडरिंग जर्मनीत
 या अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग ही जर्मनीतून करून आणली आहे. कारण अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग म्हणजे जे चित्र असतात, त्यांना उत्कृष्टरित्या पॉलिश करण्याचे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान भारतात केवळ मुंबईत आणि त्यानंतर स्वित्झर्र्लंंड आणि जर्मनीत उपलब्ध आहे. आपल्या देशात ही प्रक्रिया खूप महाग असल्याने चित्रपटाची रेंडरिंग जर्मनीतून करण्यात आली आहे.
अशी सूचली चित्रपट कथा
 अझहर खान यांच्या शिक्षण संस्थेतील अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाèया शिक्षकांनी घोडे आणि हत्तीचे जिवंत चित्र संगणकाच्या स्क्रीनवर तयार केले आणि या चित्रातूनच अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याची प्रेरणा घेऊन लातूरकर असलेल्या निर्माता, दिग्दर्शक अजहर खान यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा निश्चय केला आणि चार वर्षांत त्यांनी हा आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण करून अ‍ॅनिमेशनपटातून शिवरायांचे चरित्र मांडले.
                     
                                                      -  संपादन : शिवाजी कांबळे,मोबा ९०११३०८५८०

माक्र्स आणि आंबेडकरवादाचे ‘फ्युजन'


..............................................................
 लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या उभ्या आयुष्यात जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा यांच्या सीमा तोडून दीन-दलितांसाठी त्यांनी आपली लेखणी झिजविली. दलित, पीडित, शोषित, बहिष्कृत, तिरस्कृत, कष्टकरी बहुजन समाजाच्या गुलामीचे, बंडाचे, जगण्याचे चित्रण अफलातून निर्माण केले. आज त्यांची जयंती. त्यांची जयंती कर्मकांड ठरू नये म्हणून त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच अण्णा भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल.
..........................................................
लोकशाहीर, साहित्यरत्न क्रांतिवीर  तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक लोकशाहीर, कथा-कादंबरीकार म्हणून परिचित असले तरी ते क्रांतिकारी विचारवंत, राष्ट्रनिर्माते होते.  मानवमुक्तीच्या लढ्यासाठी समाजपरिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाèया अण्णा भाऊंची मात्र जिवंतपणी आणि निर्वाणानंतरही उपेक्षा झाली असली तरी त्यांच्या विचारांची धग आजही समाजमनात कायम आहे पण आज आम्ही महापुरुषांची वाटणी करून घेतली असून त्यांच्या नावाखाली निरर्थक वाद निर्माण करून चळवळीचे तीनतेरा करीत आहोत. एकमेकांपासून दूर जात आहोत. तो मांग आहे, तो महार आहे, मातंग समाजातील अण्णा भाऊंचे समर्थक म्हणवून घेणारे आंबेकरवाद्यांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात तर काही आंबेडकरवादी मातंगांना हीन लेखतात. एवढेच नाही तर बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांमध्येही काही अंशी अशीच स्थिती आहे. त्यामुळेच परिवर्तनवादी बहुजनांच्या चळवळींची वाताहत झाली. आताशा तर पावसाळ्यातल्या छत्र्याप्रमाणे चळवळ गटा-गटांत विखुरलेली दिसून येत आहे.  काही ना-लायक नेत्यांनी जाती-पोटजातीचे सुरू केलेले राजकारण, समाजकारणच त्याला कारणीभूत आहे. तथागत गौतम बुद्ध, समतावादी लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची गुंफण एक आहे हे अद्यापही समाजमनात रुजलेच नाही.
      या थोर महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसवून त्यांना संकुचित करणे  हे वैचारिक दारिद््रय नाही तर काय? व्यक्तिपूजक बनण्यापेक्षा या महापुरुषांचे विचार आचरणात आणणे ही खरी काळाची गरज आहे. अण्णा भाऊ कम्युनिस्ट होते की आंबेडकरवादी होते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र चर्चा करणाèयांनी कितीही चर्चा केली तर ती निरर्थकच ठरेल यात शंका नाही. कारण अण्णा भाऊ माक्र्स आणि आंबेडकरवादाचे एक रसायन होते  हेच  चर्चेअंती स्पष्ट होईल.परवा नामवंत आंबेडकरी विचारवंत आणि नाटककार दत्ता भगत यांनी एका वृत्तपत्रातील लेखात आपणास माक्र्सबद्दल अपार आदर असल्याचे नमूद करीत माक्र्सवादाला विरोध करणाèया पोथीनिष्ठ आंबेडकरवाद्यांचा समाचार घेतला. भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीविरोधात माक्र्सचे विचार होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यांसमोर भारतातल्या जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीचे स्वरूप होते. अण्णा भाऊ  कम्युनिस्ट होतेच पण ते आंबेडकरवादी होते हे त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने जाणवते. कारण देशाच्या अधोगतीस जात हीच संकल्पना कारणीभूत आहे. जातीच्या गुलामगिरीतून बाहेर पडल्याखेरीज सामान्य लोकांची प्रगती होणार नाही.
    अण्णा भाऊंनी या जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला. जात, वर्ण, भेद यांच्या सीमा त्यांनी नाकारल्या.  अण्णा भाऊंनी शाहिरी, कथा-कादंबरी, तमाशाला  प्रतिष्ठा मिळवून दिली. याच कलांच्या माध्यमातून त्यांनी कष्टकरी जनतेत अन्याय-
अत्याचारांविरुद्ध जागृती आणली. सामाजिक न्यायासाठी ते आयुष्यभर झगडले. आपल्या साहित्यातून सत्याला महत्त्व दिले. अण्णा भाऊंनी क्रांतिqसह नाना पाटील यांचे रेठरे (बु.) च्या जत्रेतील तमाशाच्या फडात भाषण ऐकले. तेव्हा अण्णा भाऊ हे त्यांचे मावसभाऊ बापू साठे यांच्या तमाशा फडात काम करीत होते. तेव्हापासून अण्णा भाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा मिळाली. अण्णा भाऊंचे कुटुंब सांगलीहून मुंबईला आले आणि अण्णा भाऊ कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले. या काळात त्यांची वैचारिक जडणघडण झाली.  तद्नंतर ‘चले जावङ्क चळवळीत ते सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध वॉरंट निघाले आणि  अण्णा भाऊंना कायमचे घर सोडावे लागले. त्यानंतर अण्णांनी मुंबई गाठली आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. पक्षाच्या प्रचारासाठी १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटाङ्क  कलापथकाची स्थापना केली. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर होते. अण्णांचे लिखाण  मात्र अखंडपणे सुरूच होते. दरम्यानच्या काळात ते रशियाचा दौराही करून आले. अण्णा भाऊंचा लढा सर्वांना माहीत असलाच पाहिजे आणि हे गृहीतच आहे. अण्णा भाऊंची जयंती कर्मकांड ठरू नये. अण्णा भाऊंची समतावादी, मानवतावादी चळवळ पुढे नेण्यासाठी आपणांस अण्णा भाऊ थांबले त्यापुढचे पाऊल टाकायचे आहे. हा दृढ निर्धार अण्णा भाऊ आणि बाबासाहेबांच्या समर्थकांनी करण्याची खरी वेळ आहे. अण्णा भाऊ  साठे यांच्या जयंती- निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन !!!
             
                                                                                          -शिवाजी कांबळे
                                                                                                 ९०११३०८५८०

Tuesday, July 16, 2013

दहावीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात चुकांची सेन्चुरी !


                                              शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराचा कळस
                                                                 शिवाजी कांबळे
लातूर :  राज्य शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिर्मित शालेय अभ्यासक्रमांच्या अनेक पुस्तकातील गंभीर चुका यावर्षी चव्हाट्यावर आल्या आहेत. आता दहावी वर्गाच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील इंग्रजी तृतीय भाषेच्या पाठ्यपुस्तकात शेकडो गंभीर चुका आढळून आल्या असून याचा थेट परिणाम विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक दर्जावर होत आहे.
त्यामुळे अशा चुकांना जबाबदार असणाèया दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे. 
    गेल्या काही दिवसांत पाठ्यपुस्तकांमधील काही चुकांवरून वादळ उठले आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाला इतिहास, भूगोलची मंडळे बरखास्त करावी लागली. नवव्या वर्गाच्या qहदीच्या पुस्तकातही अक्षम्य चुका समोर आल्या. आता २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून दहावी वर्गाच्या अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या  'English Reader A Coursebook in English (Standard X) ' या पाठ्यपुस्तकात १०१ चुका आढळून आल्या आहेत. शिक्षण मंडळातील तज्ज्ञ लेखक, शिक्षकांकडून छाननी, पुनर्विलोकन करून हे पुस्तक निर्दोष झाल्याचा दावा पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात या पुस्तकात गंभीर चुकांचा समावेश आहे.  अगदी ऋणनिर्देशात पृष्ठ क्र. ४ पासून ते शेवटचे पृष्ठ क्र. २०६ पर्यंत शब्दांचे स्पेलिंग (वर्णरचना), विरामचिन्हे, शब्दकोडे, पुनरावृत्ती, व्याकरण व अस्थानी छपाईत विविध प्रकारच्या शंभरावर चुका आहेत. प्रामुख्याने पृष्ठ क्र.४ वर Acknowledgement  मधील तिस-या परिच्छेदातील शेवटच्या ओळीतीर्ल  subsequent या शब्दातील"b' हे अक्षर गायब आहे. पृष्ठ क्र. १० वरApproach , Method and Techniques या शीर्षकाखालील सहाव्या ओळीच्या परिच्छेदात एकूण चार चुका आहेत. त्यात Maharashtra State या दोन शब्दांमध्ये ऑब्लिक (/) या चिन्हाची गरज नसताना टाकण्यात आले आहे. नियमानुसार साधा वर्तमानकाळाच्या वाक्यातील कर्ता एकवचनी व तृतीयपुरुषी असेल तरच त्यापुढे येणा-या  मुख्य क्रियापदास  "s ' प्रत्यय लागतो. मात्र येथे Underscores  असे छापण्यात आले आहे. पान क्र. ९ वर Approach , Method  या शीर्षकाखालील सहाव्या ओळीत practise  ऐवजी practice असे चुकीचे स्पेqलग छापले आहे. पान क्र. ५ वरA 8 Part II Q. 1 मध्ये  Result ऐवजी Reason असा चुकीचा शब्द छापण्यात आला आहे. पान क्र. १४ वरही अशीच चुक आहे.Traveller  ऐवजी  Traveler  अशी स्पेqलगमध्ये चुक आहे. पान क्र. ३० वर chidiya ऐवजी chidya, पान क्र. ३३ वर made  ऐवजी mad असे छापले आहे. अशा अनेक प्रकारच्या चुका या पुस्तकात आहेत. या चुकांच्या गोंधळामुळे विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक दर्जावर विपरित परिणाम होत असून शिक्षण खात्याने तात्काळ या चुकांची दखल घेऊन चुकांसाठी दोषींवर कारवाई करावी आणि  दुरुस्तीची उपाययोजना करावी किंवा पुस्तक बदलून द्यावे, अशी मागणी सुजाण पालक व शिक्षणप्रेमी जनतेतून केली जात आहे. 
बॉक्स..............
माजी गटशिक्षणाधिका-यांनी केली चुकांची यादी
३५ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापनाचे कार्य करून सेवानिवृत्त झालेले आणि देवणीचे माजी गटशिक्षणाधिकारी माणिक वाघमारे यांनी या दहावीच्या इंग्रजी पुस्तकातील चुका शोधून काढल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांनी १०१ चुकांची यादीच तयार केली असून अपेक्षित दुरुस्त्याही सूचविल्या आहेत. ‘माझ्या ३५ वर्षांच्या इंग्रजी अध्यापन कारकिर्दीत कोणत्याच क्रमिक पुस्तकात एवढ्या चुका आढळून आलेल्या नाहीत.ङ्क असे त्यांनी म्हटले आहे.  

Saturday, July 6, 2013

मस्ती, मजा आणि धमाल म्हणजे ‘फेकमफाक' : भरत जाधव



......................................
 एमईएफएसी प्रॉडक्शन्स निर्मिती संस्थेचा पहिलाच चित्रपट ‘फेकमफाक' हा १२ जुलैला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार  अभिनेता भरत जाधव हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्या निमित्ताने दै. एकमतशी त्याने या चित्रपटाबद्दल आणि इतरही विषयावर  दूरध्वनीवरुन मनमोकळ्या गप्पा मारल्या.   ‘फेकमफाकङ्क चित्रपट हा मस्ती, मजा आणि धमाल करणाèया थापाड्याची एक कहाणी असून ती लोकांनी आवर्जून पाहावी आणि आनंद घ्यावा, असे त्याने आवर्जून सांगितले.
......................................................................
प्रश्न : ‘फेकमफाकङ्क चित्रपटाबद्दल सांगा,  आपण या चित्रपटात कोणती भूमिका साकारली आहे?
 - दयानंद राजन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मी, ऋचिता जाधव, विजय चव्हाण, विजू खोटे आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात आहेत. सस्पेन्स कॉमेडी थ्रिलर असा चित्रपट असून   माझी भूमिका गोपीनाथ देसाई नामक मस्ती, मजा आणि धमाल करणाèया हाका मारत वस्तू विक्रेत्याची आहे. तो सतत थापा मारत असतो, त्यातून लोकांचे मनोरंजन करतो. पुढे त्याची एक थाप खरी ठरते आणि त्यातून सस्पेन्स थ्रिलर निर्माण होते. तेथूनच चित्रपट नवे वळण घेतो.
प्रश्न : या चित्रपटात तुमच्या कॅरेक्टरमध्ये
 नेहमीपेक्षा काही वेगळेपण आहे ?
- वेगळेपण आहे म्हणून चित्रपट बघायला लोक येत नाहीत. निखळ मनोरंजन हाच त्याचा उद्देश असतो. माझ्या भूमिकेत गरजेप्रमाणे वेगळेपण असतेच. भूमिकेशी समरसता महत्त्वाची आहे.
प्रश्न : कोणत्या वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट खेचून आणेल असे तुम्हाला वाटते ?
-  सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी एकत्र बसून बघायला हरकत नाही. शहरात फिरुन हाका मारीत विविध वस्तू विक्री करणारे हा चित्रपट एॅन्जॉय करतील.
प्रश्न : कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला तुम्हाल आवडतात ?  
- सगळ्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतात.
प्रश्न : हिन्दी चित्रपटात काम करण्याचा विचार केला नाही का?
- थोड्याच दिवसांत न्यूज कळेल. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.
प्रश्न :  मराठी चित्रपटाचा चेह
रा बदलला आहे काय?  काय वाटते?
- निश्चितच ! प्रेक्षक मराठी मराठी चित्रपटाची दखल घेत आहेत. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. मराठी चित्रपट जगभर पोहचत आहेत. तुम्हाला काय वाटते, तेच माझेही मत आहे.
प्रश्न : ‘कुणी घर देता का घरङ्क नंतर ‘फेकमफाक' बद्दल   काय अपेक्षा आहेत?
-  कुठलाही चित्रपट चालला पाहिजे.लोकांनी हा चित्रपट पाहावा, अशीच अपेक्षा आहे. हा चित्रपटातील विनोदी पात्रांमुळे प्रेक्षक खळखळून हसतील.शिवाय रहस्य आणि थ्रिलरमुळे त्यांना धक्के ही बसतील. या चित्रपटात चार गाणी असून सध्या गाजत असलेले अ‍ॅटम साँग वैशाली सामंतने गायिले आहे. तर अन्य गाणी साधना सरगम आणि शान यांनी गायिली आहेत. तर भरत बलवली हे उमदे संगीतकार आहेत.

                                                                       -  शिवाजी कांबळे                                                              
       ९०११३०८५८०

संगीत क्षेत्रातला ‘एकलव्य'


 जी माणसे विविध क्षेत्रात मोठी झाली. ज्यांनी स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले. ती बहुतांश माणसं मूळची खरी ग्रामीण भागातलीच. पण काही माणसं स्टार झाली की गावच्या मातीला विसरतात. तर काहींना त्यांची जाण असते.  सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव म्हणतात ना, मातीत जगावं, मातीत मरावं, बाळा, माती लई थोर तिला कसं विसरावं?     तसंच सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुक्यातील उपळा दुमाला या लहानशा गावचा लक्ष्मण अंकुश नाईकवाडी हा युवक आज संगीत क्षेत्रात आपल्या ‘ हर पल तेराही नशाङ्क, मनवारा, तुझ्याविना या आठ गाण्यांच्या तीन अल्बमने उजेडात आला आला आहे. खेड्या राहून शेतातली सर्व कामे करुन त्यानं संगीत क्षेत्रात भरारी घेतली आहे. मुंबई-पुण्याच्या मोठ मोठ्या संगीतकार आणि गीतकारांनी त्याची दखल घेतली आहे. ग्रामीण मातीशी नांत सांगणारा कवी, गीतकार आणि संगीतकार त्याच्या रुपाने उदयास येत आहे. तो संघर्ष करतो आहे, शिकतो आहे, जीवनात यशस्वी होण्यासाठी. म्हणून  कुणब्याची मुलं आता कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता लढायला शिकत आहेत. प्रतिकुल परिस्थितीत लक्ष्मणने बार्शीच्या शिवाजी कॉलेजात बारावी पर्यंतचे कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने सांगली येथे इंजिनिअरींगचे दोन वर्षे शिक्षण घेतलं पण ते अपुरेच राहीले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो आपले शिक्षण पूर्ण करु शकला नाही. पण मनाने न खचता त्याने गावाकडची कोरडवाहू दहा एकर शेती सांभाळली. शेतीत घाम गाळून आपल्या गीत-संगीताचा छंद जोपासू लागला. खेड्यात रेडिओशिवाय कोणतं साधन नव्हतं. तो रेडिओवर विविध गाणी ऐकायचा. यातूनच तो संगीताच्या प्रेमात पडला. तो स्वत: गाणी लिहितो, कंपोज करतो आणि गातोही. सुरुवातीला त्यानं लातूरच्या एका छोट्याशा स्टुडिओमध्ये ‘तुझ्याविना...ङ्क नावाचा गाण्याचा अल्बम रेकॉर्ड केला. तो २००५ मध्ये मुंबई आकाशवाणीवरुन प्रसारित झाला. तेव्हा लक्ष्मणला आकाश ठेंगणे झाले होते. त्यानंतर ‘ मनवाराङ्क हा  अल्बम २०११ मध्ये फाउंटेन म्युझिक कंपनीने प्रसारित केला. त्यापूर्वी २००८ -०९ मध्ये तयार केलेला ‘हर पल तेराही नशाङ्क हा हिंदी गाण्यांचा अल्बम तब्बल चार वर्षांनंतर रसिकांच्या सेवेत सादर झाला. हा अल्बम ऑनलाईन   प्रकाशित झाला आहे. या तिनही अल्बमची रॉयल्टी अजून त्याला मिळालेली नाही. पण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुझ्या प्रवासात...ङ्क हा आणखी एक गाण्यांचा अल्बम लवकरच येणार आहे. मात्र आयुष्यात एखाद्या आव्हानात्मक कामात कोणाच्या आधाराची गरज असते,पण कुणाचाही आधार नसल्याची खंत लक्ष्मणने व्यक्त केली. मात्र संगीतकार मिqलद इंगळे यांनी आपणास खूप मदत  केली, गाण्यांसाठी मार्गदर्शन केले. शिवाय निखिल विनय, लेस्ली या मान्यवरांनी आपणास खूप मदत केल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तरुणांनी मनापासून जे आवडते त्यामध्येच करिअर करावे, त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश हमखास मिळू शकते. अशी लक्ष्मणची धारणा आहे.
लक्ष्मण नाईकवाडी शेवटी म्हणतो...
 ‘सोबती होती खरी होती
 का तिला नाकारले मी
नेम का तेव्हा कुणाचा हात मी
शोधित होतो.ङ्क

                                                                        -शिवाजी कांबळे                                                                  
                                                                           ९०११३०८५८०

Saturday, June 8, 2013

‘ नालंदा ' चे पुनरुज्जीवन !


........................................................
इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत ज्ञानदान आणि ज्ञाननिर्मितीचे कार्य करीत असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जगातील पहिले आणि सर्वात मोठे ‘नालंदाङ्क विद्यापीठ  परत उजेडात येत आहे. कारण या ऐतिहासिक विद्याठाची पुनस्र्थापना हा तमाम पूर्व अशियायी देशांच्या चर्चेचा विषय बनला आहे. भारतातील गतकाळातील ज्ञानवैभवाला नवजीवन मिळावे, या हेतूने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी परराष्ट्र मंत्री तथा विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची नालंदा विद्यापीठाच्या पुनस्र्थापनेची कल्पना मूर्त रुप घेत आहे.नोबेल पारितोषिक विजेते अर्मत्य सेन आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली या विद्यापीठाला नवाजन्म देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे केवळ ग्रंथ जाळल्याने ज्ञानाचे पलिते कायमचे विझत नाहीत, हा संदेश नवे नालंदा अनेक शतके जगाला देत राहील...
..................................................
भारताची शैक्षणिक परंपरा एकेकाळी  मोठी वैभवशाली होती. तब्बल आठराशे वर्षांपर्यंत भारतीय विद्यापीठांचा जगाच्या शिक्षण पद्धतीवर मोठा प्रभाव होता. याला इतिहास साक्षी आहे. नालंदा,तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, सोमपुरा आणि उदांतपुरी अशी जगविख्यात विद्यापीठे होती. या विद्यापीठांमधून ज्ञानार्जनाबरोबरच संशोधनाचे कार्य होत असे. अनेक देशातून लोक ज्ञानार्जनासाठी या विद्यापीठांत येत असत. मात्र आजमितीला देशातील उच्च शिक्षणाला उतरती कळा लागली आहे. जगाच्या सर्वोच्च दोनशे विद्यापीठांच्या यादीत तर भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही, ही बाब भारतीयांची मान शरमेने खाली जाण्यासारखी आहे. एवढेच नाही तर उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवतेचे  आजचे चित्र धुसर आणि दिवाळखोरीचे दिसत आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अमुलाग्र असा बदल करण्याची खरी गरज आहे.
 उच्च शिक्षणातील मागासलेपणाबद्दल नुकतेच आपल्या देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही शिक्षणाच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त केली. परंतु त्यांच्या आणि माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून बिहारमधील प्राचीन आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरु आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि नोबेल पारितोषिक विजेते अर्मत्य सेन यांच्या नेतृत्वाखाली   समिती हे विद्यापीठ उभारणीचे काम करुन नवा इतिहास घडविण्यासाठी सरसावली आहे.  ही एक तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. नव्या नालंदा विद्यापीठाचे वास्तुचित्र आणि आराखडा तयार करण्यात येत आहे. एकेकाळी जगातील सर्वात मोठे पहिले विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या या विद्यापीठात चौथ्या इसवी सनाच्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत या विद्यापीठात अखंडपणे ज्ञानार्जन आणि संशोधनाचे कार्य सुरु होते. या काळात हे विद्यापीठ विद्यार्थी आणि अध्यापकांनी गजबजलेले होते. बौद्ध धम्माचे आणि इतर धर्मिय देशोदशीचे  विद्यार्थी विविध विषयांचा विविध भाषांमधून अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येऊन आपल्या ज्ञानाची भूक भागवित. या विद्यापीठाद्वारे  चीन, जपान व्हिएतनाम, थायलंडस, दक्षिण कोरियासह आशिया खंडाच्या अनेक देशात बौद्ध धम्माचा प्रसार झाला. या विद्यापीठात दहा हजाराहुन अधिक विद्यार्थी आणि दोन हजार अध्यापक ज्ञानार्जन  आणि ज्ञानदानाचे काम करत. साहित्य, तर्कशास्त्र, चिकित्साशास्त्र, अंकगणित, दंडनीती, ज्योतिषशास्त्र, योगविद्या, व्याकरण, चित्रकला, शिल्पकला, वेदविद्या शिवाय बौद्ध आणि जैन संप्रदायांची शिकवण इथे दिली जायची. रत्नसागर, रत्नोदय आणि रत्नरंजक अशा तीन अलिशान इमारतीमध्ये ग्रंथालय होते. हे ग्रंथालय नऊ मजल्यांचे होते. त्यामध्ये ३ लाखांपेक्षाही अधिक ग्रंथसंग्रह होता.  हे विद्यापीठ म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य कलेचा अद्भूत नमूना होते. आवारात अनेक स्तूप आणि बुद्ध विहार होते. या विहारांमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या सुंदर मूर्ती होत्या. रत्नांनी चमचमणारी दालने होती. तीनशे खोल्या होत्या, त्यामध्येच व्याख्याने व्हायची. उत्तुंग इमारती आणि आंब्यांची झाडे होती. कनोजचा राज हर्षवर्धन आणि पाल राजाचा राजाश्रय या विद्यापीठाला मिळाला होता. दान मिळालेल्या शंभर खेड्यांच्या उत्त्पन्नातून आणि राजाश्रयातून विद्यापीठाचा खर्च चालायचा. येथील विद्याथ्र्यांना निवासाबरोबरच भोजन, कपडे, औषधोपचार असे सारे काही विनामूल्य मिळत असे. इथले विद्यार्थी होतकरु, ज्ञानपिपासू तर शिक्षक बुद्धिमान, अभ्यासू आणि चारित्र्य संपन्न होते. न्यायशास्त्र ही नालंदा विद्यापीठाने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. जगभरात ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाची श्रेष्ठ अशी परंपरा निर्माण करण्यात नालंदाचे मोठे योगदान आहे. भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध या महापुरुषांनी नालंदा विद्यापीठाला अनेकदा भेटी दिल्याचा इतिहास पाली भाषेतील नोंदीत सापडलेला आहे. चीनी प्रवासी ह्युएन त्संग (इ.स.६११ ते ६४४)  नालंदात ज्ञानार्जनासाठी आले होते, त्यांनी काहीवर्षे या विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. नालंदाच्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी विपूल लेखन केले. त्यांनी लिहून ठेवलेल्या ‘जर्नी टू द वेस्ट‘ या इंग्रजी गं्रथात नालंदाबद्दल सविस्तर माहिती मिळते. तसेचतारनाथाने लिहिलेल्या बौदध धम्माच्या इतिहासातही नालंदाचा उल्लेख सापडतो.   नालंदा विद्यापीठाची सुरुवात झाली ती चौथ्या शतकात गुप्त वंशाच्या कुमारगुप्त या राजापासून.         मात्र त्याआधीही नालंदा अस्तित्वात  असल्याचे उल्लेख सापडतात. सम्राट अशोकाने  (इ.स.पूर्व २०० वर्षे) नालंदाच्या परिसरात बुद्ध विहार बांधले होते. मात्र साèया जगाला अभिमान वाटावा, असे हे विद्यापीठ सन ११९९ मध्ये धर्मांध तुर्की मोहम्मद बख्तियार या आक्रमकाने पेटवून उध्वस्त केले. या विद्यापीठातील अमाप असा गं्रथसाठा तब्बल सहा महिन्यापर्यंत जळत होता.  या ऐतिहासिक विद्यापीठाचा शोध एकोणिसाव्या शतकात १८६१ मध्ये ब्रिटीश व्हॉईसराय कqनगहॅम यांनी लावला. या परिसराचे सलग दहा वर्षे उत्खनन करण्यात आले. त्यात नालंदा हा खजिनाच सापडला. मात्र आता या वैभवशाली विद्यापीठाच्या ठिकाणी जो परिसर दिसतो तो भग्न अवशेष परिसर आहे. त्याकाळच्या भव्यतेच्या आणि संपन्नतेची आजही आठवण करुन देणारा. विसाव्या शतकात नालंदा एज्युकेशन फाउंडेशनने १९८६ मध्ये नालंदा विद्यापीठाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला तत्कालीन केंद्रीय मंत्री व्ही.एन. गाडगीळ आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा उपस्थित होते. त्यानंतर नालंदा विद्यापीठात २००४ पर्यंत शैक्षणिक कार्य सुरु होते. विद्यापीठाकडे सीबीएसईची संलग्नता होती. त्यानंतर जमीनीचा वाद न्यायालयात गेला आणि विद्यापीठातील शैक्षणिक कार्य बंद पडले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठाची नव्याने उभारणी व्हावी, अशी अपेक्षा काही वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. सन २००६ च्या पूर्व अशियाई देशांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मनमोहनqसग यांनी ती बोलून दाखवली. पौर्वात्य देशांनी ती उचलून धरली. qसगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो यांनी त्यासाठी पुढकार घेऊन ती कल्पना वास्तवात आणण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती नेमली. नोबेल पारितोषिक विजेते डॉ.अर्मत्य सेन यांनी समितीचे नेतृत्व करण्याचे मान्य केले. भारत, चीन, जपान या सर्व देशांनी त्याला पाठींबा दिला.  पूर्व अशियाई देशांच्या या शिखर परिषदेमधील अनेक कलमांमध्ये नालंदाच्या उभारणीचा समावेश करण्यात आला. भारतीय संसदेपुढे त्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. मध्यंतरी अर्मत्य सेन यांनी पंतप्रधान मनमोहनqसग यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला तत्काळ संमती दिली. इतिहासाची आता पुनरावृत्ती होणार आहे. qसगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो यांनी या विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला आहे आणि इतर पौर्वात्य देशांनी त्याला दुजोरा दिला आहे. विद्यापीठाच्या उभारणीच्या दृष्टीने कामाला सुुरुवातही झालेली आहे. नव्या नालंदा विद्यापीठासाठी ४५० एकरहून अधिक जागा घेण्यात आली आहे. त्याच्या उभारणीसाठी सुमारे ५००० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी निम्मी रक्कम इमारतींच्या बांधकामासाठी आणि उर्वरित रक्कम विद्यापीठाचे अवशेषांचे आधुनिकीकरण, सोयी-सुविधांनी कार्यक्षम बनविण्यासाठी वापरली जाणार आहे. जपान आणि qसगापूर या देशांनी प्रत्येकी पाचशे कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. विद्यापीठाच्या स्थापनेत सोळा देश सामील होणार आहेत. या विद्यापीठाचा अभ्यासक्रम पदव्युत्तर राहणार असून बौद्ध धम्माचे अध्यायन, तर्कशास्त्र, विविध धर्माचा तुलनात्मक अभ्यास, तत्त्ववाद, उत्खनन, कृषी, आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार, भाषा, साहित्य, विज्ञान या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. प्रामुख्याने कृषी विषयावर अधिक भर देण्याची भूमीका राष्ट्रपती मुखर्जी यांची आहे.
या नालंदा विद्यापीठाच्या पुनस्र्थापनेमुळे इतिहासाला उजाळा मिळणार आहे. ज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात देश पुन्हा उभारी घेईल, शिवाय भारताचे पौर्वात्य देशांसोबतचे संबंध दृढ होण्यासाठी हे विद्यापीठ दुवा ठरेल. यात शंका नाही.
                                                                                 -शिवाजी कांबळे
                                                                                   ९०११३०८५८०                                                                                                                                                                                                                                    

Wednesday, June 5, 2013

लातूरचा ‘ हिरा'


परवा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लातूर मुक्कामी एका कार्यक्रमात म्हटले होते की, लातूर हे मराठवाड्यातील ऑक्सफर्ड आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी शिक्षणाचा लातूर पॅटर्न पुढे आणला. पण आता स्पर्धा परीक्षेतही लातूर पॅटर्न निर्माण होत आहे. लातूर जिल्ह्यातील सहा मुलांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. या परीक्षेत उत्तीर्ण होणं साधी बाब नाही. अशा या देशातील सर्वोच्च परीक्षेत देशात पंधरावा येणारा कौस्तुभ चंद्रप्रकाश दिवेगावकर त्यापैकीच एक यशोदिप.
रेणापूर तालुक्यातील दिवेगाव हे त्याचे गाव. वडिल शेती करुन होमिओपॅथी प्रॅक्टीस रतात. तर आई गृहिणी आहे. अशा मध्यमवर्गीय कुटुंबातील कौस्तुभ हा त्यांचा एकुलता एक मुलगा. कौस्तुभचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण लातूरच्या केशवराज विद्यालयात झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरच्याच मिqलद महाविद्यालयात घेतले. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्याने कला शाखेत  मराठी विषय घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं नंतर त्याने औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडर मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.कौस्तुभने २०१२ मध्ये झालेल्या युपीएससीच्या अंतीम परीक्षेत देशात १५ वी रँक मिळवली. त्याने अतुलनीय असं यश मिळवलं. कौस्तुभ आपल्या या यशाबद्दल सांगताना म्हणतो की, फुल-शाहू -आंबेडरी विचारांची प्रेरणा, आई-वडिलांचे आर्शिवाद आणि गुरुजणांचं मार्गदर्शन यामुळंच मी हे यश प्राप्त करु शकलो. युपीएससीसाठी त्याने मराठी, इतिहास आणि समाजशास्त्र हे वैकल्पिक विषय घेतले होते. या विषयांचा अभ्यास करिअरसाठी आणि युपीएससीसाठी महत्त्वाचा वाटला. जाणीवपूर्व आणि डोळसपणे आपण समाजातील प्रश्नांकडं पाहणं आणि संवेदनशील असणं, हे युपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पोषक असल्याचं कौस्तुभने सांगितलं. आपणास युपीएससीच्या मुलाखतीत सद्धा साहित्य, शिक्षण आणि समाज याचा संबंध, यावरच अधिक प्रश्न विचारण्यात आले. अभ्यासाबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, मी स्वत:चे नोट्स काढले, गाईडचा वापर केला नाही. अभ्यास रोज किती तास करायचा, असं काही निश्चिीत नव्हतं, पण किमान चार-पाच तास अभ्यास करत होतो. एनसीआरटी आणि महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांचा उपयोग केला. फ्रंटलाइन, हिंदू सारखी वृतपत्रं आणि मुलाखतीच्या दरम्यान महाराष्ट्र शासनाचे लोकराज्याच्या वाचनाचा खूप फायदा झाला. परीक्षेचा काळ हा खडतर काळ असतो, पण या काळात नाउमेद न होता तयारी केली पाहिजे. कारण ही परीक्षा म्हणजे एक प्रकारे मानसिक कणखरतेचीच असते. अशा स्पर्धा परीक्षेकडे येणाèया विद्याथ्र्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता पुढे आले पाहिजे. मराठीतही अभ्यास साहित्य भरपूर उपलब्ध आहे. त्याचा फायदा स्पर्धा परीक्षेत उतरु इच्छिणाèया विद्याथ्र्यांनी घ्यायला हवा. असा संदेश त्याने आजच्या तरुणाईला दिला आहे.
                                                                                   
                                                                                  -शिवाजी कांबळे
                                                                                    ९०११३०८५८०

Translate