Monday, February 18, 2013

जोतीराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली !!

जोतीराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली !!

शिवराज्याची पुनःस्थापना करण्यासाठी जोतीराव फुले स्वतः 1874 साली रायगडवर गेले शिवाजिराजांची समाधि तर दृष्टिआड़ गेली होती... तात्यांनी चार दिवस गडावर मुक्काम केला व झाडे झुडपे वेळी,घाणेरी यामध्ये अडकलेली राजांची समाधि व् परिसर स्वच्छ केला..फुले आणली आणि राजांच्या समाधीला ती वाहिली ही घटना रायगडवरील ग्रामजोशिस समजली तो धावत पळत आला आणि जोतीरावना व् शिवरायांना अत्यंत हिन् भाषेत बोलू लागला..शिवरायांच्या समाधीला वाहिलेली फुले ग्रामजोशिने लाथेने उधालुन लावली. 
जोतीरावना शिवरायांचा झालेला अपमान सहन झाला नाही..भट पेशव्यांनी नष्ट केलेल्या शिवरायांचा इतिहास बहुजनंना समजावा यासाठी जोतीरावयांनी शिवजयंती उत्सव सुरु केला... तात्यांनी राजांच्या जीवनावर अत्यंत अभ्यासपूर्ण असा पोवाडा लिहला... सत्यशोधक समाजामार्फत शिवाजिराजांच्या पोवाड्याचे कार्यक्रम गावोगावी होऊ लागले तात्यांनी सुरु केलेली शिवजयंती गावोगावी सुरु झाली. पेशव्यांनी केलेल्या क्रूरकटकारस्थानाचा बदला जोतीराव यांनी घेतला.. 
शिवजयंती उत्सव सुरु केला त्यामुळे पुण्यातील सनातनी भयानक चिडले पण त्यांचा नाईलाज होता कारण बहुजन समाजात जोतीराव यांच्यामुले जागृति झाली होती... त्यामुले शिवजयंती बंद पाडने सनातनी लोकांना म्हणावे तेवढे सोपे नव्हते..यासाठी पेशवेकैवारी टिळक यांनी शिवजयंती बंद पाडन्यासाठी गणपति उत्सव सुरु केला.. आणि खुप मोठ्या प्रमाणात टिळक यशस्वी ठरले कारण आपले मुर्ख लोक आजकाल शिवजयंती जेवढ्या उत्साहात साजरी करत नाहित तेवढ्या उत्साहात गणपति उत्सव साजरा करतात त्यात सहभाग नोंदाविता.. अरे आपली बुद्धि कुठे शेन खायला गेली आहे तेच कळत नाही खरे तर लाज वाटायला पाहिजे आपल्याला ज्या मानसामुळे तुम्ही आम्ही जिवंत आहोत त्याच्या जयंती बाबत एवढा निरुस्ताह म्हणजे आपण स्वार्थी झालो आहोत...एवढे मात्र निश्चित.

Tuesday, February 5, 2013

व्यक्ती नव्हे संस्था !



 आदिवासीबहुल जिल्ह्यात रुग्णालय
 बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय उपक्रम
 युवक, किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण
 ‘डॉक्टर होऊन समासेवा करायचीय...ङ्क बोर्डात  येणाèया विद्याथ्र्यांच्या मुलाखतीत हमखास ऐकू येणारं वाक्य. पुढे त्याच्याशी कितीजण निष्ठा राखतात हा प्रश्नच. आयुष्याकडून खरोखरच अशी अपेक्षा असणा-यांनी मात्र कॉलेजवयातले संस्कार कसे फुलवावेत याचा धडा डॉ. अशोक बेलखोडे यांच्याकडून घ्यावा. १९८० च्या दशकात ‘भारत जोडोङ्क उपक्रमात बाबा आमटे यांच्या कार्यानं प्रभावित सहभागी युवकांमध्ये तेही होते. नागपूरमध्ये वाढलेल्या तरुणाला डॉक्टर झाल्यानंतर तिथं प्रॅक्टीस करुन पैसे कमावत आरामात राहता आलं असतं. पण त्यात समाधान न मानता त्यांनी आदिवासीबहुल किनवटमध्ये आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला.
नांदेड जिल्ह्यातला किनवट तालुका राज्याच्या सीमावर्ती दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात मोडतो. याच कारणानं विकासापासून वंचित. आता आताशा विकासाची पावलं उमटायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याचं ठिकाण नांदेड ते किनवट हे अंतर १५० किमी. पण ते पार करण्यासाठी एसटीबसला तब्बल पाच तास लागतात. याच गतीनं विकास चालला आहे. किनवट प्रशासकीयदृष्ट्या मराठवाड्यात, पलीकडे विदर्भातील यवतमाळची हद्द, तर अवघ्या ५० किमीवर आंध्रप्रदेशातील अदिलाबाद, कापसाची मोठी बाजारपेठ, किनवटच्या उपजाऊ शेतीत कपाशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन असूनही प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक जोडधंदे निर्माण करण्याबाबत सरकार उदासीन. त्याची बीजं सत्ताकारणात. स्थानिक नेतृत्व आदिवासी बंजारा. त्यांना डावलण्याकडे सत्ताधाèयांचा कल.
 किनवटच्या सुमारे सव्वा लाख लोकसंख्येत ४० टक्के आदिवासी आणि ३० टक्के बंजारा समाज. आदिवासींमध्ये प्रामुख्याने गोंड, कोलाम, आंधा, परधान, नाईक यांचा समावेश. २५ टक्के दलित, मुस्लिम, कोमटी समाज. उच्चवर्णीय नाममात्र. येथील व्यवसायीक आणि आर्थिक क्षेत्रावर कोमटी समाजाचं प्राबल्य. इथला आमदार आदिवासी qकवा बंजारा समाजाचाच असतो. डी.बी. पाटील यांच्यासारखा मराठा समाजाचा आमदार अपवादात्मक. यामुळे शासन या भागाकडे नि:पक्षपातीपणे पाहत नाही. असा स्थानिक कार्यकत्र्यांचा आरोप आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासनिधीची फळं सामान्यांना दिसत नाहीत.
प्रशासकीय यंत्रणेत सुसूत्रता नसण्याचेही दुष्परिणाम आहेत. तालुक्याच्या वनविभागीय कारभारावर अकोल्याचं तर प्रशासकीय कारभारावर नांदेडचं नियंत्रण आहे. वनविभागाचा आडमुठेपणाही काही कमी नाही. एकूण जनता अडाणी राहावी यासाठी पोषक वातावरणाची जोपासना झाली आहे. तालुक्यातल्या ४० गावांत वाहतूकीसेवा आजही नाही आणि पावसाळ्यात १० गावांचा संपर्क जगापासून तुटलेला. कोणत्याही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांनी नाहक प्राण गमवावे लागत. तातडीच्या व गंभीर उपचारासाठी या भागातील लोकांना नांदेडला जाण्याशिवाय पर्याय नसे.
औरंगाबादच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून एमएस झाल्यावर १९८९ मध्ये डॉ. अशोक बेलखोडे किनवट इथं ठरवून दाखल झाले तेव्हा अशी स्थिती होती. तालुक्यात एकही सर्जन नव्हता. बालपण कोतेवाडा ता. qहगणा या खेड्यात गरिबीत गेलेलं असल्यामुळे त्यांना गरिबांच्या गरजा नेमक्या ठावूक होत्या. पण किनवटमध्ये वेद्दकीय सेवा देण्याचे  त्याआधीचे इतरांचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते, हा अनुभव पाहता अर्थार्जनाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. हे ही त्यांना उमगलं होतं. अरोग्य अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली ती त्यासाठीच. ते काम सुरु असतानाच किनवटमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारायचा विचार करत होते.
‘हॅलो मेडिकल फाउंडेशनङ्क, ‘मातृमंदिरङ्क बरोबर त्यांनी काम केलेलं होतं. तिथं झालेल्या ओळखीतून अनेकांनी आर्थिक मदत देऊ केली. एका कंपनीनं ऑपरेशन थिएटरचं साहित्य तर डॉ. बोरगावकर यांनी ऑपरेशनची उपकरणं दिली. एका कंपनीनं एक्स रे मशीन दिलं. भंगाराच्या सामानातून पलंग तयार झाले. ३ मार्च १९९५ मध्ये अशा प्रकारे २० खाटांचं साने गुरुजी रुग्णालय ना नफा तत्वावर सुरु झालं. किनवट आणि माहूर तालुक्यातल्या ३९२ खेड्यांतल्या लोकांसाठी ती जीवनरक्षक सेवाच झाली. नांदेड जिल्ह्यातील इतर डॉक्टरांच्या शुल्काच्या ३० ते ५० टक्के कमी शुल्कात इथे तपासणी करुन औषधोपचार दिले जातात. २०१० पर्यंत या रुग्णालयात ३५ हजारांच्यावर कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया, एक हजार हायड्रोसिल शस्त्रक्रिया, सव्वा लाखांवर रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. रुग्णालयातील प्रसुतीला प्रोत्साहन देण्यासाठी इथे प्रसूत होणाèया मातांचा चोळी- बांगडी देऊन सन्मान केला जातो. गावा-पाड्यात शिबिरं आयोजित करुन सानेगुरुजी रुग्णालयाची सेवा वेळोवेळी लोकांपर्यंत पोहचविण्यात आली. वर्षाला ४४० हून अधिक गंभीर रुग्णांवर उपचार असे सरासरी प्रमाण. टँकर अपघातात मृत ठरवल्या गेलेल्या एका महिलेला डॉक्टरांनी योग्य उपचारांनी बरं केल्याची आणि बोअरिंगच्या खोल खड्डयात पडलेल्या मुलाचा जीव वाचविल्याची घटना इथे तात्काळ सेवेचं उदाहरण म्हणून सांगितले जाते. एकखांबी काम असूनही या आडपेठच्या गावात केवळ लोकसहभागातून रक्तपेढी उभारण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी आधी उपचार आणि नंतर आरोग्यशिक्षण असा कार्यक्रमा ठेवला. सानेगुरुजी रुग्णालया हे ‘भारत जोडो युवा अकादमीङ्क सामाजिक कार्यातूनच उभं राहीलेलं असल्यामुळे समाजप्रबोधन आणि सेवा हातात हात घालून चाललं आहे.
कॉलेज युवक मोठ्या शहरात गेले की मौजमजा करतात हे त्यांच्या गुप्तरोगाचं कारण लक्षात आलं तेव्हा डॉ. बेलखोडेंना समुपदेशनाची गरज तीव्रतेने जाणवली. वैयक्तिक समुपदेशनाच्या तुलनेत लैंगिक शिक्षण देणारी व्याख्यानं प्रभावी परिणाम साधतील हा त्यांचा होरा खरा ठरला. शाळा-कॉलेजात अशा व्याख्यानांना विद्याथ्र्यांच्या मोठा प्रतिसाद मिळतो. वैज्ञानिक विचारांची बैठक तयार होणं ही आमची गरज आहे आणि तुमच्या उपक्रमातून ती पूर्ण होतेय, असं विद्यार्थी आवर्जून सांगतात. सामाजिक काम  या दिशेनं पुढे नेण्यासाठी डॉ. बेलखोडेंनी मराठी विज्ञान परिषदचे उपक्रम किनवटमध्ये सुरु केले. अभ्यासक्रमाशी संबंधित प्रयोग मुलांना कार्यशाळेत करु दिल्यामुळे मुलांना, शोधांची, संशोधकांची महती सांगणारी व्याख्यानं आयोजित केल्यामुळे मुलांना शाळेतला अभ्यासक्रम परका वाटेनासा झाला.  आठवी, नववीच्या  मुलींसाठी लैंगिक शिक्षण देणाèया स्लाइड शो व्यतिरिक्त एड्सबाबत माहिती देणारे कार्यक्रमही आयोजित केले जातात. सर्पविज्ञान समजावणं, मुलांसह उल्कावर्षाव पाहणं यातून त्यांना निसर्गवाचनात साक्षर केलं. यातूनच पुढे तालुका विज्ञान-तंत्रज्ञान केंद्र आकाराला आलं. शिवाय महिला सक्षमीकरणाचा मुद्दा संस्थेनं महत्त्वाचा मानला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाèया महिलांना संस्थेतर्फे झेप पुरस्कार महिलांना मार्गदर्शन केलं जातं. बचतगट संस्थांनाही मार्गदर्शन केलं जातं. त्यांच्यासाठी आरोग्य आणि कायदेविषयक शिबिरांचं आयोजन केलं जातं. प्रौढ साक्षरता, रक्तदान प्रसार, बालकामगारांसाठीच्या रात्रशाळा चालविल्या जातात. गरीब मुलांसाठी साने गुरुजी इंग्लिश माध्यमाची शाळा सुरु केलेली आहे. नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य करण्यासाठी प्रथमोपचाराचे धडे घेतलेला युवकांचा गट तयार केलेला आहे. किल्लारीचा भूकंप, गुजरातमधली पूरपरिस्थिती आदी प्रसंगी हा गट मदतीसाठी धावून गेला होता. आरोग्य सुविधा इथेच मिळत असल्याने लोक मोठ्या शहराकडे आताशा जात नाहीत. असं असलं तरी खेड्यांकडं वळणारा  इतर दुसरा डॉक्टर इथे एवढ्या वर्षात दिसलेला नाही, याला काय म्हणायचं?        

                               ---- शिवाजी कांबळे
                           shivaji.kamble5@gmail.com

शेतीविकासाचा मराठवाडी पॅटर्न



 भारतात शेतीवर अवलंबून असणा-यांचं प्रमाण ८० वरून ६० टक्क्यांवर आलं आहे. कारण शेती करणं हे दिवसेंदिवस बिकट होत चाललं आहे. अर्थकारण, तंत्रज्ञान आणि हवामान हे शेतीचं भवितव्य ठरवणारे मुख्य घटक. तीन दशकांपूर्वी मराठवाड्यासारख्या सदाच्याच दुष्काळी भागात शेतक-यांची अवस्था आणखीच बिकट होती. शेतक-यांना शेतजमिनीचा नीठ वापर करता येत नसे. शेतात विहीर करून देण्यास संस्थेंन वा सरकारनं मदत दिली तर शेतक-यांना अप्रुप वाटत असे. मराठवाड्यात सर्वत्र जसं पाण्याचं, तसंच माहितीचंही दुर्भिक्ष आणि आधुनिकतेचंही वावडं. अशावेळी स्कॉटिश मिशन-यांनी ५० व्या दशकात स्थापन केलेल्या ‘वॉर ऑन वॉन्टङ्क या संस्थेचं चांगलं काम पुढे सुरू ठेवण्यासाठी १९६८ साली मराठवाडा शेती सहाय्य मंडळ या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. शेती, ग्रामीण विकास आणि सामजिक काम यातले दीर्घानुभवी आणि दूरदृष्टी असलेले डॉ. बी. आर. बारवाले, बॅ. जे.एम. गांधी, विजयअण्णा बोराडे, दादासाहेब अन्वीकर, डॉ. मोझीझ हे मंडळाचे विश्वस्त. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकèयांच्या शेती उत्पादनात आणि उत्पादकतेत वाढ करणं आणि गरीब शेतक-यांचं जीवनमान उंचावणं यासाठी मंडळानं काम सुरू केलं.
 भूगर्भातील खालावत चाललेली पाण्याची पातळी या समस्येची उकल व्हावी म्हणून तंत्रशुद्ध पर्याय आणि साधनं यांचा शोध घेण्याचं काम मराठवाडा शेती सहाय्य मंडळ करत होतं. सुरूवातीच्या काळात मंडळाने विहिरी खोदत, बोअर करून देत पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकèयांना मदत केली. पण सततचे दुष्काळ आणि जमीन, पाणी, जंगल आणि पशुधन यांत सातत्यानं होणारी घट यामुळे हे प्रयत्न अपूरे पडले. भारतात पहिल्यांदाच सहा इंच व्यासाची आणि २०० फुटंपेक्षा जास्त खोलवर जाणारी ट्यूबवेल परदेशातून आणण्याचं श्रेय संस्थेचंच. मात्र ही ट्यूबवेल जमिनीखालच्या पाण्याचा प्रचंड उपसा करणारी आहे हे लक्षात आल्यानंतर ती वापरणं संस्थेनं बंद केलं. अशा तèहेनं पाणी उपसणं हे पाप असल्याचं संस्था मानते.
१९७२ च्या माठ्या दुष्काळाचे दिवस. ड्रिqलग आणि विहिरी खोदणं याद्वारे भूगर्भातील पाणी काढणं उचित नाही. ते जास्त काळ चालू शकणार नाही, असं चर्चा, अनुभव, qचतन यातून लक्षात आलं. त्यामुळं भूजल पुनर्भरणाचा विचार सुरू झाला आणि पहिला जलसंधारण उपक्रम रेवगांव जिल्हा जालना येथे राबवला. सिमेंद बंधाèयाचा साखळी पद्धतीने वापर करून पाणी अडवण्याचा हा प्रयोग. त्यात अनेक तांत्रिक उणिवा होत्या. त्यापुढे लक्षात आल्या तशा त्या दूर करण्यात आल्या. दुष्काळानंतर १९७४-७६ मध्ये जालना जिल्ह्यातल्या देवqपपळगाव इथे पाणलोटाचं काम हाती घेतलं. १९७८ मध्ये याचा चांगला परिणाम दिसून आला. त्याचवर्षी शेतकरी आणि शासन यांच्या चर्चेतून ‘माती अडवा पाणी जिरवाङ्क हा उपक्रम सुरू झाला. १९८० च्या सुरूवातीला लोकसहभागातून जलसंधारण करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचे संस्थेनं प्रयत्न केले. आडगाव तालुका जिल्हा औरंगाबाद इथल्या ग्रामस्थांनी देवqपपळगावपेक्षाही कामात जास्त सहभाग देण्याची इच्छा आणि तयारी दाखवली. १९८४ मध्ये सुरूवात केली. मात्र या गावाच्या जमिनी तुलनेनं हलक्या होत्या. तांत्रिकदृष्ट्या काम परिपूर्ण होण्यासाठी शासनाच्या मृदसंधारण, सामाजिक वनीकरण या खात्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. जलसंधारणाचं काम शासनासोबत करणं हा त्या काळाचा अनोखा प्रयोग होता. या अनोखेपणामुळच कामाल स्विस डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अर्थसहाय्य केलं. शासनातल्या लोकांची कामं करण्यासाठी मनवणं, वळवणं अवघड होतं. पण आम्हीही आमची रीत थोडे बदलून त्यांच्याशी जुळतं घेत काम केल्यामुळं अपेक्षित परिणाम मिळू शकला असं मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. शासनाशी भागीदारी ही संस्थेसाठी नवीन संधी ठरली.
या प्रकल्पामुळं जेमतेम एक पीक घेणारं आडगाव वर्षाला दोन पिकं घेऊ लागलं. थोडं बागायती क्षेत्रही विकसित झालं. साखळी बंधाèयामुळं पाणीसाठ्यात लक्षवेधी वाढ होऊ शकते हे सिद्ध झालं. राज्यात शासकीय यंत्रणेसोबत समाजसेवी संस्थांचा सहभाग यशस्वी ठरला. हे एक नवीन उदारहण म्हणून पुढे आलं. १९८८ पासून याला ‘आडगाव पॅटर्नङ्क असं नाव पडलं. पुढे आडगाव पॅटर्नप्रमाणे महाराष्ट्रात अन्यत्र पाणलोटाची कामं व्हावीत. हा विचार जोर धरू लागला. याच काळात संस्थेच्या कामाला खूप प्रसिद्धी मिळाली. संस्थेचं काम बघण्यासाठी आडगावला भेटी देणाèयांचं प्रमाण वाढलं. विजयअण्णा सांगतात, ‘‘ त्या प्रसिद्धीमध्ये आम्ही वाहवत गेलो आणि त्याचा परिणाम कामावर झाला. त्यानंतर मात्र आम्ही प्रसार माध्यामांचा कधी आधार घेतला नाही माध्यमं वाईट नसतात. प्रसिद्धी पचवून पुढे जाणं आम्हाला जमलं नाही ही आमची चूक!ङ्कङ्क ते मोकळेपणाने कबुल करतात. आडगाव अनुभव पुढे इंडोजर्मन पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन या क्षेत्रात भरीव काम करण्याची संधी मिळत गेली. १९९४ साली जर्मन पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कडवंची इथे संस्थेनं पाणलोटाचं काम यशस्वी केलं. या पाणलोटामुळे मातीची धूप कमी होऊन २४५ हेक्टर जमीन लागवडीखाली आली. त्यामुळे सरासरी उत्पन्नात सातपटीने वाढ झाली. याच गावात संस्थेनं १६४ शौचालयं आणि ८० गॅसजोडण्या लोकांना दिल्या.
 शेतीविकासाबरोबरच समाजसंघटन ही एक महत्वाची जबाबदारी असल्याचं संस्था मानते. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातली ६० खेडी स्वयंपूर्ण होणं हा संस्थेनं केलेल्या कामांचा परिणाम आहे. तिथे अनेक चांगल्या प्रथांचा पायंडा पडला. धूलिवंदन आणि कोजागिरी पोर्णिमा या दिवशी गावकèयांना एकत्र करून ग्रामीण विकासाच्या एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा आणि त्यानुसार कृती करण्याचा उपक्रम आजही सुरू आहे. शासनाच्या शेती धोरणाबद्दल मंडळाचे मत काय? शासनाने शेतकèयांना अनुकूल धोरणं राबवली आहेत, असं संस्थेचं मत आहे. शेतकèयांची कर्जमाफी, व्याजदर कमी करण्याचा निर्णय, ५० हजारांपर्यंत बिनव्याजी कर्ज, मालाच्या आधारभूत qकमतीत केलेली भरीव वाढ, राष्ट्रीय जलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून फळबाग लागवड व तत्सम व्यवसायांना, सुक्ष्म qसचनास दिलेली चालना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषीविकास कार्यक्रम यासारखे अनेक स्तुत्य उपक्रम शासनाने हाती घेतलेले आहेत. आणखीही काही गोष्टींची आवश्यकता आहे., असं संस्थेला वाटतं. हा व्यवसाया पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. शेती, पाणलोट या कामात तांत्रिक बाबी महत्वाच्या असतात. त्या शेतकèयांना शिकवणं आणि शेतीमागचा शेतकèयांचा विचार पक्का व्हावा यासाठी मदत करणं असं दुहेरी काम संस्था करत आली आहे. विजयअण्णा बोराडे सांगतात, ‘‘ शेतकरी एकवेळ धर्म बदलतील, पण पीक रचना बदलायला तयार नसतात. मराठवाड्यासारख्या भागात कमी पाण्यावरची पिकं घ्यायला हवीत. गव्हाचा पेरा घेऊ नका, ज्वारी-हरबèयाचा घ्या असं सांगितलं तर शेतकरी ऐकत नाहीत. कारण प्रतिष्ठा आडवी येते. उस, गहू, केळी ही जास्त पाण्यावरची पिकं प्रतिष्ठेची मानली जातात. कारण ती नफा कमावून देतात. पण हा नफा पाण्यावर अवलंबून असतो. पाणी पुरं पडलं नाही की पीक १० वरून दोन क्विंटलपर्यंत खाली येतं.ङ्कङ्क  मात्र संस्थेकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर शेतकरी रासायनिक खतांचा वापर कमी करायला सुरूवात करतात आणि आधुनिक शेतीकडे वळू लागतात.
गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात पावसाच्या सरासरीत फार फरक पडलेला नाही. तरीही पिकांचं नुकसान होतं. कारण पाणलोटाचा अभाव. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही पिकांना योग्य तेवढं पाणी मिळणं. अशी यशस्वी पाणलोटाची व्याख्या विजयअण्णा करतात. दोन पावसामधलं अंतर लांबलं तरी मग पिकांचं नुकसान होत नाही. १९९२ साली संस्थेनं कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. या केंद्राद्वारे तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीवरील चाचण्यांचं आयोजन केलं जातं. शेतकèयांना आधुनिक विकसित शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. दर महिन्याच्या पाच तारखेला पूर्वनियोजित विषयावर चर्चासत्रं होत असतात.  या उपक्रमात आतापर्यंत १६६ चर्चासत्रं झाली आहेत.
संस्थेनं औरंगाबाद जिल्ह्यातल्या २० गावांमध्ये एकात्मिक कापूस कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १० हजार झाडांची लागवड केली. कापसासाठी संस्थेनं प्रयोगशाळा उभी केली आहे. ुुु-ळपवळर  या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने उत्कृष्ट कापूस पुढाकार उपक्रमांतर्गत शाश्वत कापूस उत्पादन पथदर्शक प्रकल्प जालना जिल्ह्यातील ३० गावात एकूण तीन हजार शेतकèयांच्या सहकार्याने ६ हजार हेक्टर क्षेत्रावर सुरू आहे. पाचवर्षांपूर्वी संस्थेनं राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या सहकार्याने फिरतं कृषी चिकित्सालय सुरू केलं आहे. त्यामुळे गावातल्या गावातच पाणी, माती परिक्षणाची सोय झाली. पीक प्रात्याक्षिक दिलं. यामुळे जमिनीचं आरोग्य आणि संतुलित खताच्या वापराबाबत शेतकèयांमध्ये जागरूकता वाढत चालली आहे. मराठवाडा शेती सहाय्य मंडळ विदर्भातही पोचलं आहे. विदर्भ पाणलोट मिशन कार्यक्रमात विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या कामात मंडळ सहभागी आहे. कामासाठी निधी  न मिळणं, चांगले कार्यकर्ते न मिळणं, विपरित शासकीय धोरणांचा त्रास अशा कित्येक अडचणी अन्य स्वयंसेवी संस्थाप्रमाणे मराठवाडा शेती सहाय्य मंडळालाही आल्या. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न संस्था करत आली आहे. लोकसहभाग आणि संस्थेबद्दल शेतक-यांना वाटणारा विश्वास ही संस्थेची बलस्थानं आहेत.
         
                                 ---- शिवाजी कांबळे
                                         ९०४९२९८७५०
                             shivaji.kamble5@gmail.com      

गावविकासाचा उगम



 त्या दिवशी शाळा भरली तेव्हा प्रार्थनेला सगळे चुकार  िशक्षक हजर होते. हो ! शिक्षक, मुलं नव्हे! एरवी शाळा भरल्यावर दोन तासांनी उगवणा-या या महाभागांना चांगली जरब बसली होती. शांततामय मार्गाने महिलांनी ती बसवली होती. qहगोलीतल्या एका खेड्यात शाळेचा कारभार सुधारण्याचा हा चमत्कार बचतगटाने केलेला. केवळ आर्थिक सक्षमतेसाठीच बचतगट नसतात; तर त्यांनी गावाच्या उत्कर्षासाठी कारभारातही लक्ष घातलं पाहिजे हे जयाजी पाईकराव यांनी पक्कं रूजवलय. त्यांच्या ‘उगमङ्क या संस्थेचं काम पाहणाèयांना असे अनेक चमत्कार दिसतात. रखरखाट, पाण्याचा खडखडाट, खेडुतांचं मागासलेपण ही मराठवाड्याची वैशिष्ट्ये इथे गायब होतात. विज्ञाननिष्ठा बाळगून काम करण्यानं लोकांची स्थिती किती बदलू शकते हे कळतं.
नामांतर आंदोलनाच्या काळात झालेली जाळपोळ आणि नुकसान पाईकरावांनी जवळून पाहिलं होतं. ते सांगतात, ‘‘ दलितांच्या शोषणामागे आर्थिक मागासलेपण आहे आणि त्यावर विजय मिळविल्याशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणवलं. पत्रकारिता सोडून सामाजिक कार्याचे रितसर धडे गिरवायचं ठरवून मी १९७९ साली मुंबईच्या ‘टाटाङ्क  सामाजिक विज्ञान संस्थेत प्रवेश घेतला. या संस्थेत प्रवेश घेणारा मराठवाड्यातला मी पहिलाच!ङ्कङ्क अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पाईकरावांनी समाजकल्याण अधिकारी म्हणून नोकरी केली. पण मन रमलं नाही. राजीनामा देऊन पूर्णवेळ समाजकार्य सुरू केलं. युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून नांदेडमध्ये त्यांची ओळख होतीच. १९८३ मध्ये ‘कयाधु ग्रामविकास संस्थेङ्क ची स्थापना करुन त्यांनी कंजारासह १५ गावांत रचनात्मक काम सुरु केलं. १९९० पर्यंत पाणलोट, ग्रामविकास यांवर भर होता. पाणीव्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. मुकुंद घारे, अणदूरचे डॉ. अहंकारी अशा तज्ज्ञांच्या सहकार्याने हे काम पुढे नेणं चाललं होतं. तीन गावात संस्थेच्या पाणलोट क्षेत्राच्या कामाल यश आलं. कळमनुरी तालुक्यातल्या जुंबडा गावात कायम पाणीटंचाई होती. त्यामुळं या गावात लोक आपली मुलगी देत नव्हते. पण पाणलोट क्षेत्रविकास झाल्याने आता याच गावातून चार गावांना पाणी पुरवलं जाऊ लागलं ! आर्थिक विषमता दूर व्हायची असेल, तर महिलाकेंद्रित उपक्रमांना पर्याय नाही, हे जाणून १९९६ साली ‘उगमङ्क ची स्थापन झाली. बचतगट चळवळीला नियोजनबद्ध रूप देणारे विजय कुलकर्णी आणि सुधा कोठारी यांनी जुंबडा गावात बचतगट स्थापण्यासाठी ‘उगमङ्क ला मदत केली. पुढे जमीन अधिकार आंदोलनात सहभागी होऊन ‘उगमङ्क ने गायरानधारक महिलांचे बचतगट गावोगावी तयार केले खरे, परंतु त्यांना पैसे द्यायला बँका कमी पडत होत्या. म्हणून जमीन अधिकार आंदोलनात एकत्र आलेल्या सामाजिक संस्थांनी अनिक फायनान्शियल सव्र्हिसेस प्रा. लि. ची स्थापनाा केली. तिने जिल्ह्यातल्या बचतगटांना २०१० मध्ये २१ लाख ९४ हजार रूपयांचं कर्जवाटप केलं. शेळीपालन, दुग्धविकास, बैलखरेदी, किराणा दुकान, बांगडी व्यवसाय अशासारख्या कामांसाठी ते होतं. दरम्यान पाईकराव यांनी जमिनीचा कस, पिकं यासाठी सेंद्रिय शेती कशी चांगली ठरते त्याची शिबिरं घ्यायला सुरूवात केली होती. लोकांना तिचं महत्व वाटू लागल्यावर दोन -तीन एकर जागेपैकी किमान दहा गुंठे जागेत सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन केलं होतं. १९९६ मध्ये ‘उगमङ्क ची स्थापना झाल्यापासून हिंगोली जिल्ह्यात प्रथमच अशी शेती प्रत्याक्षात आली. व्यवहारात पैसा असेल, तरच पुरुष कामाला सरसावतात ही मानसिकता लक्षात घेऊन बचतगटांच्या महिलांनाच या शेतीचं प्रशिक्षण दिलं होतं.
 रासायनिक खतांना पर्याय म्हणून èहाझोबियम, गांडूळखत अशी जैविक खतं वापरली. एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या भाज्या, धान्यांना चांगला मोबदला मिळवून देण्याकरिता हमखास बाजारपेठही ‘उगमङ्क विकसित केली. qहगोलीच्या जिल्हा परिषदेसमोर दर शुक्रवारी असा वेगळा बाजार भरविण्यात येतो. औरंगाबादमध्ये प्रदर्शन भरवून चोखंदळ ग्राहकांपर्यंत हा माल पोचवण्यात आला. भाज्यांची मुळ चव राखली गेल्यामुळे, तुलनेत त्या जास्त टिकाऊ असल्याने ग्राहकवर्ग कायमचा बांधला गेला. या उत्पादनांना नेहमीपेक्षा १० टक्के भाव जास्त मिळतो. विक्री व्यवहारात दलाल-अडत्याला स्थान नाही त्यामुळे झालेला अख्खा न नफा शेतकèयांचाच. सातत्याने दहा वर्षे या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे ५० गावांतले अडीच हजार अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक या शेतीत स्थिरावले आहेत. आजूबाजूच्या क्षेत्रातून शेतकèयांच्या आत्महत्यांच्या बातम्या येत असताना, या गावात तसं नाही हेही लक्षणीयच. कृषी तंत्रज्ञानाबाबत महिलांना डावललं जातं असं पाईकरावांना दिसून आलं. पुरूष शेतीचं केवळ ३० टक्के काम (पेरणी, वखरणी, नांगरणी) करतात पण त्यांना ७० टक्के तंत्रज्ञान मिळतं. सातबारा उताèयावर नावही पुरूषाचंच असतं. पण शेतात राबते महिला. शेतकी प्रशिक्षणात मात्र तिला मागे ठेवलं जातं. पुरुषांनी शिबिरात ऐकलेलं बाईपर्यंत पोचतच असं नाही. ‘उगमङ्क ने महिलांसाठी कृषीतंत्रज्ञान प्रशिक्षण सुरू केलं. त्यांना कृषी विद्यापीठात नेऊन कृषी अधिकाèयांशी भेट घडवून आणली. पेरणी अगोदरची बीजप्रक्रिया, मिश्रपिक घेण्याचे फायदे, दोन तासांमधलं (रोपांच्या ओळी) अंतर, काढणी पश्चात प्रक्रिया हे शिकवलं. २००९ पासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत तीन हजार शेतकरी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. सेंद्रिय पद्धतीनं मिळविलेल्या धान्याची डाळ जात्यावर केली, तर तिची चव टिकते हे हेरून संस्थेनं जात्याचा प्रचार केला. पण गृहणींची जात्याची सवय सुटलेली. यावर उपाय म्हणून बेअरिंग असलेलं जातं निर्माण केलं गेलं. हे सुटसुटीत जातं आता ग्रामीण भागात लोकप्रिय होत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा स्वयंसेवी संस्थाच्या मदतीनं राबवावा असा वटहुकूम २००९ मध्ये सरकारनं काढला. प्रत्येक जिल्ह्याला त्यासाठी निधीही दिला. qहगोली जिल्ह्यात ‘उगमङ्क कडे ही जबाबदारी आली. तेव्हा पाईकराव आपल्या नियोजनबद्ध आराखड्यासह सरसावले. गावसुक्ष्म नियोजन हा ‘मग्रारोहयोङ्क मधला कळीचा घटक. त्यांनी सात ते अकरा गावांचा एक गट करून अभ्यास केला. प्रशिक्षण घेतलं आणि अहवाल सादर केले. त्याद्वारे ७०० गावातल्या मजुरांना कामं मिळाली. वटहुकूमाची तामिली करण्यासाठी सरकारी निधीचा विनियोग झाला. या कामाची इतकी प्रशंसा झाली की इतर गावांनी qहगोलीचा धडा गिरवावा असं वरून सांगण्यात आलं. बाकीच्या जिल्ह्यातला निधी तोपर्यंत अनेक वाटांनी गायब झालेला होता. त्यामुळं पुन्हा एकदा निधी वाटून ‘qहगोली पॅटर्नङ्क राबविण्याचा आदेश देण्यात आला. यावेळी qहगोलीलाही निधी मिळाल्यामुळं पाईकरावांनी काम आणखी परिणामकारक केलं. रोहयोचं काम ७०० वरून १४०० गावांत पोचलं.
जागतिक पातळीवर विविध १२ निकषांनुसार (दरडोई उत्पन्न, दुष्काळाची तीव्रता, साक्षरता, स्त्रीपुरुष लोकसंख्या, बालमृत्युदर वगैरे) मानवविकास निर्देशांक ठरतो. त्यानुसार देशातली मागास राज्यं, राज्यातले मागास जिल्हे शोधले जातात. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील १२ जिल्हे मागास म्हणून निश्चित केले. त्यातही qहगोलीचा क्रमांक खालचाच होता. जिल्ह्यातल्या गावांमधल्या समस्या नेमक्या शोधून त्या मानवविकास मिशन (औरंगाबाद) पुढे मांडणं, त्यांच्या निर्मुलनासाठी प्रयत्न करणं ‘उगमङ्क नं सुरू केलं. qहगोलीत सेनगाव तालुका सर्वाधिक मागास. इथे स्त्रियांची संख्या दर हजारी ८२६. इथे सतत संपर्क ठेवून लोकसहभागातून उपक्रम केले. मागास भागांसाठीचा निधी मिशनकडून सेनगावकडं वळवळा आणि गर्भqलगनिदान रोखणं, जलस्त्रोत बळकटीकरण आदी कामं घडवून आणली.
‘उगमङ्कचे कार्यकर्ते पाच दिवस गावात जाऊन राहतात आणि तिथली परिस्थिती अभ्यासतात. त्यांच्यातलचं एक होऊन राहायचं असल्यानं ते आपल्यासोबत काहीही नेत नाहीत. नेसत्या वस्त्रानिशी जातात. लोकांना भेटतात. समस्या अनुभवतात. त्या मानवविकासला सादर करतात. मिशनकडून गावसुधारणा साधून घेण्यास संपूर्ण गावाला सामावून घेतात. तारेगावमधली सहा महिने बंद असलेली अंगणवाडी सुरू होते. बंद झालेलं खाऊ देणं सुरळीत होतं. ग्रामसेवकाची वागणूक सुधारते. शिक्षकांची मनमानी बंद होते. संडासला जागा नसलेल्या  गावात शोषखड्डयांचा उपाय काढला जातो. किशोरींच्या रक्तचाचण्या घेऊन हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. गावागावानुसार समस्या बदलतात.
शासकीय योजना आणि त्यावर आधारित कामांवर संस्थेचा भर असल्यामुळं जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणेशी संस्थेचा चांगला समन्वय आहे. योजनांच्या अंमलबजावणीसाठी याचा फायदाही होतो. मात्र अन्याय, अत्याचाराविरोधात, न्याय हक्कांसाठी, स्थानिक प्रशासनाच्या, सरकारच्या विरोधात आंदोलन करताना संस्थेचे प्रशासकीय संबंध कधी कधी अडचणीचे ठरतात. ‘उगमङ्क जरी महिलाकेंद्रित कामातून झाला असला तरी संस्थेचं कमा नदीच्या प्रवाहाप्रमाणे वळणावळणाने मार्गक्रमण करत वाटेवरच्या गावांना विकासाच्या दिशेनं घेऊन चाललं आहे.

               ---- शिवाजी कांबळे
                shivaji.kamble5@gmail.com

Monday, January 21, 2013

काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे


काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे
दैनिक ‘एकमतच्या दि. २५-१२-२०१२ च्या अंकातील वाचककट्ट्यामध्ये शिवाजी कांबळे यांचे ‘अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई या मथळ्याचे प्रसिद्ध झालेले पत्र वाचले. त्यांच्या पत्राचे शवविच्छेदन करावे व त्यांच्या कुविचारांची नांगी वेळीच ठेचावी हा या लेखनामागचा हेतू. कोणत्याही घटनेचा व प्रसंगाचा विचार
माणसाने कालसापेक्षच केला पाहिजे नसता काल-विपर्यासामुळे चुकीचा निष्कर्ष निघतो. ऐतिहासिक घटनांचा विचार कालसापेक्षच करावा म्हणजे कोणावर अन्याय होत नाही. तत्कालीन मूल्यांतूनच गतकालीन घटनांचे मूल्यमापन करावे. विद्यमान मूल्यांतून गतकालीन घटनांचे मूल्यमापन करण्याची घोडचूक शिवाजीराव कांबळे करीत आहेत. रछत्रपती शिवाजी महाराजांना भवानीमाता प्रसन्न होती. प्रसन्न होऊन देवीने दिले काय तर भवानी तलवारच! का देऊ नये तिने अ‍ॅटमबॉम्ब, नायट्रोजन बॉम्ब वा एखादे लांब पल्ल्याचे मिसाईल? शिवाजी महाराजांनी अफझलखानचे हृदयपरिवर्तन न करता त्याला ठारच केले व औरंगजेबाच्या दरबारात सत्याग्रहाचा मार्गाचा अवलंब न करता,‘शक्तीने मिळती राज्ये युक्तीने कार्य होतसे,ङ्क हाच मार्ग चोखाळला. ज्या ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवण्याचा व निर्जीव qभत चालवण्याचा चमत्कार केला. चमत्कार सोडून द्या पण वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा व एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा महान योग साधला. त्या योगीयाच्या राजाला निवृत्ती सोपान मुक्ताबाई या भावंडांना घेऊन पैठणच्या कर्मठ व सनातनी ब्राह्मणांकडे पायपीट करीत जाऊन प्रमाणपत्र आणण्याची काय आवश्यकता होती, त्या काळात ती होती हेच आजच्या या प्रश्नाचे एकमेव उत्तर आहे.काळाची गती, विज्ञानाची प्रगती, औद्योगिकीकरण या विक्रीकरण यांचा रेटा जबरदस्त असतो. त्यात शिक्षणाची भर पडली की परिवर्तनाला लक्षणीय गती येते. १९५० साली मी
सातवीला होतो. आमच्या घरी वडिलांची आत्या होती. फारच कर्मठ व सनातनी तिचे सोवळे ओवळे फारच जाचक. तिच्या तुलनेत माझी आई फारच उदारमतवादी. माझे सहकारी सर्वश्री साबणे, कांबळे, वाघमारे, ताटे, आदोडे, उजगरे, लोंढे, क्षीरसागर माझ्या घरी निमित्ताने जेवावयास येत. ते सर्व माझ्या पाटाला पाट व ताटाला ताट लावून जेवत.माझी आईच पंक्तिप्रपंच न करता मायेने वाढीत असे. मी ज्या काळात सातवीला होतो त्या साली पु.साने गुरुजींनी निराश, उदास होऊन उद्विग्नतेने झोपेच्या गोळ्या गिळून जीवनयात्रा संपविली.त्यांची आई त्यांच्या बालपणी, कोकणातल्या पालगड गावी, समाजावर
सनातनी व कर्मठांच्या कर्मकांडाचे वर्चस्व व प्रस्थ होते. त्या काळात प्रथेप्रमाणे अस्पृश्यता पाळत होती. तरी तिचे अंतःकरण करुणेनेव भूतदयेने भरून ओसंडत होते. हे न लक्षात घेता तिच्यावर दोषारोप करून आक्षेप घेणे
कमालीच्या असहिष्णू वृत्तीचे व निष्ठूरपणाचे निदर्शक आहे. अशा माणसाला मी एकारलेल्या विचाराचे संबोधतो. अशा माणसाला काकदृष्टी व गिधाडाचीच चोंच असते.
                                    -राजेश्वर शिवाजी देशमुख
                                पेठ परळी वैजनाथ, जि. बीड.

बुरसटलेल्या विचारांचे राजेश्वरराव


बुरसटलेल्या विचारांचे राजेश्वरराव
   मी ‘एकमतच्या २५ डिसेंबरच्या अंकात वाचक    कट्यामध्ये अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई, या         मथळ्याखाली एक पत्र लिहिले होते. पावित्र्याच्या मखरात बसविलेली शामची आई कशी अस्पृश्यता पाळणारी, जातीयवादी होती, हे मी पुराव्यानिशी त्या पत्रात दिलेले आहे; पण माझ्या एका पत्रामुळे पेठ, परळी वैजनाथ येथील बुरसटलेल्या आणि मनुस्मृतीचा समर्थक असलेल्या राजेश्वर देशमुखांचा जळफळाट झालेला दिसतोय. त्यांनी १५ जानेवारी २०१३ च्या ‘एकमतङ्कच्या अंकात काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे या मथळ्याखाली  कालसापेक्षतेच्या नावाखाली चातुवण्र्य व्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे समर्थनच  केले आहे. माझ्या मूळ पत्राशी कसलेही ताळतंत्र नसलेले दाखले देऊन जे काही त्यांनी विद्वतेचे दिवे पाजळले आहेत तेच सत्य आहे, असा चुकीचा संदेश वाचकांत जाऊ नये म्हणून हा पत्रप्रपंच करीत आहे. माझ्या पत्रात देशमुखांना नेमके काय खटकले? हे त्यांनी सांगितलेले नाही. मी सानेगुरुजींच्या सामाजिक आणि संस्कार चळवळीतील योगदान नाकारलेले नाही; पण याचा अर्थ असा नव्हे की, सानेगुरुजींच्या साहित्यकृतीवर, टीका वा चर्चाच होऊ नये. बाबा वाक्य प्रमाणम् हे कसे चालेल? कोणत्याही घटनेचा व प्रसंगाचा विचार माण-साने कालसापेक्षच केला पाहिजे, असे ते नमूद करतात. याचाच अर्थ इतिहासात जी अस्पृश्यता पाळली जात होती, दलितांना महारोग्यांसारखी वागणूक मिळत होती, ते काळानुरुप योग्यच होती. त्यामुळेच श्यामच्या आईला अस्पृश्यता पाळावी लागली, असा बालिश युक्तिवाद देशमुखांनी केला आहे. यातून श्यामची आई अस्पृश्यता पाळत होती हेही त्यांनी ओघाने कबूल केले आहे.               देशमुखसाहेब, महापुरुष वा इतिहासातील आदर्शांचे विचार कधीच कालसापेक्ष नसतात. ज्यांच्याकडे प्रवाहाविरुद्ध जाण्याची निर्भयता असते, अनिष्ट रूढी-परंपरांचे चक्रव्यूह भेदण्याची ज्यांच्याकडे जिगर असते तीच माणसे   महामा-नव बनतात. सर्वांनाच तेवढी प्रतिभा नसते qकवा समाजाचे नेमके आकलन करून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळेच महामानवाने शोधलेल्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न लोक करीत असतात. आजही आपण महापुरुषांच्या विचारांचे, प्रसंगाचेच दाखले देत असतो.
  जसे तुम्ही तुमच्या पत्रातही संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवरायांचे दाखले दिले आहेत पण ते चुकीच्या पद्धतीने दिले आहेत. माझ्या मूळ विषयाशी त्याचा काहीएक संबंध नसलेले. देशमुख यांच्या पत्रावरून हेच सिद्ध होते की, आजही मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती अजूनही जिवंत आहे. ते सरळ सरळ समतेचा तिरस्कार आणि विषमतेचा पुरस्कार करतात. दोन-चार दलित मित्रांना घरी नेऊन जेऊ घातले हे सांगणे हीसुद्धा अस्पृश्यतेचीच भावना आहे. या प्रसंगाचे भांडवल करून आपणही पुरोगामी हेच कदाचित त्यांना सांगावयाचे असेल. देशमुखसाहेब यातून आपण फार मोठे समाज परिवर्तन केलेत त्याबद्दल आपले अभिनंदनच केले पाहिजे. मनुवाद्यांनी निर्माण केलेली चातुवण्र्य व्यवस्था, भेदभाव, द्वेषभाव हे देशमुखांना कालसापेक्षतेच्या नावा-खाली योग्य वाटत असतील तर त्यांनी खुशाल वाटू द्यावे, मी तसे करू शकत नाही.
   समाजात बुरसटलेल्या विचारांची, जातीयवादी प्रवृत्तीची कांही तथाकथित मंडळी लोकांचा बुद्धिभेद सातत्याने करीत असतात. त्यांचे अमानवी विचार हाणून पाडणे हेच परिवर्तनवाद्यांसमोरील आजचे खरे आव्हान आहे.
                                                                           -शिवाजी कांबळे
                                                                             सोनानगर, लातूर

Wednesday, January 2, 2013

विद्येची खरी देवता

                                                  


                                           आपल्या सर्वांची खरी आई, विद्येची खरी देवता 
                                         क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना विनम्र अभिवादन !


आज ३ जानेवारी सावित्रीमाईंची जयंती. त्यानिमित्ताने सावित्रीमाईंचे जीवनकार्य इथं सांगणं म्हणजे केवह उपचार ठरेल. माईंचे कार्य, जीवन सर्वांना माहित असलेच पाहिजे. ते गृहीतच आहे. असे म्हणतात संत ज्ञानेश्वरांनी भींत चालवली, पण चार भींतीचे घर स्त्री एकटी चालवते. त्याचं काय? स्त्रीला जगत जननी म्हणून संबोधले जातं. जिल्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, स्त्री-पुरुष समानता आली पाहिजे, असा डीढोरा आज सर्वत्र पिटला जातो. सरकार, विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्तेही मोठा आव आणत स्त्री स्वातंत्र्याच्या आणि महिला अत्याचार विरोधी तास न तास बौद्धिक गप्पा मारत असतात. पण अलिकडे देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी या सगळ्या बुद्धिवाद्यांच्या थोबाडीत चपराक मारली आहे. सद्या आपल्या भारत देशात महिला अत्याचार, बलात्काराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडत नव्हते असे नाही, पण आता या प्रकरणांना वाचा फुटते आहे. सावित्रीमाईच्या लेकींवरील अत्याचारानं कळस गाठलाय. ज्या काळात स्त्रीयांना भोगवस्तू म्हणून संबोधलं जाई, स्त्री स्वातंत्र्याची भाषा करणं, तिनं शिक्षण घेणंही पाप समजलं जाई. अशा काळात सावित्रीमाईंनी मुलींना शिक्षणाचे दारे खुली करुन दिली. सावित्रीमाई भारतातील आद्य स्त्री शिक्षिका ठरल्या. शिक्षणासारखे अत्यंत पवित्र कार्य करणा-या सावित्रीमाइंचा आदर्श, राष्ट्रमाता जिजाऊंचा, रमाइंमातेचा आदर्श आपल्या सर्व तरुणाईसमोर असताना देशातील महिला-मुलींवर अत्याचार होतात. ही बाब देशाच्या दृष्ठीने अत्यंत लाजीरवाणी आहे. भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला व्यक्ती म्हणून स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. परंतु धर्मशास्त्राने अनेक वर्षांपासून तिला भोगवस्तू, दासीचा दर्जा दिला आहे. त्याची चिकित्सा कोणी करायलाच तयार नाही. स्त्रीया आजही अनिष्ट रुढी,परंपरेच्या बळी ठरत आहेत. जोपर्यंत भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. समाजाची स्त्रीयांकडे पाहण्याची मानसिकता बदलत नाही. लोकशिक्षण होत नाही. तोपर्यंत परिवर्तनाची अपेक्षा करणं म्हणजे पालथ्या घडयावर पाणीच.
हे तर षडयंत्र.........
दुसरा मुद्दा म्हणजे दलित-बहुजनांचे अत्यंत महत्वाचे प्रतीक असणाèया दिवसीच काळा दिवस पाळला जात आहे. ६ डिसेंबर हाही काळा दिवस पाळण्यात येतो. संविधान दिवसी बहिष्काराचे आवाहन केले जाते आणि आता ३ जानेवारीला सावित्रीमाईंच्या जयंती दिनी काळा दिवस पाळण्याचे आवाहन. अखेर प्रत्येक वेळी विरोध, निषेध व्यक्त करण्यासाठी दलित, बहुजन नायकांच्या प्रतीकांनाच लक्ष्य का केले जाते ? हा संयोग कसा असू शकतो, हे तर विचारपूर्वक केलेले षडयंत्र वाटते.
                                                                         ...........शिवाजी कांबळे


Translate