Tuesday, February 5, 2013

गावविकासाचा उगम



 त्या दिवशी शाळा भरली तेव्हा प्रार्थनेला सगळे चुकार  िशक्षक हजर होते. हो ! शिक्षक, मुलं नव्हे! एरवी शाळा भरल्यावर दोन तासांनी उगवणा-या या महाभागांना चांगली जरब बसली होती. शांततामय मार्गाने महिलांनी ती बसवली होती. qहगोलीतल्या एका खेड्यात शाळेचा कारभार सुधारण्याचा हा चमत्कार बचतगटाने केलेला. केवळ आर्थिक सक्षमतेसाठीच बचतगट नसतात; तर त्यांनी गावाच्या उत्कर्षासाठी कारभारातही लक्ष घातलं पाहिजे हे जयाजी पाईकराव यांनी पक्कं रूजवलय. त्यांच्या ‘उगमङ्क या संस्थेचं काम पाहणाèयांना असे अनेक चमत्कार दिसतात. रखरखाट, पाण्याचा खडखडाट, खेडुतांचं मागासलेपण ही मराठवाड्याची वैशिष्ट्ये इथे गायब होतात. विज्ञाननिष्ठा बाळगून काम करण्यानं लोकांची स्थिती किती बदलू शकते हे कळतं.
नामांतर आंदोलनाच्या काळात झालेली जाळपोळ आणि नुकसान पाईकरावांनी जवळून पाहिलं होतं. ते सांगतात, ‘‘ दलितांच्या शोषणामागे आर्थिक मागासलेपण आहे आणि त्यावर विजय मिळविल्याशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणवलं. पत्रकारिता सोडून सामाजिक कार्याचे रितसर धडे गिरवायचं ठरवून मी १९७९ साली मुंबईच्या ‘टाटाङ्क  सामाजिक विज्ञान संस्थेत प्रवेश घेतला. या संस्थेत प्रवेश घेणारा मराठवाड्यातला मी पहिलाच!ङ्कङ्क अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पाईकरावांनी समाजकल्याण अधिकारी म्हणून नोकरी केली. पण मन रमलं नाही. राजीनामा देऊन पूर्णवेळ समाजकार्य सुरू केलं. युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून नांदेडमध्ये त्यांची ओळख होतीच. १९८३ मध्ये ‘कयाधु ग्रामविकास संस्थेङ्क ची स्थापना करुन त्यांनी कंजारासह १५ गावांत रचनात्मक काम सुरु केलं. १९९० पर्यंत पाणलोट, ग्रामविकास यांवर भर होता. पाणीव्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. मुकुंद घारे, अणदूरचे डॉ. अहंकारी अशा तज्ज्ञांच्या सहकार्याने हे काम पुढे नेणं चाललं होतं. तीन गावात संस्थेच्या पाणलोट क्षेत्राच्या कामाल यश आलं. कळमनुरी तालुक्यातल्या जुंबडा गावात कायम पाणीटंचाई होती. त्यामुळं या गावात लोक आपली मुलगी देत नव्हते. पण पाणलोट क्षेत्रविकास झाल्याने आता याच गावातून चार गावांना पाणी पुरवलं जाऊ लागलं ! आर्थिक विषमता दूर व्हायची असेल, तर महिलाकेंद्रित उपक्रमांना पर्याय नाही, हे जाणून १९९६ साली ‘उगमङ्क ची स्थापन झाली. बचतगट चळवळीला नियोजनबद्ध रूप देणारे विजय कुलकर्णी आणि सुधा कोठारी यांनी जुंबडा गावात बचतगट स्थापण्यासाठी ‘उगमङ्क ला मदत केली. पुढे जमीन अधिकार आंदोलनात सहभागी होऊन ‘उगमङ्क ने गायरानधारक महिलांचे बचतगट गावोगावी तयार केले खरे, परंतु त्यांना पैसे द्यायला बँका कमी पडत होत्या. म्हणून जमीन अधिकार आंदोलनात एकत्र आलेल्या सामाजिक संस्थांनी अनिक फायनान्शियल सव्र्हिसेस प्रा. लि. ची स्थापनाा केली. तिने जिल्ह्यातल्या बचतगटांना २०१० मध्ये २१ लाख ९४ हजार रूपयांचं कर्जवाटप केलं. शेळीपालन, दुग्धविकास, बैलखरेदी, किराणा दुकान, बांगडी व्यवसाय अशासारख्या कामांसाठी ते होतं. दरम्यान पाईकराव यांनी जमिनीचा कस, पिकं यासाठी सेंद्रिय शेती कशी चांगली ठरते त्याची शिबिरं घ्यायला सुरूवात केली होती. लोकांना तिचं महत्व वाटू लागल्यावर दोन -तीन एकर जागेपैकी किमान दहा गुंठे जागेत सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन केलं होतं. १९९६ मध्ये ‘उगमङ्क ची स्थापना झाल्यापासून हिंगोली जिल्ह्यात प्रथमच अशी शेती प्रत्याक्षात आली. व्यवहारात पैसा असेल, तरच पुरुष कामाला सरसावतात ही मानसिकता लक्षात घेऊन बचतगटांच्या महिलांनाच या शेतीचं प्रशिक्षण दिलं होतं.
 रासायनिक खतांना पर्याय म्हणून èहाझोबियम, गांडूळखत अशी जैविक खतं वापरली. एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या भाज्या, धान्यांना चांगला मोबदला मिळवून देण्याकरिता हमखास बाजारपेठही ‘उगमङ्क विकसित केली. qहगोलीच्या जिल्हा परिषदेसमोर दर शुक्रवारी असा वेगळा बाजार भरविण्यात येतो. औरंगाबादमध्ये प्रदर्शन भरवून चोखंदळ ग्राहकांपर्यंत हा माल पोचवण्यात आला. भाज्यांची मुळ चव राखली गेल्यामुळे, तुलनेत त्या जास्त टिकाऊ असल्याने ग्राहकवर्ग कायमचा बांधला गेला. या उत्पादनांना नेहमीपेक्षा १० टक्के भाव जास्त मिळतो. विक्री व्यवहारात दलाल-अडत्याला स्थान नाही त्यामुळे झालेला अख्खा न नफा शेतकèयांचाच. सातत्याने दहा वर्षे या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे ५० गावांतले अडीच हजार अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक या शेतीत स्थिरावले आहेत. आजूबाजूच्या क्षेत्रातून शेतकèयांच्या आत्महत्यांच्या बातम्या येत असताना, या गावात तसं नाही हेही लक्षणीयच. कृषी तंत्रज्ञानाबाबत महिलांना डावललं जातं असं पाईकरावांना दिसून आलं. पुरूष शेतीचं केवळ ३० टक्के काम (पेरणी, वखरणी, नांगरणी) करतात पण त्यांना ७० टक्के तंत्रज्ञान मिळतं. सातबारा उताèयावर नावही पुरूषाचंच असतं. पण शेतात राबते महिला. शेतकी प्रशिक्षणात मात्र तिला मागे ठेवलं जातं. पुरुषांनी शिबिरात ऐकलेलं बाईपर्यंत पोचतच असं नाही. ‘उगमङ्क ने महिलांसाठी कृषीतंत्रज्ञान प्रशिक्षण सुरू केलं. त्यांना कृषी विद्यापीठात नेऊन कृषी अधिकाèयांशी भेट घडवून आणली. पेरणी अगोदरची बीजप्रक्रिया, मिश्रपिक घेण्याचे फायदे, दोन तासांमधलं (रोपांच्या ओळी) अंतर, काढणी पश्चात प्रक्रिया हे शिकवलं. २००९ पासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत तीन हजार शेतकरी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. सेंद्रिय पद्धतीनं मिळविलेल्या धान्याची डाळ जात्यावर केली, तर तिची चव टिकते हे हेरून संस्थेनं जात्याचा प्रचार केला. पण गृहणींची जात्याची सवय सुटलेली. यावर उपाय म्हणून बेअरिंग असलेलं जातं निर्माण केलं गेलं. हे सुटसुटीत जातं आता ग्रामीण भागात लोकप्रिय होत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा स्वयंसेवी संस्थाच्या मदतीनं राबवावा असा वटहुकूम २००९ मध्ये सरकारनं काढला. प्रत्येक जिल्ह्याला त्यासाठी निधीही दिला. qहगोली जिल्ह्यात ‘उगमङ्क कडे ही जबाबदारी आली. तेव्हा पाईकराव आपल्या नियोजनबद्ध आराखड्यासह सरसावले. गावसुक्ष्म नियोजन हा ‘मग्रारोहयोङ्क मधला कळीचा घटक. त्यांनी सात ते अकरा गावांचा एक गट करून अभ्यास केला. प्रशिक्षण घेतलं आणि अहवाल सादर केले. त्याद्वारे ७०० गावातल्या मजुरांना कामं मिळाली. वटहुकूमाची तामिली करण्यासाठी सरकारी निधीचा विनियोग झाला. या कामाची इतकी प्रशंसा झाली की इतर गावांनी qहगोलीचा धडा गिरवावा असं वरून सांगण्यात आलं. बाकीच्या जिल्ह्यातला निधी तोपर्यंत अनेक वाटांनी गायब झालेला होता. त्यामुळं पुन्हा एकदा निधी वाटून ‘qहगोली पॅटर्नङ्क राबविण्याचा आदेश देण्यात आला. यावेळी qहगोलीलाही निधी मिळाल्यामुळं पाईकरावांनी काम आणखी परिणामकारक केलं. रोहयोचं काम ७०० वरून १४०० गावांत पोचलं.
जागतिक पातळीवर विविध १२ निकषांनुसार (दरडोई उत्पन्न, दुष्काळाची तीव्रता, साक्षरता, स्त्रीपुरुष लोकसंख्या, बालमृत्युदर वगैरे) मानवविकास निर्देशांक ठरतो. त्यानुसार देशातली मागास राज्यं, राज्यातले मागास जिल्हे शोधले जातात. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील १२ जिल्हे मागास म्हणून निश्चित केले. त्यातही qहगोलीचा क्रमांक खालचाच होता. जिल्ह्यातल्या गावांमधल्या समस्या नेमक्या शोधून त्या मानवविकास मिशन (औरंगाबाद) पुढे मांडणं, त्यांच्या निर्मुलनासाठी प्रयत्न करणं ‘उगमङ्क नं सुरू केलं. qहगोलीत सेनगाव तालुका सर्वाधिक मागास. इथे स्त्रियांची संख्या दर हजारी ८२६. इथे सतत संपर्क ठेवून लोकसहभागातून उपक्रम केले. मागास भागांसाठीचा निधी मिशनकडून सेनगावकडं वळवळा आणि गर्भqलगनिदान रोखणं, जलस्त्रोत बळकटीकरण आदी कामं घडवून आणली.
‘उगमङ्कचे कार्यकर्ते पाच दिवस गावात जाऊन राहतात आणि तिथली परिस्थिती अभ्यासतात. त्यांच्यातलचं एक होऊन राहायचं असल्यानं ते आपल्यासोबत काहीही नेत नाहीत. नेसत्या वस्त्रानिशी जातात. लोकांना भेटतात. समस्या अनुभवतात. त्या मानवविकासला सादर करतात. मिशनकडून गावसुधारणा साधून घेण्यास संपूर्ण गावाला सामावून घेतात. तारेगावमधली सहा महिने बंद असलेली अंगणवाडी सुरू होते. बंद झालेलं खाऊ देणं सुरळीत होतं. ग्रामसेवकाची वागणूक सुधारते. शिक्षकांची मनमानी बंद होते. संडासला जागा नसलेल्या  गावात शोषखड्डयांचा उपाय काढला जातो. किशोरींच्या रक्तचाचण्या घेऊन हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. गावागावानुसार समस्या बदलतात.
शासकीय योजना आणि त्यावर आधारित कामांवर संस्थेचा भर असल्यामुळं जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणेशी संस्थेचा चांगला समन्वय आहे. योजनांच्या अंमलबजावणीसाठी याचा फायदाही होतो. मात्र अन्याय, अत्याचाराविरोधात, न्याय हक्कांसाठी, स्थानिक प्रशासनाच्या, सरकारच्या विरोधात आंदोलन करताना संस्थेचे प्रशासकीय संबंध कधी कधी अडचणीचे ठरतात. ‘उगमङ्क जरी महिलाकेंद्रित कामातून झाला असला तरी संस्थेचं कमा नदीच्या प्रवाहाप्रमाणे वळणावळणाने मार्गक्रमण करत वाटेवरच्या गावांना विकासाच्या दिशेनं घेऊन चाललं आहे.

               ---- शिवाजी कांबळे
                shivaji.kamble5@gmail.com

Monday, January 21, 2013

काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे


काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे
दैनिक ‘एकमतच्या दि. २५-१२-२०१२ च्या अंकातील वाचककट्ट्यामध्ये शिवाजी कांबळे यांचे ‘अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई या मथळ्याचे प्रसिद्ध झालेले पत्र वाचले. त्यांच्या पत्राचे शवविच्छेदन करावे व त्यांच्या कुविचारांची नांगी वेळीच ठेचावी हा या लेखनामागचा हेतू. कोणत्याही घटनेचा व प्रसंगाचा विचार
माणसाने कालसापेक्षच केला पाहिजे नसता काल-विपर्यासामुळे चुकीचा निष्कर्ष निघतो. ऐतिहासिक घटनांचा विचार कालसापेक्षच करावा म्हणजे कोणावर अन्याय होत नाही. तत्कालीन मूल्यांतूनच गतकालीन घटनांचे मूल्यमापन करावे. विद्यमान मूल्यांतून गतकालीन घटनांचे मूल्यमापन करण्याची घोडचूक शिवाजीराव कांबळे करीत आहेत. रछत्रपती शिवाजी महाराजांना भवानीमाता प्रसन्न होती. प्रसन्न होऊन देवीने दिले काय तर भवानी तलवारच! का देऊ नये तिने अ‍ॅटमबॉम्ब, नायट्रोजन बॉम्ब वा एखादे लांब पल्ल्याचे मिसाईल? शिवाजी महाराजांनी अफझलखानचे हृदयपरिवर्तन न करता त्याला ठारच केले व औरंगजेबाच्या दरबारात सत्याग्रहाचा मार्गाचा अवलंब न करता,‘शक्तीने मिळती राज्ये युक्तीने कार्य होतसे,ङ्क हाच मार्ग चोखाळला. ज्या ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवण्याचा व निर्जीव qभत चालवण्याचा चमत्कार केला. चमत्कार सोडून द्या पण वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा व एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा महान योग साधला. त्या योगीयाच्या राजाला निवृत्ती सोपान मुक्ताबाई या भावंडांना घेऊन पैठणच्या कर्मठ व सनातनी ब्राह्मणांकडे पायपीट करीत जाऊन प्रमाणपत्र आणण्याची काय आवश्यकता होती, त्या काळात ती होती हेच आजच्या या प्रश्नाचे एकमेव उत्तर आहे.काळाची गती, विज्ञानाची प्रगती, औद्योगिकीकरण या विक्रीकरण यांचा रेटा जबरदस्त असतो. त्यात शिक्षणाची भर पडली की परिवर्तनाला लक्षणीय गती येते. १९५० साली मी
सातवीला होतो. आमच्या घरी वडिलांची आत्या होती. फारच कर्मठ व सनातनी तिचे सोवळे ओवळे फारच जाचक. तिच्या तुलनेत माझी आई फारच उदारमतवादी. माझे सहकारी सर्वश्री साबणे, कांबळे, वाघमारे, ताटे, आदोडे, उजगरे, लोंढे, क्षीरसागर माझ्या घरी निमित्ताने जेवावयास येत. ते सर्व माझ्या पाटाला पाट व ताटाला ताट लावून जेवत.माझी आईच पंक्तिप्रपंच न करता मायेने वाढीत असे. मी ज्या काळात सातवीला होतो त्या साली पु.साने गुरुजींनी निराश, उदास होऊन उद्विग्नतेने झोपेच्या गोळ्या गिळून जीवनयात्रा संपविली.त्यांची आई त्यांच्या बालपणी, कोकणातल्या पालगड गावी, समाजावर
सनातनी व कर्मठांच्या कर्मकांडाचे वर्चस्व व प्रस्थ होते. त्या काळात प्रथेप्रमाणे अस्पृश्यता पाळत होती. तरी तिचे अंतःकरण करुणेनेव भूतदयेने भरून ओसंडत होते. हे न लक्षात घेता तिच्यावर दोषारोप करून आक्षेप घेणे
कमालीच्या असहिष्णू वृत्तीचे व निष्ठूरपणाचे निदर्शक आहे. अशा माणसाला मी एकारलेल्या विचाराचे संबोधतो. अशा माणसाला काकदृष्टी व गिधाडाचीच चोंच असते.
                                    -राजेश्वर शिवाजी देशमुख
                                पेठ परळी वैजनाथ, जि. बीड.

बुरसटलेल्या विचारांचे राजेश्वरराव


बुरसटलेल्या विचारांचे राजेश्वरराव
   मी ‘एकमतच्या २५ डिसेंबरच्या अंकात वाचक    कट्यामध्ये अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई, या         मथळ्याखाली एक पत्र लिहिले होते. पावित्र्याच्या मखरात बसविलेली शामची आई कशी अस्पृश्यता पाळणारी, जातीयवादी होती, हे मी पुराव्यानिशी त्या पत्रात दिलेले आहे; पण माझ्या एका पत्रामुळे पेठ, परळी वैजनाथ येथील बुरसटलेल्या आणि मनुस्मृतीचा समर्थक असलेल्या राजेश्वर देशमुखांचा जळफळाट झालेला दिसतोय. त्यांनी १५ जानेवारी २०१३ च्या ‘एकमतङ्कच्या अंकात काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे या मथळ्याखाली  कालसापेक्षतेच्या नावाखाली चातुवण्र्य व्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे समर्थनच  केले आहे. माझ्या मूळ पत्राशी कसलेही ताळतंत्र नसलेले दाखले देऊन जे काही त्यांनी विद्वतेचे दिवे पाजळले आहेत तेच सत्य आहे, असा चुकीचा संदेश वाचकांत जाऊ नये म्हणून हा पत्रप्रपंच करीत आहे. माझ्या पत्रात देशमुखांना नेमके काय खटकले? हे त्यांनी सांगितलेले नाही. मी सानेगुरुजींच्या सामाजिक आणि संस्कार चळवळीतील योगदान नाकारलेले नाही; पण याचा अर्थ असा नव्हे की, सानेगुरुजींच्या साहित्यकृतीवर, टीका वा चर्चाच होऊ नये. बाबा वाक्य प्रमाणम् हे कसे चालेल? कोणत्याही घटनेचा व प्रसंगाचा विचार माण-साने कालसापेक्षच केला पाहिजे, असे ते नमूद करतात. याचाच अर्थ इतिहासात जी अस्पृश्यता पाळली जात होती, दलितांना महारोग्यांसारखी वागणूक मिळत होती, ते काळानुरुप योग्यच होती. त्यामुळेच श्यामच्या आईला अस्पृश्यता पाळावी लागली, असा बालिश युक्तिवाद देशमुखांनी केला आहे. यातून श्यामची आई अस्पृश्यता पाळत होती हेही त्यांनी ओघाने कबूल केले आहे.               देशमुखसाहेब, महापुरुष वा इतिहासातील आदर्शांचे विचार कधीच कालसापेक्ष नसतात. ज्यांच्याकडे प्रवाहाविरुद्ध जाण्याची निर्भयता असते, अनिष्ट रूढी-परंपरांचे चक्रव्यूह भेदण्याची ज्यांच्याकडे जिगर असते तीच माणसे   महामा-नव बनतात. सर्वांनाच तेवढी प्रतिभा नसते qकवा समाजाचे नेमके आकलन करून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळेच महामानवाने शोधलेल्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न लोक करीत असतात. आजही आपण महापुरुषांच्या विचारांचे, प्रसंगाचेच दाखले देत असतो.
  जसे तुम्ही तुमच्या पत्रातही संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवरायांचे दाखले दिले आहेत पण ते चुकीच्या पद्धतीने दिले आहेत. माझ्या मूळ विषयाशी त्याचा काहीएक संबंध नसलेले. देशमुख यांच्या पत्रावरून हेच सिद्ध होते की, आजही मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती अजूनही जिवंत आहे. ते सरळ सरळ समतेचा तिरस्कार आणि विषमतेचा पुरस्कार करतात. दोन-चार दलित मित्रांना घरी नेऊन जेऊ घातले हे सांगणे हीसुद्धा अस्पृश्यतेचीच भावना आहे. या प्रसंगाचे भांडवल करून आपणही पुरोगामी हेच कदाचित त्यांना सांगावयाचे असेल. देशमुखसाहेब यातून आपण फार मोठे समाज परिवर्तन केलेत त्याबद्दल आपले अभिनंदनच केले पाहिजे. मनुवाद्यांनी निर्माण केलेली चातुवण्र्य व्यवस्था, भेदभाव, द्वेषभाव हे देशमुखांना कालसापेक्षतेच्या नावा-खाली योग्य वाटत असतील तर त्यांनी खुशाल वाटू द्यावे, मी तसे करू शकत नाही.
   समाजात बुरसटलेल्या विचारांची, जातीयवादी प्रवृत्तीची कांही तथाकथित मंडळी लोकांचा बुद्धिभेद सातत्याने करीत असतात. त्यांचे अमानवी विचार हाणून पाडणे हेच परिवर्तनवाद्यांसमोरील आजचे खरे आव्हान आहे.
                                                                           -शिवाजी कांबळे
                                                                             सोनानगर, लातूर

Wednesday, January 2, 2013

विद्येची खरी देवता

                                                  


                                           आपल्या सर्वांची खरी आई, विद्येची खरी देवता 
                                         क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना विनम्र अभिवादन !


आज ३ जानेवारी सावित्रीमाईंची जयंती. त्यानिमित्ताने सावित्रीमाईंचे जीवनकार्य इथं सांगणं म्हणजे केवह उपचार ठरेल. माईंचे कार्य, जीवन सर्वांना माहित असलेच पाहिजे. ते गृहीतच आहे. असे म्हणतात संत ज्ञानेश्वरांनी भींत चालवली, पण चार भींतीचे घर स्त्री एकटी चालवते. त्याचं काय? स्त्रीला जगत जननी म्हणून संबोधले जातं. जिल्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, स्त्री-पुरुष समानता आली पाहिजे, असा डीढोरा आज सर्वत्र पिटला जातो. सरकार, विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्तेही मोठा आव आणत स्त्री स्वातंत्र्याच्या आणि महिला अत्याचार विरोधी तास न तास बौद्धिक गप्पा मारत असतात. पण अलिकडे देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी या सगळ्या बुद्धिवाद्यांच्या थोबाडीत चपराक मारली आहे. सद्या आपल्या भारत देशात महिला अत्याचार, बलात्काराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडत नव्हते असे नाही, पण आता या प्रकरणांना वाचा फुटते आहे. सावित्रीमाईच्या लेकींवरील अत्याचारानं कळस गाठलाय. ज्या काळात स्त्रीयांना भोगवस्तू म्हणून संबोधलं जाई, स्त्री स्वातंत्र्याची भाषा करणं, तिनं शिक्षण घेणंही पाप समजलं जाई. अशा काळात सावित्रीमाईंनी मुलींना शिक्षणाचे दारे खुली करुन दिली. सावित्रीमाई भारतातील आद्य स्त्री शिक्षिका ठरल्या. शिक्षणासारखे अत्यंत पवित्र कार्य करणा-या सावित्रीमाइंचा आदर्श, राष्ट्रमाता जिजाऊंचा, रमाइंमातेचा आदर्श आपल्या सर्व तरुणाईसमोर असताना देशातील महिला-मुलींवर अत्याचार होतात. ही बाब देशाच्या दृष्ठीने अत्यंत लाजीरवाणी आहे. भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला व्यक्ती म्हणून स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. परंतु धर्मशास्त्राने अनेक वर्षांपासून तिला भोगवस्तू, दासीचा दर्जा दिला आहे. त्याची चिकित्सा कोणी करायलाच तयार नाही. स्त्रीया आजही अनिष्ट रुढी,परंपरेच्या बळी ठरत आहेत. जोपर्यंत भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. समाजाची स्त्रीयांकडे पाहण्याची मानसिकता बदलत नाही. लोकशिक्षण होत नाही. तोपर्यंत परिवर्तनाची अपेक्षा करणं म्हणजे पालथ्या घडयावर पाणीच.
हे तर षडयंत्र.........
दुसरा मुद्दा म्हणजे दलित-बहुजनांचे अत्यंत महत्वाचे प्रतीक असणाèया दिवसीच काळा दिवस पाळला जात आहे. ६ डिसेंबर हाही काळा दिवस पाळण्यात येतो. संविधान दिवसी बहिष्काराचे आवाहन केले जाते आणि आता ३ जानेवारीला सावित्रीमाईंच्या जयंती दिनी काळा दिवस पाळण्याचे आवाहन. अखेर प्रत्येक वेळी विरोध, निषेध व्यक्त करण्यासाठी दलित, बहुजन नायकांच्या प्रतीकांनाच लक्ष्य का केले जाते ? हा संयोग कसा असू शकतो, हे तर विचारपूर्वक केलेले षडयंत्र वाटते.
                                                                         ...........शिवाजी कांबळे


Sunday, December 30, 2012

समतावादी कवी : केशवसुत


 आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे कविवर्य केशवसुत -कृष्णाजी केशव दामले यांचा आज (७ ऑक्टोबर) जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या काव्यजगताचे स्मरण करून देणारा हा लेख...

प्रसारमाध्यमांतून सामाजिक प्रश्नांची अ‍ॅडव्होकसी करणा-या ‘संपर्क टीमच्या कार्यशाळेनिमित्त २००९ च्या ऑगस्ट महिन्यात गणपतीपुळ्याला गेलो होतो. तेथून जवळच असलेल्या मालगुंड येथील केशवसुत स्मारकाला भेट देण्याचा अपूर्व योग आला. शालेय जीवनात केशवसुतांच्या ‘तुतारीङ्क, ‘झपूर्झाङ्क, ‘नवा शिपाईङ्क  यांसारख्या कविता पाठ केल्या, अभ्यासल्या.  त्या कवीच्या जन्मगावी जाऊन त्यांचे स्मारक पाहण्याचा योग हा अविस्मरणीयच. कविवर्य कुसुमाग्रजांनी या स्मारकाला ‘मराठी कवितेची राजधानीङ्क संबोधून गौरव केलेला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील केशवसुत-कृष्णाजी केशव दामले यांचे हे अत्यंत देखणे स्मारक महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशा थाटात उभे आहे.  केशवसुतांचे शेणा-मातीचे राहते घर, अभ्यासाची खोली, दुर्मिळ वस्तू आजही या स्मारकात जशाच्या तशा पाहावयास मिळतात. केशवसुतांच्या काही उल्लेखनीय कविता स्मारक परिसरात मैलाचा दगड असलेल्या आकारातील फलकावर कोरण्यात आलेल्या आहेत. शिवाय या ठिकाणी सुसज्ज असे गं्रथालय आहे. १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी या स्मारकाला मूर्तरूप दिले. या स्मारकाचे उद्घाटन कविवर्य कुसुमाग्रजांच्या हस्ते १९९४ मध्ये करण्यात आले. या स्मारकाच्या एका खास दालनात केशवसुतोत्तर काळातील महत्त्वाच्या कवींच्या कवितांचा समावेश आहे. केशवसुतांनंतरच्या काळापासून १९५० पर्यंत जन्मलेल्या व ज्यांनी आधुनिक मराठी कविता समृद्ध केली अशा ६६ निवडक कवींच्या कवितांचा यात समावेश आहे. हे दालन ‘आधुनिक मराठी काव्यसंपदाङ्कदालन म्हणून ओळखले जाते. हे दालन गं्रथरूपानेही काव्यरसिकांसाठी प्रकाशित करण्यात आलेले आहे. या दालनाचे उद्घाटन कविवर्य वसंत बापट यांच्या हस्ते झाले होते.  हे स्मारक सातत्याने नव्या वाटा चोखाळणाèया नवकवींना प्रेरणादायी असून प्रवर्तन साहित्याला दिशा देणारे आहे.
  केशवसुतांच्या मरणोपरांत शंभर वर्षांनंतर मराठी कवितेत आजही केशवसुत परंपरा दिसून येते. प्रस्थापित काव्यपरंपरेला छेद देण्याचे काम आपल्या काव्यातून केलेले आहे. मानवतावाद, समता, विश्वबंधुत्व, रूढीभंजन, स्वातंत्र्यप्रेम, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार, विषमता, सामाजिक दु:ख, अन्याय, अंधश्रद्धा हे विषय त्यांच्या कवितेतून आले. केशवसुतांनी मराठी कवितेला वास्तवतेचे भान दिले. म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांच्यासारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीतङ्क नावाने त्यांनी मराठीत रूढ केला. त्यांच्या एकूण १३५ च कविता उपलब्ध आहेत. त्यांच्या कविता संख्येने कमी असल्या तरी क्रांतिकारक आणि प्रवर्तक ठरल्या आहेत. ‘तुतारीङ्क, ‘झपूर्झाङ्क, ‘नवा शिपाईङ्क,  ‘हरपले श्रेयङ्क, ‘मूर्तिभंजनङ्क, ‘आम्ही कोणङ्क,  ‘गोफणङ्क, या त्यांच्या काही उल्लेखनीय कविता. त्यातील ‘तुतारी ङ्कही कविता क्रांतिकारक ठरली.
एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन जी मी स्वप्राणाने,
भेदुनि टाकिन सगळीं गगनें
अशी तुतारी द्या मजलागुनि
 ही कविता खèया अर्थाने आधुनिक मराठी कवितेची तुतारी ठरली. या कवितेच्या नावावरून तेव्हा  तुतारी मंडळ स्थापन झाले होते. तर त्यांच्या  ‘कविता आणि कवीङ्क, या कवितून कवीच्या प्रतिभेला कोणी आदेश देऊ नये, असे खणकावून सांगितले.
अशी असावी कविता, फिरूनी
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कविला
अहांत मोठे ? पुसतों तुम्हाला
 या कवितेतून जनतेसाठी कविता असते असे म्हणण्यापेक्षा ती कवीसाठी असते, यावर केशवसुतांनी भर दिलेला दिसून येतो. कवितांतून मिळणारा आनंद हेच एकमेव कवीचे उत्तम पारितोषिक मानले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. कवीची प्रतिभा ही एक स्वतंत्र चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही कसलेही आदेश देऊ नयेत, असे त्यांनी या काव्यातून सांगितले आहे. केशवसुतांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी त्यांची कविता ‘ज्ञानप्रकाशङ्क या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्यामुळेच. मात्र केशवसुतांच्या हयातीत त्यांची आणि त्यांच्या कवितेची उपेक्षाच झाली. त्यावेळी कोणीही त्यांच्या कवितेबद्दल गौरवोद्गार काढले नाहीत. म्हणून महाराष्ट्राच्या वाचकांमध्ये गुणग्राहकता नसल्याची त्यांना खंत होती. आपली कविता कुठेच छापून येत नाही, याचे त्यांना वाईट वाटत होते. म्हणूनच त्यांनी एका कवितेत म्हटले आहे, ‘भिकार या जगी, इच्छित न मिळे काही, म्हणून तुझेपायी, भिक्षांदेहीङ्क
पण त्यांच्या मृत्युनंतर अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या कवितांना डोक्यावर घेतले. आधुनिक मराठी कवितेचा जनक म्हणून गौरव केला. केशवसुतांच्या कवितांमध्ये वास्तवाचे भान आहे. आधुनिक दृष्टी, संवेदनशीलता, नवा आशय, सामाजिकता आजच्या घडीची वाटतात. म्हणूनच केशवसुतांच्या  कवितेपासून आधुनिक मराठी कवितेचा प्रारंभ झाला असे म्हणतात. काही तथाकथित बुद्धिजीवी मंडळी काव्य वा साहित्याला पाल्हाळ म्हणून टीका करतात. साहित्यातून समाजपरिवर्तन वा क्रांती होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे. परंतु साहित्यिकच सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रोन्नतीला हातभार लावू शकतात, ही जाणीवच माणसांना कृतिशील बनवते आणि त्यातूनच क्रांती आकार घेत असते. कवीसुद्धा एक विचारवंतच असतो. केशवसुत आपल्या ‘मूर्तिभंजनङ्क कवितेतून समाजातील विकृतीवर प्रहार करतानाही मागेपुढे पाहात नाहीत.
 मूर्ति फोडा, धावा! धावा, फोडा मूर्ति!
 आंतील सम्पति फस्त करा!
 व्यर्थ पूजाद्रव्यें त्यांस वाहूनीयां,
 नाकें घासूनीयां काय लभ्य?
अध्यात्मात अडकून पडलेल्या मराठी कवितेला त्यांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसांच्या जगात आणले. आपल्या काव्यातून त्यांनी रूढी, परंपरेच्या शृंखला तोडल्या. तर  प्रेम आणि मायेचे तत्त्वज्ञानही त्यांनी फार सुंदररीतीने आपल्या कवितांमधून मांडलेले आहे. आईची आठवण काढताना ते आपल्या ‘आईकरिता शोकङ्क या कवितेतून म्हणतात..
 ‘अन्तरले पाय तुझे हाय हाय माते
मागें तव दर्शन मजलागुनीं जहाले
 तदनन्तर लोटुनिया दिवस फार गेले,
फिरुनी तुझ्या चरणांतें उत्सुक मी बघण्यातें
असता अन्तींहि न तेङ्क
अशा आशयगर्भ कवितांमधून त्यांनी नव्या वाटा निर्माण केल्या. केशवसुत त्याकाळच्या काव्यजगताचे युगप्रवर्तक ठरले.  कवितेलाच जीवनसर्वस्व मानणाèया या कवीला वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले आणि एका काव्यसूर्याचा अस्त झाला. केशवसुतांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करताना महाराष्ट्रातील कवी आणि काव्यरसिकांनीही अंतर्मुख होऊन कवितेकडे पाहण्याची गरज आहे.
             
                                                   -शिवाजी कांबळे, लातूर
                                                          ९०४९२ ९८७५०
                                             

क्रांतीकारी शुभेच्छा!


मित्रानो,
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या क्रांतीकारी शुभेच्छा!
पण या शुभेच्छा देताना वाईटही तेवढेच वाटते आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील वेदनेने महिलांच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले आहे. ती शहिद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुतांश तरुणाईने नव वर्षाचा जल्लोष साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रास्तच आहे. देशात यापूर्वीही बलात्काराच्या रोज अनेक घटना घडत होत्याच, पण त्या अत्याचाराला वाचा फुटत नव्हती, वाचा फुटली तर पोलिस प्रशासन आणि सरकार दरबारी तिला न्याय मिळत नव्हता. आपल्या देशाचे कायदे कणखर आहेत, पण कायद्याची अंमलबजावणी करणारेच नालायक, जातीवादी, अत्याचारी असल्याने असंख्य सावित्रीच्या लेकींना न्याय मिळू शकला नाही. आता दिल्लीच्या पीडित मुलीच्या भयावह प्रसंगाने देशालाच नव्हे तर जगाला हादरे दिले आहेत. परंपरेने नटलेल्या, सारे भारतीय भाऊ-बहिण आहोत म्हणून रोज गजर करणाèया देशाची जगभर छी थू होत आहे. काही वर्षांपूर्वी खैरलांजी प्रकरणातील पीडितांना न्याय मिळाला असता तर आज दिल्लीत दामिनीवर बलात्कार झाला नसता. तालिबान्यांशी दोन हात करणाèया पाकिस्तानातील मलालानेही भारत सरकारला रेपिस्ट संबोधून आरोपीच्या पिंजèयात उभे केले आहे. अण्णांच्या आंदोलनानंतर आता पीडित मुलीच्या मृत्यूने पुन्हा एकदा देशात क्रांतीची मशाल पेटली आहे. इजिप्त आणि लिबियाप्रमाणे आपल्या देशातही क्रांतीची गरज आहे. स्वत: नपुंसक असलेले सत्ताधारी बलात्काèयांना काय नपुंसक बनविणार? आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे क्रांतीचा...बदलाचा....
......................शिवाजी कांबळे


Thursday, December 27, 2012

अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई'


अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई 
२४ डिसेंबर हा सानेगुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त सानेगुरुजींची मुले म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाणारी तथाकथित मंडळी त्यांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत असतात. पण सानेगुरुजींचा अशाही एक पैलू आहे की, ते आज पुरोगामी महाराष्ट्राला विचार करावयास लावणारा आहे. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे आपल्या प्रार्थनेतून बालमनावर संस्कार करणा-या सानेगुरुजींच्या ‘श्यामची आई पुस्तकातच तेही अस्पृश्यता कसे पाळत होते, हे दिसून येते. त्यांनी लिहिलेले ‘श्यामची आईङ्क हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान, असे मानले जाते. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ साली ‘श्यामची आईङ्कनावाने चित्रपट बनवला. १९५४ साली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. लहान मुलांवर संस्कार करणारे पुस्तक म्हणून गेली पाऊणशे वर्षे उदो उदो केला जात आहे. सानेगुरुजींकडे संपूर्ण महाराष्ट्र हा एक सत्पुरुष म्हणूनच पाहतो आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरुजींनी आमरण उपोषण केले होते. तेव्हा एका पांडुरंगाने दुस-या पांडुरंगाला जोखडातून मुक्त केले, अशी प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रात उमटली. मात्र सानेगुरुजी स्वत: जातिभेदाच्या, ब्राह्मण्याच्या जोखडातून सुटू शकले नाही. हे त्यांच्याच ‘श्यामची आईङ्क या कादंबरीतून स्पष्ट होते. या पुस्तकातील श्याम हा वसतिगृहातील आपल्या मित्रांना आपल्या आईची कहाणी सांगत असतो. एका रात्री तो आपली आई जातीयवादाला कशी थारा देत नव्हती, याबद्दल सांगत असतो. ते प्रकरण म्हणजे देवाला सारी प्रिय, ही कथा सांगताना एका लाकडाची मोळी विकणा-या अस्पृश्य
समाजातील वयोवृद्ध महिलेला मोळी उचलून देण्याची मदत करून मोठे समाजकार्य केल्याचा आव आणला जातो; परंतु या पुस्तकाच्या पान क्रं. १११,११२ आणि ११५ वर ‘श्यामची आईङ्क कशी अस्पृश्यता पाळणारी होती, हे स्पष्टच होते. रस्त्यात असह्य ती अस्पृश्य महिला असते. तिला तिच्या जातीमुळे मोळीसुद्धा कोणी उचलून देत नाही. ‘श्यामची आईङ्क पाहते, तीही तिला मदत करत नाही. पण श्यामच्या आईला सरपणाची खरी गरज असते. त्यातून ती श्यामला सांगते की, बाळ, त्या महारिणीला मोळी उचलून दे. तो म्हणतो लोक काय म्हणतील, तेव्हा आई म्हणते घरी येऊन आंघोळ कर. श्याम मोळी
उचलून देतो. श्याम घरी आल्यानंतर त्याची आई त्याला घरात न घेता बाहेरच दुरूनच त्याच्या अंगावर पाणी
ओतते. स्नानात शुद्धी आहे, हे त्याला आईने सांगितलेले नसते, पण महाराला शिवल्यानंतर ब्राह्मण अशुद्ध
होतो, असे त्याला आधीच माहीत असते. या प्रसंगामध्ये आई देवाला सारीच प्रिय आहेत, यावर प्रवचन देते, मात्र अस्पृश्यता हे पाप आहे, असे ती कधीच सांगत नाही. दलितांना स्पर्श केल्यानंतर घरी जाऊन आंघोळ करावी, हा संस्कार आजच्या मुलांनी घ्यावा का?
                   --- शिवाजी कांबळे

Translate