Sunday, December 30, 2012

समतावादी कवी : केशवसुत


 आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे कविवर्य केशवसुत -कृष्णाजी केशव दामले यांचा आज (७ ऑक्टोबर) जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या काव्यजगताचे स्मरण करून देणारा हा लेख...

प्रसारमाध्यमांतून सामाजिक प्रश्नांची अ‍ॅडव्होकसी करणा-या ‘संपर्क टीमच्या कार्यशाळेनिमित्त २००९ च्या ऑगस्ट महिन्यात गणपतीपुळ्याला गेलो होतो. तेथून जवळच असलेल्या मालगुंड येथील केशवसुत स्मारकाला भेट देण्याचा अपूर्व योग आला. शालेय जीवनात केशवसुतांच्या ‘तुतारीङ्क, ‘झपूर्झाङ्क, ‘नवा शिपाईङ्क  यांसारख्या कविता पाठ केल्या, अभ्यासल्या.  त्या कवीच्या जन्मगावी जाऊन त्यांचे स्मारक पाहण्याचा योग हा अविस्मरणीयच. कविवर्य कुसुमाग्रजांनी या स्मारकाला ‘मराठी कवितेची राजधानीङ्क संबोधून गौरव केलेला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील केशवसुत-कृष्णाजी केशव दामले यांचे हे अत्यंत देखणे स्मारक महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशा थाटात उभे आहे.  केशवसुतांचे शेणा-मातीचे राहते घर, अभ्यासाची खोली, दुर्मिळ वस्तू आजही या स्मारकात जशाच्या तशा पाहावयास मिळतात. केशवसुतांच्या काही उल्लेखनीय कविता स्मारक परिसरात मैलाचा दगड असलेल्या आकारातील फलकावर कोरण्यात आलेल्या आहेत. शिवाय या ठिकाणी सुसज्ज असे गं्रथालय आहे. १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी या स्मारकाला मूर्तरूप दिले. या स्मारकाचे उद्घाटन कविवर्य कुसुमाग्रजांच्या हस्ते १९९४ मध्ये करण्यात आले. या स्मारकाच्या एका खास दालनात केशवसुतोत्तर काळातील महत्त्वाच्या कवींच्या कवितांचा समावेश आहे. केशवसुतांनंतरच्या काळापासून १९५० पर्यंत जन्मलेल्या व ज्यांनी आधुनिक मराठी कविता समृद्ध केली अशा ६६ निवडक कवींच्या कवितांचा यात समावेश आहे. हे दालन ‘आधुनिक मराठी काव्यसंपदाङ्कदालन म्हणून ओळखले जाते. हे दालन गं्रथरूपानेही काव्यरसिकांसाठी प्रकाशित करण्यात आलेले आहे. या दालनाचे उद्घाटन कविवर्य वसंत बापट यांच्या हस्ते झाले होते.  हे स्मारक सातत्याने नव्या वाटा चोखाळणाèया नवकवींना प्रेरणादायी असून प्रवर्तन साहित्याला दिशा देणारे आहे.
  केशवसुतांच्या मरणोपरांत शंभर वर्षांनंतर मराठी कवितेत आजही केशवसुत परंपरा दिसून येते. प्रस्थापित काव्यपरंपरेला छेद देण्याचे काम आपल्या काव्यातून केलेले आहे. मानवतावाद, समता, विश्वबंधुत्व, रूढीभंजन, स्वातंत्र्यप्रेम, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार, विषमता, सामाजिक दु:ख, अन्याय, अंधश्रद्धा हे विषय त्यांच्या कवितेतून आले. केशवसुतांनी मराठी कवितेला वास्तवतेचे भान दिले. म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांच्यासारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीतङ्क नावाने त्यांनी मराठीत रूढ केला. त्यांच्या एकूण १३५ च कविता उपलब्ध आहेत. त्यांच्या कविता संख्येने कमी असल्या तरी क्रांतिकारक आणि प्रवर्तक ठरल्या आहेत. ‘तुतारीङ्क, ‘झपूर्झाङ्क, ‘नवा शिपाईङ्क,  ‘हरपले श्रेयङ्क, ‘मूर्तिभंजनङ्क, ‘आम्ही कोणङ्क,  ‘गोफणङ्क, या त्यांच्या काही उल्लेखनीय कविता. त्यातील ‘तुतारी ङ्कही कविता क्रांतिकारक ठरली.
एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन जी मी स्वप्राणाने,
भेदुनि टाकिन सगळीं गगनें
अशी तुतारी द्या मजलागुनि
 ही कविता खèया अर्थाने आधुनिक मराठी कवितेची तुतारी ठरली. या कवितेच्या नावावरून तेव्हा  तुतारी मंडळ स्थापन झाले होते. तर त्यांच्या  ‘कविता आणि कवीङ्क, या कवितून कवीच्या प्रतिभेला कोणी आदेश देऊ नये, असे खणकावून सांगितले.
अशी असावी कविता, फिरूनी
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कविला
अहांत मोठे ? पुसतों तुम्हाला
 या कवितेतून जनतेसाठी कविता असते असे म्हणण्यापेक्षा ती कवीसाठी असते, यावर केशवसुतांनी भर दिलेला दिसून येतो. कवितांतून मिळणारा आनंद हेच एकमेव कवीचे उत्तम पारितोषिक मानले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. कवीची प्रतिभा ही एक स्वतंत्र चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही कसलेही आदेश देऊ नयेत, असे त्यांनी या काव्यातून सांगितले आहे. केशवसुतांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी त्यांची कविता ‘ज्ञानप्रकाशङ्क या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्यामुळेच. मात्र केशवसुतांच्या हयातीत त्यांची आणि त्यांच्या कवितेची उपेक्षाच झाली. त्यावेळी कोणीही त्यांच्या कवितेबद्दल गौरवोद्गार काढले नाहीत. म्हणून महाराष्ट्राच्या वाचकांमध्ये गुणग्राहकता नसल्याची त्यांना खंत होती. आपली कविता कुठेच छापून येत नाही, याचे त्यांना वाईट वाटत होते. म्हणूनच त्यांनी एका कवितेत म्हटले आहे, ‘भिकार या जगी, इच्छित न मिळे काही, म्हणून तुझेपायी, भिक्षांदेहीङ्क
पण त्यांच्या मृत्युनंतर अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या कवितांना डोक्यावर घेतले. आधुनिक मराठी कवितेचा जनक म्हणून गौरव केला. केशवसुतांच्या कवितांमध्ये वास्तवाचे भान आहे. आधुनिक दृष्टी, संवेदनशीलता, नवा आशय, सामाजिकता आजच्या घडीची वाटतात. म्हणूनच केशवसुतांच्या  कवितेपासून आधुनिक मराठी कवितेचा प्रारंभ झाला असे म्हणतात. काही तथाकथित बुद्धिजीवी मंडळी काव्य वा साहित्याला पाल्हाळ म्हणून टीका करतात. साहित्यातून समाजपरिवर्तन वा क्रांती होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे. परंतु साहित्यिकच सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रोन्नतीला हातभार लावू शकतात, ही जाणीवच माणसांना कृतिशील बनवते आणि त्यातूनच क्रांती आकार घेत असते. कवीसुद्धा एक विचारवंतच असतो. केशवसुत आपल्या ‘मूर्तिभंजनङ्क कवितेतून समाजातील विकृतीवर प्रहार करतानाही मागेपुढे पाहात नाहीत.
 मूर्ति फोडा, धावा! धावा, फोडा मूर्ति!
 आंतील सम्पति फस्त करा!
 व्यर्थ पूजाद्रव्यें त्यांस वाहूनीयां,
 नाकें घासूनीयां काय लभ्य?
अध्यात्मात अडकून पडलेल्या मराठी कवितेला त्यांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसांच्या जगात आणले. आपल्या काव्यातून त्यांनी रूढी, परंपरेच्या शृंखला तोडल्या. तर  प्रेम आणि मायेचे तत्त्वज्ञानही त्यांनी फार सुंदररीतीने आपल्या कवितांमधून मांडलेले आहे. आईची आठवण काढताना ते आपल्या ‘आईकरिता शोकङ्क या कवितेतून म्हणतात..
 ‘अन्तरले पाय तुझे हाय हाय माते
मागें तव दर्शन मजलागुनीं जहाले
 तदनन्तर लोटुनिया दिवस फार गेले,
फिरुनी तुझ्या चरणांतें उत्सुक मी बघण्यातें
असता अन्तींहि न तेङ्क
अशा आशयगर्भ कवितांमधून त्यांनी नव्या वाटा निर्माण केल्या. केशवसुत त्याकाळच्या काव्यजगताचे युगप्रवर्तक ठरले.  कवितेलाच जीवनसर्वस्व मानणाèया या कवीला वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले आणि एका काव्यसूर्याचा अस्त झाला. केशवसुतांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करताना महाराष्ट्रातील कवी आणि काव्यरसिकांनीही अंतर्मुख होऊन कवितेकडे पाहण्याची गरज आहे.
             
                                                   -शिवाजी कांबळे, लातूर
                                                          ९०४९२ ९८७५०
                                             

क्रांतीकारी शुभेच्छा!


मित्रानो,
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या क्रांतीकारी शुभेच्छा!
पण या शुभेच्छा देताना वाईटही तेवढेच वाटते आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील वेदनेने महिलांच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले आहे. ती शहिद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुतांश तरुणाईने नव वर्षाचा जल्लोष साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रास्तच आहे. देशात यापूर्वीही बलात्काराच्या रोज अनेक घटना घडत होत्याच, पण त्या अत्याचाराला वाचा फुटत नव्हती, वाचा फुटली तर पोलिस प्रशासन आणि सरकार दरबारी तिला न्याय मिळत नव्हता. आपल्या देशाचे कायदे कणखर आहेत, पण कायद्याची अंमलबजावणी करणारेच नालायक, जातीवादी, अत्याचारी असल्याने असंख्य सावित्रीच्या लेकींना न्याय मिळू शकला नाही. आता दिल्लीच्या पीडित मुलीच्या भयावह प्रसंगाने देशालाच नव्हे तर जगाला हादरे दिले आहेत. परंपरेने नटलेल्या, सारे भारतीय भाऊ-बहिण आहोत म्हणून रोज गजर करणाèया देशाची जगभर छी थू होत आहे. काही वर्षांपूर्वी खैरलांजी प्रकरणातील पीडितांना न्याय मिळाला असता तर आज दिल्लीत दामिनीवर बलात्कार झाला नसता. तालिबान्यांशी दोन हात करणाèया पाकिस्तानातील मलालानेही भारत सरकारला रेपिस्ट संबोधून आरोपीच्या पिंजèयात उभे केले आहे. अण्णांच्या आंदोलनानंतर आता पीडित मुलीच्या मृत्यूने पुन्हा एकदा देशात क्रांतीची मशाल पेटली आहे. इजिप्त आणि लिबियाप्रमाणे आपल्या देशातही क्रांतीची गरज आहे. स्वत: नपुंसक असलेले सत्ताधारी बलात्काèयांना काय नपुंसक बनविणार? आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे क्रांतीचा...बदलाचा....
......................शिवाजी कांबळे


Thursday, December 27, 2012

अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई'


अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई 
२४ डिसेंबर हा सानेगुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त सानेगुरुजींची मुले म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाणारी तथाकथित मंडळी त्यांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत असतात. पण सानेगुरुजींचा अशाही एक पैलू आहे की, ते आज पुरोगामी महाराष्ट्राला विचार करावयास लावणारा आहे. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे आपल्या प्रार्थनेतून बालमनावर संस्कार करणा-या सानेगुरुजींच्या ‘श्यामची आई पुस्तकातच तेही अस्पृश्यता कसे पाळत होते, हे दिसून येते. त्यांनी लिहिलेले ‘श्यामची आईङ्क हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान, असे मानले जाते. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ साली ‘श्यामची आईङ्कनावाने चित्रपट बनवला. १९५४ साली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. लहान मुलांवर संस्कार करणारे पुस्तक म्हणून गेली पाऊणशे वर्षे उदो उदो केला जात आहे. सानेगुरुजींकडे संपूर्ण महाराष्ट्र हा एक सत्पुरुष म्हणूनच पाहतो आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरुजींनी आमरण उपोषण केले होते. तेव्हा एका पांडुरंगाने दुस-या पांडुरंगाला जोखडातून मुक्त केले, अशी प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रात उमटली. मात्र सानेगुरुजी स्वत: जातिभेदाच्या, ब्राह्मण्याच्या जोखडातून सुटू शकले नाही. हे त्यांच्याच ‘श्यामची आईङ्क या कादंबरीतून स्पष्ट होते. या पुस्तकातील श्याम हा वसतिगृहातील आपल्या मित्रांना आपल्या आईची कहाणी सांगत असतो. एका रात्री तो आपली आई जातीयवादाला कशी थारा देत नव्हती, याबद्दल सांगत असतो. ते प्रकरण म्हणजे देवाला सारी प्रिय, ही कथा सांगताना एका लाकडाची मोळी विकणा-या अस्पृश्य
समाजातील वयोवृद्ध महिलेला मोळी उचलून देण्याची मदत करून मोठे समाजकार्य केल्याचा आव आणला जातो; परंतु या पुस्तकाच्या पान क्रं. १११,११२ आणि ११५ वर ‘श्यामची आईङ्क कशी अस्पृश्यता पाळणारी होती, हे स्पष्टच होते. रस्त्यात असह्य ती अस्पृश्य महिला असते. तिला तिच्या जातीमुळे मोळीसुद्धा कोणी उचलून देत नाही. ‘श्यामची आईङ्क पाहते, तीही तिला मदत करत नाही. पण श्यामच्या आईला सरपणाची खरी गरज असते. त्यातून ती श्यामला सांगते की, बाळ, त्या महारिणीला मोळी उचलून दे. तो म्हणतो लोक काय म्हणतील, तेव्हा आई म्हणते घरी येऊन आंघोळ कर. श्याम मोळी
उचलून देतो. श्याम घरी आल्यानंतर त्याची आई त्याला घरात न घेता बाहेरच दुरूनच त्याच्या अंगावर पाणी
ओतते. स्नानात शुद्धी आहे, हे त्याला आईने सांगितलेले नसते, पण महाराला शिवल्यानंतर ब्राह्मण अशुद्ध
होतो, असे त्याला आधीच माहीत असते. या प्रसंगामध्ये आई देवाला सारीच प्रिय आहेत, यावर प्रवचन देते, मात्र अस्पृश्यता हे पाप आहे, असे ती कधीच सांगत नाही. दलितांना स्पर्श केल्यानंतर घरी जाऊन आंघोळ करावी, हा संस्कार आजच्या मुलांनी घ्यावा का?
                   --- शिवाजी कांबळे

Translate